शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सेवाग्राम आश्रमातून मिळणारी ऊर्जा सर्वात मोठा आशीर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 19:02 IST

Wardha News राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केली.

ठळक मुद्देकापूस ते कापड उपक्रमाची घेतली माहिती

सेवाग्राम (वर्धा) : सेवाग्राम व पवनार आश्रमाला दरवर्षी मी भेट देत असते. या ठिकाणी ऊर्जा मिळत असून, हाच सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आपल्याला स्वातंत्र्य दिले याची जाणीव ठेवून त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. त्या वर्धा दौऱ्यावर असताना त्यांनी प्रारंभी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केली.

खासदार सुप्रिया सुळे यांचे सेवाग्राम आश्रमात आगमन होताच आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, मंत्री चतुरा रासकर, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे, उपसरपंच सुनील पनत आदींनी सूतमाळ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना सेवाग्राम आश्रमाला अद्याप जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळाला नाही, असा प्रश्न विचारला असता, सेवाग्राम आश्रम हे जागतिक पर्यटन नसून मोठा विचार आहे. त्याच विचार पद्धतीने त्याकडे पाहिले पाहिजे. बापूंनी भारतात ज्या गोष्टी केल्या आहेत, जी मूल्ये दिली, ती विचार आणि कृतीतून अंगीकारली पाहिजेत, असेही खा. सुळे यांनी सांगितले. त्यांनी सेवाग्राम आश्रम परिसरातील आदी निवास, बा व बापू कुटी, आखरी निवास, बापू दप्तरची पाहणी केली. तसेच महादेव कुटीतील कापूस ते कापड या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. आश्रमच्या मंत्री चतुरा रासकर यांनी संपूर्ण माहिती दिली. योवळी माजी आ. प्रा. सुरेश देशमुख, प्रदेश संपर्कप्रमुख सुबोध मोहिते, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, ॲड. सुधीर कोठारी, किशोर माथनकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अभिजित फाळके पाटील यांची उपस्थिती होती.

प्रमाणपत्राची सक्ती करू नये, खादी असरकारी असावी!

सेवाग्राम आश्रमात खादीचे उत्पादन गांधीजींच्या काळापासून परंपरागत सुरू आहे. खादी हा विचार, मूल्य, स्वावलंबन, आर्थिक विषमता दूर करण्याचे प्रभावी साधन असल्याने आजही आश्रमात कायम आहे; पण खादी व ग्रामोद्योग आयोग विभागीय कार्यालय, नागपूर यांनी आश्रमाला पत्र पाठवून खादी प्रमाणपत्र नसल्याने खादी उत्पादन बंद करण्यास सांगितले, अशी माहिती मंत्री चतुरा रासकर यांनी खा. सुप्रिया सुळे यांना दिली. तसेच प्रमाणपत्र घेणे सरकारचा नियम असला तरी खादी प्रमाणपत्राची सक्ती न करता खादी असरकारी असावी, यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती रासकर यांनी केली.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे