शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पर्यावरण म्हणजे केवळ वाघ नव्हे

By admin | Updated: December 28, 2016 03:29 IST

सध्याच्या काळात सर्वत्र वाघाला फार महत्त्व दिले जाते. वाघाचे संरक्षण म्हणजेच वन व पर्यावरणाचे संरक्षण, असा प्रचार केला जात आहे.

मारुती चितमपल्ली : अनिल पिंपळापुरे यांना वन्यजीव संवर्धन पुरस्कार प्रदान नागपूर : सध्याच्या काळात सर्वत्र वाघाला फार महत्त्व दिले जाते. वाघाचे संरक्षण म्हणजेच वन व पर्यावरणाचे संरक्षण, असा प्रचार केला जात आहे. मात्र जंगलामध्ये अनेक प्रकारच्या प्राणी, पक्ष्यांचा अधिवास असतो. आजच्या परिस्थितीत वनांमधील विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्याही संवर्धनाला तेवढेच महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ वाघाचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचे संवर्धन नव्हे, असे परखड मत आणि त्याची खंत वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली. वनराई फाऊंडेशनच्यावतीने पक्षितज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांना स्व. लक्ष्मीकांत हरकरे स्मृती वन्यजीव संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. धनवटे सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात सर्वाच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, आमदार मितेश भांगडिया, वनराईचे अध्यक्ष अनंत घारड, गिरीश गांधी, डॉ. पिनाक दंदे, डॉ. गोपाळ ठोसर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. मारुती चितमपल्ली यांनी वेद, पुराणातील दाखले देत पक्षी, प्राण्यांविषयी असलेले मिथक सांगत पक्षिशास्त्राच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची गरज व्यक्त केली. याप्रसंगी माजी न्या. विकास सिरपूरकर यांनीही पर्यावरण ऱ्हासावर चिंता व्यक्त केली. लहानपणी अवतीभवती दिसणाऱ्या चिमण्या आज दिसेनाशा झाल्या. श्राद्ध घालायच्या वेळीही कावळे शोधत फिरावे लागते. पक्षी, प्राणी व माणसांचा एवढा घनिष्ठ संबंध होता की, आमचे साहित्यविश्व त्या कथा, कादंबऱ्यांनी व्यापून गेले आहे. मात्र शहरीकरण आणि आधुनिकीकरणाच्या पिपासेपायी सर्व नष्ट होत आहे. आम्ही आपली संस्कृती विसरत चाललो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी माळढोक, ग्रे हॉन बील या पक्ष्यांवर केलेल्या अभ्यासाबाबत माहिती दिली. २० वर्षांपूर्वी ११ राज्यांत अडीच हजाराच्यावर असलेल्या माळढोक पक्ष्यांची संख्या आज शंभर-सव्वाशेवर उरली आहे. वरोरा, उमरेड भागात १० वर्षांपूर्वी २० ते २५ पक्षी आम्ही शोधले होते. हवा तसा लोकसहभाग मिळत नसल्याने या पक्ष्यांची संख्या नाममात्र उरली आहे. येणाऱ्या काळात विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पूर्वी शहराबाहेर गावाच्या वाटेने गेले की हिरवेगार माळरान, तलाव आणि पक्ष्यांचे थवे दिसायचे. आज शहरीकरणाच्या झपाट्यात ते सर्व लुप्त होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संचालन वनराईचे अजय पाटील यांनी केले तर नितीन जतकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)