शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

प्रवेशबंदी कायम की हटली?

By admin | Updated: July 8, 2014 01:16 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५० महाविद्यालयांवर लावलेल्या प्रवेशबंदीच्या मुद्यावर सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. संबंधित प्रवेशबंदी हटली पाहिजे,

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा : अधिकाऱ्यांमध्येच संभ्रमनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५० महाविद्यालयांवर लावलेल्या प्रवेशबंदीच्या मुद्यावर सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. संबंधित प्रवेशबंदी हटली पाहिजे, असा सूर या बैठकीत निघाला. परंतु बैठकीनंतर मात्र विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये या मुद्यावरून किती संभ्रम आहे याचे प्रत्यंतर आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी प्रवेशबंदी हटलेली नाही, असे स्पष्ट केले. तर दुसरीकडे बीसीयूडी संचालक डॉ. श्रीकांत कोमावार यांनी मात्र ज्या महाविद्यालयांनी नवीन निकषांनुसार प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे ते विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात, असे प्रतिपादन केले. कुलगुरूंचे ‘ना’ आणि डॉ. कोमावारांचे ‘हा’ यामुळे नेमकी प्रवेशबंदी हटली की नाही, यासंदर्भात संभ्रम वाढीस लागला आहे.एकही नियमित प्राध्यापक नसलेल्या २५० महाविद्यालयांवर ७ जून २०१३ रोजी विद्यापीठाने प्रवेशबंदी लावली होती. त्यानंतर विद्यापीठात गेल्या वर्षभरापासून सातत्याने या मुद्यावर चर्चा, आंदोलने सुरू आहेत. शिवाय संबंधित प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रवेशबंदीसंदर्भात चर्चा झाली. ज्या महाविद्यालयांनी प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांची नावे प्रवेशबंदीच्या यादीतून हटली पाहिजे, असा सूर या बैठकीत निघाला. जवळपास ४३ महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे यासंदर्भातील शपथपत्र जमा केले असल्याने त्यांची नावे यादीतून वगळली पाहिजे, असे मत सदस्यांनी व्यक्त केले. परंतु संबंधित मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाला याची माहिती द्यावी लागेल, असे सदस्यांनी सुचविले.व्यवस्थापन परिषदेची बैठक आटोपल्यानंतर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांना यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता, त्यांनी अद्याप प्रवेशबंदी हटविण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. परंतु त्यानंतर ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. श्रीकांत कोमावार यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली. प्रवेशबंदीची ही यादी २०१३-१४ या सालासाठी होती. शिवाय २०१४-१५ सालासाठीच्या नवीन निकषांनुसार ज्या महाविद्यालयांनी प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे ते विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. डॉ. कोमावार यांना यासंदर्भात वारंवार विचारणा केल्यावर त्यांनी संबंधित महाविद्यालयांची प्रवेशबंदी हटविण्यात आली आहे, हे मान्य केले. यावेळी काही संस्थाचालकदेखील उपस्थित होते, हे विशेष. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)