शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 04:04 IST

नागपूर : मानकापूर येथील बाबा फरीदनगर येथे राहणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी ...

नागपूर : मानकापूर येथील बाबा फरीदनगर येथे राहणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. आयुष अजयकुमार यादव (१९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.. आयुषचे वडील रेल्वेत अधिकारी आहेत. तर आई प्राध्यापिका आहे..

मिळालेल्या माहितीनुसार आयुष रामदेवबाबा इंजिनियरिंग महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. वडील ड्युटीवर गेल्यानंतर आई सुद्धा दुपारी १२.३० वाजता खरेदीसाठी बाजारात गेली होती. यानंतर आयुषने गळफास घेतला. दुपारी ३.३० वाजता आई घरी परत आली. खूप वेळपर्यंत दरवाजाची बेल वाजवल्यानंतरही आयुषने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अखेर आईने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. शेजारी व त्यांच्याकडे काम करणाऱ्या पेंटरच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा आयुष फासावर लटकलेला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मानकापूरचे पीएसआय नाईक, हवालदार प्रमोद दिघोरे आणि राजकुमार श्रीखंडे घटनास्थळी पोहोचले. असे सांगितले जाते की, आयुषला आयआयटीमध्ये जायचे होते. जेई मेन्समध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने त्याला प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे तो नैराश्यात होता. त्याच्या आत्महत्येमुळे आईवडील व परिसरातील लोकांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.