शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता तरुणीचे अपहरण करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:45 IST

मुंबईत जॉब करणाºया नागपुरातील एका पोलीस कर्मचाºयाच्या अभियंता मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याच्या वार्तेने नागपुरात खळबळ निर्माण झाली आहे. अंकिता सुनील कनोजिया (वय २२) असे तिचे नाव आहे.

ठळक मुद्देहवालदाराची मुलगी : मुंबईत करायची जॉब : ठाण्यातून अपहरण, गोव्यात हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईत जॉब करणाºया नागपुरातील एका पोलीस कर्मचाºयाच्या अभियंता मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याच्या वार्तेने नागपुरात खळबळ निर्माण झाली आहे. अंकिता सुनील कनोजिया (वय २२) असे तिचे नाव आहे. हे धक्कादायक वृत्त कळल्यानंतर येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी पोलिसांकडून माहिती मिळविण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत होते.सुनील ऊर्फ बबलू कनोजिया नामक हवालदार पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांची मुलगी अंकिता हिने वायसीसी कॉलेजमधून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नुकतीच ती मुंबईतील विक्रोळी भागात एका कंपनीत तिची नियुक्ती झाली होती. १५ आॅगस्टला अंकिताला तिचे वडील सुनील कनोजिया यांनी मुंबईला नेऊन सोडले. जवळपास रोजच ती आपल्या परिवारातील सदस्यांसोबत फोनवरून संपर्कात होती. ३ सप्टेंबरला रात्री आणि ४ सप्टेंबरला सकाळी तिचे तिच्या वडिलांसोबत बोलणे झाले. त्यानंतर मात्र तिचा मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची कॅसेट वाजत होती. मोबाईल खराब झाला असावा, असे समजून कुटुंबीयांनी फारसे मनावर घेतले नाही. सोमवारी रात्रीही प्रयत्न केले, मात्र बोलणे झाले नाही. त्यानंतर आज सकाळी तसेच झाल्याने घरच्यांची चिंता वाढली. त्यांच्याकडून अंकिताबाबत माहिती काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास स्थानिक पोलिसांना अंकिताची हत्या झाल्याचे धक्कादायक वृत्त कळले. त्यामुळे येथे एकच खळबळ उडाली. कनोजिया परिवारासोबतच त्यांचे सहकारी आणि येथील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनीही प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वेगवेगळी माहिती पुढे येऊ लागली.लोकमतने यासंबंधाने रत्नागिरी पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी जुजबी स्वरूपाची माहिती दिली. मंगळवारी दुपारी तीन आरोपी रत्नागिरी ठाण्यात आले आणि त्यांनी एका तरुणीची हत्या केल्याचे सांगितले, पुढील तपास सुरू असल्याचे रत्नागिरीचेपोलीस अधीक्षक अशोक प्रणय यांनी सांगितले. यासंबंधाने अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी अंकिताची ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अपहरण केले. तिला आधी अंबरनाथ आणि नंतर गोव्याला नेऊन तिची हत्या केली आणि मृतदेह फेकून दिला. त्यानंतर आरोपींनी रत्नागिरी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.हत्या केली अन् गोव्याला गेलेउशिरा रात्री एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी अंबरनाथ येथील एका बहुमजली इमारतीच्या सदनिकेत अंकितावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अंकिताने तीव्र प्रतिकार करून आरडाओरड केली. त्यामुळे आरोपींनी तिचा गळा दाबून तिला ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह एका वाहनातून कर्नाटकच्या सीमेवर नेऊन फेकला. तेथून आरोपी गोव्याला गेले. तेथे मौजमजा केल्यानंतर ते रत्नागिरीला आले आणि त्यांनी आत्मसमर्पण केले. आरोपीमध्ये एका बिल्डरचा समावेश असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.