शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या वादात अभियंत्याचा बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 22:11 IST

महापालिकेत गेल्या काही महिन्यापासून प्रशासन व पदाधिकारी यांच्यात वाद सुरू आहे. या वादाचा फटका कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना बसला आहे. नोकरीवरून कमी केल्याने लॉकडाऊन कालावधीत त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत गेल्या काही महिन्यापासून प्रशासन व पदाधिकारी यांच्यात वाद सुरू आहे. या वादाचा फटका कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना बसला आहे. नोकरीवरून कमी केल्याने लॉकडाऊन कालावधीत त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.महापालिकेत मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यात विविध विभागातील कनिष्ठ अभियंत्यांचाही समावेश आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेल्या सिमेंट रोडच्या कामावर याचा परिणाम होऊ नये, यासाठी दीड वर्षापूर्वी ५८ कनिष्ठ अभियंत्यांची कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती करण्यात आली होती. यात राज्याच्या विविध जिल्ह्यातील अभियंत्यांचा समावेश आहे. १५ ते २५ हजार रुपये वेतन मिळत होते. भविष्यात महापालिकेत कायम केले जाईल या आशेने ते कंत्राटी पध्दतीवर काम करीत होते. वेतन कमी असल्याने काही जण एकाच खोलीत भाड्याने राहात असून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत.जानेवारी २०१९ मध्ये या कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जानेवारीत त्यांचे कंत्राट संपल्याने मनपा प्रशासनाने मुदतवाढ दिली. या बाबतचा प्रस्ताव एप्रिल महिन्यात स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. प्रस्ताव योग्य प्रकारे न पाठविल्याने फेरप्रस्ताव पाठविण्यात यावा, अशा अभिप्रायासह हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविण्यात आला. प्रशासनाने स्थायी समितीकडे सुधारित प्रस्ताव न पाठविता या कनिष्ठ अभियंत्यांना कामावरून कमी करण्याची नोटीस बजावली आहे.मनपा आयुक्त व पदाधिकारी यांच्यात गेल्या काही महिन्यापासून वाद सुरू आहे. आयुक्त विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. या वादात कनिष्ठ अभियंत्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कामावर कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.संगणक ऑपरेटर चिंतेतकनिष्ठ अभियंता यांना कमी केल्याने मनपात विविध विभागात कार्यरत असलेले २५० कंत्राटी संगणक ऑपरेटर चिंतेत आहेत. कंत्राट न वाढविल्यास त्यांनाही बेरोजगार व्हावे लागणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका