शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्षात भाज्या महागल्या

By admin | Updated: September 22, 2014 00:57 IST

ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईने उच्छाद मांडला असून, ६० ते ८० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या सांभार आणि हिरव्या मिरचीने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.

दिवाळीपर्यंत भाव कमी होणार : आवक घटलीनागपूर : ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईने उच्छाद मांडला असून, ६० ते ८० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या सांभार आणि हिरव्या मिरचीने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ठोक बाजारात भाज्या आटोक्यात असल्या तरीही पितृपंधरवड्यात किरकोळमध्ये महागच आहेत. ही परिस्थिती केव्हा सुधारणार, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. तीन महिन्यांपासून कांदे, बटाट्याचे भाव स्थिरतीन महिन्यांपासून कळमना ठोक बाजारात कांदे आणि बटाट्याचे भाव स्थिर आहेत. मध्यंतरी कांदे पुन्हा ५०-६० रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात असताना केंद्र सरकारच्या मध्यस्थीमुळे भाव आटोक्यात राहिले. पण अतिरिक्त पावसाचा फटका उत्तर प्रदेशातील बटाटे उत्पादकांना बसला. आगरा आणि कानपूर येथून आवक असून किरकोळमध्ये भाव ३० रुपये किलोवर पोहोचले आहेत. दररोज १५ ते २० ट्रकची आवक आहे. कळमन्यात चांगल्या प्रतीच्या पांढऱ्या कांद्याचे दर प्रतिकिलो २० ते २२ रुपये असून लाल कांद्याचे भाव १६ ते १७ रुपये आहेत. किरकोळमध्ये ग्राहकांना दर्जानुसार २० ते ३० रुपयांदरम्यान खरेदी करावी लागत आहे. सध्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नवीन कांदे बाजारात येत आहेत. या राज्यातील कांद्याला महाराष्ट्रात चांगला भाव मिळतो. त्यामुळेच एका ट्रकच्या वाहतुकीसाठी २५ हजार रुपये खर्च येत असतानाही तेथील उत्पादक कळमन्यात कांदे विक्रीसाठी आणतात. दररोज पाच ट्रक येत आहेत. महाराष्ट्रातील कांदा दिवाळीनंतर येईल. कांद्याची आवक वाढल्यानंतर भाव उतरतील, अशी शक्यता कळमना बाजारातील आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली.काहीच भाज्या आटोक्यातमध्यंतरी आलेल्या पावसामुळे बहुतांश भाज्या खराब झाल्या आहेत. त्याच कारणाने भाव आकाशाला भिडले आहे. काही दिवसात आवक वाढल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. कारले, पालक, परवळ, सिमला मिरची, तोंडले या भाज्यांकडे महागाईमुळे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट वाढले आहे. पावसाने उघाड दिल्यानंतर पत्ताकोबी, चवळी शेंग, भेंडी, कोहळे या भाज्यांचे दर आटोक्यात आले. आवक कमी असल्याने किरकोळच नव्हे तर ठोक बाजारातही भाज्या महाग असल्याची माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)