शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

शिथिलतेनंतर बाजारपेठेत उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST

नागपूर : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, फार्मसी वगळता एप्रिल महिन्यात वेळेचे निर्बंध आणि मे महिन्यात पूर्णत: बंद असलेल्या बाजारपेठा आता ...

नागपूर : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, फार्मसी वगळता एप्रिल महिन्यात वेळेचे निर्बंध आणि मे महिन्यात पूर्णत: बंद असलेल्या बाजारपेठा आता ब्रेक द चेन अंतर्गत सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर १ जूनपासून दुकाने उघडल्याने बाजारात अर्थचक्र पुन्हा सुरू झाले आहे. दुकाने उघडल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे. पहिल्या दिवशी खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून आली.

सक्करदरा, महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, धरमपेठ, कमाल चौक, खामला, जरीपटका येथील सराफा, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, कापड, हार्डवेअर बाजारपेठा आणि नागपुरातील सर्वच वस्त्या व रस्त्यांवरील दुकाने सुरू झाल्याने आर्थिक नुकसानीत असलेल्या व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. दुकाने काही तासांसाठी सुरू ठेवण्याची व्यापाऱ्यांची पूर्वीपासूनच मागणी होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. पण आता दुकाने सुरू झाल्याने व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

सोना-चांदी ओळ कमिटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे म्हणाले, वेळेच्या निर्बंधांतर्गत दुकाने सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे. पूर्वीचे नुकसान कधीही भरून निघणार नाही, पण व्यापारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गांधीबाग होलसेल क्लॉथ मार्केटचे माजी अध्यक्ष अजय मदान म्हणाले, पहिल्याच दिवशी बाजारात गर्दी होती. दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचे पालन केले. दुकाने सुरू झाल्याने अर्थचक्र सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे.

सीताबर्डीतील दुकानदार संघाचे हुसेन अजानी म्हणाले, दोन महिन्यानंतर मार्केट सुरू झाल्याने व्यापारी आनंदी आहेत. दुकाने २ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने ग्राहकांची संख्या कमी राहील. व्यवसाय सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागतील.

ऑटोमोबाईल व्यावसायिक विजय आमधरे म्हणाले, दुकाने सुरू झाल्याने उत्साह आहे. व्यवसाय सुरळीत होण्यास काही दिवस लागणार आहेत. पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहक आले. शासकीय नियमांचे पालन करण्यात येत आहे. हार्डवेअर विक्रेते राकेश माटे म्हणाले, अनेक दिवस दुकाने बंद राहिल्याने आर्थिक नुकसान झाले. अनेकांची बांधकामे बरीच दिवस थांबल्याने पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पुढे व्यवसायाला गती येणार आहे.