शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्षात भाज्या महागल्या

By admin | Updated: September 22, 2014 00:57 IST

ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईने उच्छाद मांडला असून, ६० ते ८० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या सांभार आणि हिरव्या मिरचीने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.

दिवाळीपर्यंत भाव कमी होणार : आवक घटलीनागपूर : ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईने उच्छाद मांडला असून, ६० ते ८० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या सांभार आणि हिरव्या मिरचीने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ठोक बाजारात भाज्या आटोक्यात असल्या तरीही पितृपंधरवड्यात किरकोळमध्ये महागच आहेत. ही परिस्थिती केव्हा सुधारणार, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. तीन महिन्यांपासून कांदे, बटाट्याचे भाव स्थिरतीन महिन्यांपासून कळमना ठोक बाजारात कांदे आणि बटाट्याचे भाव स्थिर आहेत. मध्यंतरी कांदे पुन्हा ५०-६० रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात असताना केंद्र सरकारच्या मध्यस्थीमुळे भाव आटोक्यात राहिले. पण अतिरिक्त पावसाचा फटका उत्तर प्रदेशातील बटाटे उत्पादकांना बसला. आगरा आणि कानपूर येथून आवक असून किरकोळमध्ये भाव ३० रुपये किलोवर पोहोचले आहेत. दररोज १५ ते २० ट्रकची आवक आहे. कळमन्यात चांगल्या प्रतीच्या पांढऱ्या कांद्याचे दर प्रतिकिलो २० ते २२ रुपये असून लाल कांद्याचे भाव १६ ते १७ रुपये आहेत. किरकोळमध्ये ग्राहकांना दर्जानुसार २० ते ३० रुपयांदरम्यान खरेदी करावी लागत आहे. सध्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नवीन कांदे बाजारात येत आहेत. या राज्यातील कांद्याला महाराष्ट्रात चांगला भाव मिळतो. त्यामुळेच एका ट्रकच्या वाहतुकीसाठी २५ हजार रुपये खर्च येत असतानाही तेथील उत्पादक कळमन्यात कांदे विक्रीसाठी आणतात. दररोज पाच ट्रक येत आहेत. महाराष्ट्रातील कांदा दिवाळीनंतर येईल. कांद्याची आवक वाढल्यानंतर भाव उतरतील, अशी शक्यता कळमना बाजारातील आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली.काहीच भाज्या आटोक्यातमध्यंतरी आलेल्या पावसामुळे बहुतांश भाज्या खराब झाल्या आहेत. त्याच कारणाने भाव आकाशाला भिडले आहे. काही दिवसात आवक वाढल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. कारले, पालक, परवळ, सिमला मिरची, तोंडले या भाज्यांकडे महागाईमुळे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट वाढले आहे. पावसाने उघाड दिल्यानंतर पत्ताकोबी, चवळी शेंग, भेंडी, कोहळे या भाज्यांचे दर आटोक्यात आले. आवक कमी असल्याने किरकोळच नव्हे तर ठोक बाजारातही भाज्या महाग असल्याची माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)