शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

ट्विटमध्ये आपण म्हटले तेच पुरेसे ! मलिक यांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 22:20 IST

Nagpur News नबाब मलिक यांच्या आरोपांवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये आपण म्हटले तेच पुरेसे आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्देएस. टी.च्या आंदोलनावरुन सरकारवर निशाणा

नागपूर : नबाब मलिक यांच्या आरोपांवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये आपण म्हटले तेच पुरेसे आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही आरोपांना उत्तर दिले असून, मलिकांच्या आरोपांना यापेक्षा अधिक महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले आहे.

नवाब मलिक यांच्याकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांदरम्यान फडणवीस यांचे बुधवारी नागपूर विमानतळावर आगमन झाले. या आरोपांसंदर्भात पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. यापूर्वी केलेल्या एका ट्विटमधून त्यांनी डुकरासोबत कुस्ती खेळली तर चिखल आपल्याच अंगावर येणार, असे म्हटले होते. या ट्टिटमध्ये आपण म्हटले तेच पुरेसे आहे, असे सांगून त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना अधिक उत्तरे देण्याचे टाळले.

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, सरकार दडपशाही करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यामुळे आंदोलन अधिक पेटून उठेल. एस. टी. कर्मचाऱ्यांना सरकारने काहीतरी मदत द्यायला हवी, असे ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिक