शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

प्रवेशबंदी कायम की हटली?

By admin | Updated: July 8, 2014 01:16 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५० महाविद्यालयांवर लावलेल्या प्रवेशबंदीच्या मुद्यावर सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. संबंधित प्रवेशबंदी हटली पाहिजे,

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा : अधिकाऱ्यांमध्येच संभ्रमनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५० महाविद्यालयांवर लावलेल्या प्रवेशबंदीच्या मुद्यावर सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. संबंधित प्रवेशबंदी हटली पाहिजे, असा सूर या बैठकीत निघाला. परंतु बैठकीनंतर मात्र विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये या मुद्यावरून किती संभ्रम आहे याचे प्रत्यंतर आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी प्रवेशबंदी हटलेली नाही, असे स्पष्ट केले. तर दुसरीकडे बीसीयूडी संचालक डॉ. श्रीकांत कोमावार यांनी मात्र ज्या महाविद्यालयांनी नवीन निकषांनुसार प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे ते विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात, असे प्रतिपादन केले. कुलगुरूंचे ‘ना’ आणि डॉ. कोमावारांचे ‘हा’ यामुळे नेमकी प्रवेशबंदी हटली की नाही, यासंदर्भात संभ्रम वाढीस लागला आहे.एकही नियमित प्राध्यापक नसलेल्या २५० महाविद्यालयांवर ७ जून २०१३ रोजी विद्यापीठाने प्रवेशबंदी लावली होती. त्यानंतर विद्यापीठात गेल्या वर्षभरापासून सातत्याने या मुद्यावर चर्चा, आंदोलने सुरू आहेत. शिवाय संबंधित प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रवेशबंदीसंदर्भात चर्चा झाली. ज्या महाविद्यालयांनी प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांची नावे प्रवेशबंदीच्या यादीतून हटली पाहिजे, असा सूर या बैठकीत निघाला. जवळपास ४३ महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे यासंदर्भातील शपथपत्र जमा केले असल्याने त्यांची नावे यादीतून वगळली पाहिजे, असे मत सदस्यांनी व्यक्त केले. परंतु संबंधित मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाला याची माहिती द्यावी लागेल, असे सदस्यांनी सुचविले.व्यवस्थापन परिषदेची बैठक आटोपल्यानंतर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांना यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता, त्यांनी अद्याप प्रवेशबंदी हटविण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. परंतु त्यानंतर ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. श्रीकांत कोमावार यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली. प्रवेशबंदीची ही यादी २०१३-१४ या सालासाठी होती. शिवाय २०१४-१५ सालासाठीच्या नवीन निकषांनुसार ज्या महाविद्यालयांनी प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे ते विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. डॉ. कोमावार यांना यासंदर्भात वारंवार विचारणा केल्यावर त्यांनी संबंधित महाविद्यालयांची प्रवेशबंदी हटविण्यात आली आहे, हे मान्य केले. यावेळी काही संस्थाचालकदेखील उपस्थित होते, हे विशेष. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)