शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
2
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
3
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
6
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
7
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
8
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
9
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
10
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
11
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
12
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
13
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
15
ग्रीन टी, ब्लॅक टी सोडा... आता 'बनाना टी' एकदा प्या; स्ट्रेसला कराल बाय-बाय, हाडं होतील मजबूत
16
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
17
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
18
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
19
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
20
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन

अभियांत्रिकी प्रवेश : जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:15 IST

अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन आठवडा झाला असला तरी, आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही अर्जाची निश्चिती करता आलेली नाही. जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत. ही अट शिथिल करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयानेदेखील सरकारला पत्र लिहिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता सरकार विद्यार्थ्यांना दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना सरकार दिलासा देणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन आठवडा झाला असला तरी, आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही अर्जाची निश्चिती करता आलेली नाही. जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत. ही अट शिथिल करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयानेदेखील सरकारला पत्र लिहिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता सरकार विद्यार्थ्यांना दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया ७ जूनपासून सुरू झाली. १९ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करायचे आहेत; शिवाय याच कालावधीत त्यांना ‘एफसी’वर (फॅसिलिटेशन सेंटर) जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून अर्जनिश्चिती करायची आहे. प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन सहा दिवस झाले असले तरी ‘एफसी’वर अद्यापही हवे त्या प्रमाणात विद्यार्थी आलेले नाहीत. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज दाखल केल्यानंतर ज्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे, त्यात जात वैधता प्रमाणपत्राचादेखील समावेश आहे. अनेक विद्यार्थ्यांनी यासाठी शासकीय यंत्रणेकडे अर्ज केला आहे. मात्र त्यांना अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही. अशास्थितीत शासनाने मागील वर्षीप्रमाणे हमीपत्राच्या आधारावर तीन महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयामधील मुख्यालयातील सूत्रांशी संपर्क केला असता, आमच्याकडेदेखील पालक-विद्यार्थ्यांनी अडचणी मांडल्या आहेत. शासनाला याबाबत कळविण्यात आले असून शासनपातळीवर याबाबत चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.शासनाला लवकर घ्यावा लागणार निर्णयप्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार अर्जनिश्चितीचा अखेरचा दिनांक १९ जून हा आहे. त्यासाठी अवघे सहा दिवस उरले असून, मध्ये दोन सुट्या आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, शासनाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे.