शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

प्रवेश हवाय, घरमालकाचा भाडेकरार आणा; शिक्षण उपसंचालकांचा अफलातून आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 10:32 IST

ज्या भाडेकरू पालकांच्या पाल्याचा आरटीईत नंबर लागला आहे. त्यांना प्रवेश घेताना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा कागदपत्रांसोबत जोडायचा आहे. त्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, असा आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढला आहे.

ठळक मुद्देआरटीई प्रवेशात पालकांची गोचीयासंदर्भात आरटीई अ‍ॅक्शन कमिटीने भाडे करारनाम्याच्या बाबतीत शिक्षण उपसंचालक कार्यालयाला निवेदन दिले. प्रवेशासंदर्भात सत्यस्थिती उपसंचालकांपुढे ठेवली. ही अट रद्द करण्याच्या मागणी बरोबरच प्रवेशासाठीची मुदतवाढ देण्याची मागणी केली असल्याचे अध्यक्ष मो. शाहीद श

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या भाडेकरू पालकांच्या पाल्याचा आरटीईत नंबर लागला आहे. त्यांना प्रवेश घेताना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा कागदपत्रांसोबत जोडायचा आहे. त्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, असा आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढला आहे. मुळात अनेक भाड्याने राहणाऱ्या पालकांना नोंदणीकृत भाडेकरारनामा मिळणे शक्य नसल्याने, अशा पालकांची चांगलीच गोची होत आहे.आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. लॉटरीच्या सोडतीनंतर विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश घेणे सुरू आहे. परंतु भाड्याने राहणाऱ्या पालकांची शिक्षणाधिकारी कार्यालयात गर्दी होत आहे. शिक्षण उपसंचालकांनी काढलेल्या पत्रामुळे नोंदणीकृत भाडेकरारनामा नसलेल्या पालकांना शाळा प्रवेश देण्यास नकार देत आहे. त्यामुळे आरटीईत नंबर लागूनही प्रवेश मिळणार नाही अशी भिती पालकांना सतावत आहे. किरायाने राहणाºया ९० टक्के पालकांना अधिकृत भाडे करारनामा मिळविणे कठीण आहे. अधिकृत करारनाम्यासाठी घरमालकांची परवानगी गरजेची आहे. परंतु घरमालक त्यास नकार देत आहेत. पालक भाडे करारनामा करण्यासाठी पैसेही खर्च करण्यास तयार आहेत. पण घरमालकांचा नकार असल्याने ते हतबल झाले आहेत. पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोनच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात पालकांची गर्दी वाढली आहे.परंतु २३ मार्च २०१७ ला शिक्षण संचालक (प्राथमिक) गोविंद नांदेडे यांनी काढलेल्या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे की, ज्या पालकांकडे आधारकार्ड, निवडणुक ओळखपत्र, भाड्याची पावती यापैकी कोणताही एक पुरावा असेल तर प्रवेश द्यावा. जर पुरावा नसेल तर दुय्यम निबंधक कार्यालयातून अधिकृत भाडे करारनामा आवश्यक आहे. यावेळी मात्र दुय्यम निबंधक कार्यालयाचा अधिकृत भाडे करारनामा प्रवेशासाठी अधिकृत मानला गेल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र