शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण म्हणजे केवळ वाघ नव्हे

By admin | Updated: December 28, 2016 03:29 IST

सध्याच्या काळात सर्वत्र वाघाला फार महत्त्व दिले जाते. वाघाचे संरक्षण म्हणजेच वन व पर्यावरणाचे संरक्षण, असा प्रचार केला जात आहे.

मारुती चितमपल्ली : अनिल पिंपळापुरे यांना वन्यजीव संवर्धन पुरस्कार प्रदान नागपूर : सध्याच्या काळात सर्वत्र वाघाला फार महत्त्व दिले जाते. वाघाचे संरक्षण म्हणजेच वन व पर्यावरणाचे संरक्षण, असा प्रचार केला जात आहे. मात्र जंगलामध्ये अनेक प्रकारच्या प्राणी, पक्ष्यांचा अधिवास असतो. आजच्या परिस्थितीत वनांमधील विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्याही संवर्धनाला तेवढेच महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ वाघाचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचे संवर्धन नव्हे, असे परखड मत आणि त्याची खंत वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली. वनराई फाऊंडेशनच्यावतीने पक्षितज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांना स्व. लक्ष्मीकांत हरकरे स्मृती वन्यजीव संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. धनवटे सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात सर्वाच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, आमदार मितेश भांगडिया, वनराईचे अध्यक्ष अनंत घारड, गिरीश गांधी, डॉ. पिनाक दंदे, डॉ. गोपाळ ठोसर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. मारुती चितमपल्ली यांनी वेद, पुराणातील दाखले देत पक्षी, प्राण्यांविषयी असलेले मिथक सांगत पक्षिशास्त्राच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची गरज व्यक्त केली. याप्रसंगी माजी न्या. विकास सिरपूरकर यांनीही पर्यावरण ऱ्हासावर चिंता व्यक्त केली. लहानपणी अवतीभवती दिसणाऱ्या चिमण्या आज दिसेनाशा झाल्या. श्राद्ध घालायच्या वेळीही कावळे शोधत फिरावे लागते. पक्षी, प्राणी व माणसांचा एवढा घनिष्ठ संबंध होता की, आमचे साहित्यविश्व त्या कथा, कादंबऱ्यांनी व्यापून गेले आहे. मात्र शहरीकरण आणि आधुनिकीकरणाच्या पिपासेपायी सर्व नष्ट होत आहे. आम्ही आपली संस्कृती विसरत चाललो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी माळढोक, ग्रे हॉन बील या पक्ष्यांवर केलेल्या अभ्यासाबाबत माहिती दिली. २० वर्षांपूर्वी ११ राज्यांत अडीच हजाराच्यावर असलेल्या माळढोक पक्ष्यांची संख्या आज शंभर-सव्वाशेवर उरली आहे. वरोरा, उमरेड भागात १० वर्षांपूर्वी २० ते २५ पक्षी आम्ही शोधले होते. हवा तसा लोकसहभाग मिळत नसल्याने या पक्ष्यांची संख्या नाममात्र उरली आहे. येणाऱ्या काळात विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पूर्वी शहराबाहेर गावाच्या वाटेने गेले की हिरवेगार माळरान, तलाव आणि पक्ष्यांचे थवे दिसायचे. आज शहरीकरणाच्या झपाट्यात ते सर्व लुप्त होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संचालन वनराईचे अजय पाटील यांनी केले तर नितीन जतकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)