शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सेवाग्राम आश्रमातून मिळणारी ऊर्जा सर्वात मोठा आशीर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 19:02 IST

Wardha News राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केली.

ठळक मुद्देकापूस ते कापड उपक्रमाची घेतली माहिती

सेवाग्राम (वर्धा) : सेवाग्राम व पवनार आश्रमाला दरवर्षी मी भेट देत असते. या ठिकाणी ऊर्जा मिळत असून, हाच सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आपल्याला स्वातंत्र्य दिले याची जाणीव ठेवून त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. त्या वर्धा दौऱ्यावर असताना त्यांनी प्रारंभी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केली.

खासदार सुप्रिया सुळे यांचे सेवाग्राम आश्रमात आगमन होताच आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, मंत्री चतुरा रासकर, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे, उपसरपंच सुनील पनत आदींनी सूतमाळ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना सेवाग्राम आश्रमाला अद्याप जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळाला नाही, असा प्रश्न विचारला असता, सेवाग्राम आश्रम हे जागतिक पर्यटन नसून मोठा विचार आहे. त्याच विचार पद्धतीने त्याकडे पाहिले पाहिजे. बापूंनी भारतात ज्या गोष्टी केल्या आहेत, जी मूल्ये दिली, ती विचार आणि कृतीतून अंगीकारली पाहिजेत, असेही खा. सुळे यांनी सांगितले. त्यांनी सेवाग्राम आश्रम परिसरातील आदी निवास, बा व बापू कुटी, आखरी निवास, बापू दप्तरची पाहणी केली. तसेच महादेव कुटीतील कापूस ते कापड या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. आश्रमच्या मंत्री चतुरा रासकर यांनी संपूर्ण माहिती दिली. योवळी माजी आ. प्रा. सुरेश देशमुख, प्रदेश संपर्कप्रमुख सुबोध मोहिते, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, ॲड. सुधीर कोठारी, किशोर माथनकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अभिजित फाळके पाटील यांची उपस्थिती होती.

प्रमाणपत्राची सक्ती करू नये, खादी असरकारी असावी!

सेवाग्राम आश्रमात खादीचे उत्पादन गांधीजींच्या काळापासून परंपरागत सुरू आहे. खादी हा विचार, मूल्य, स्वावलंबन, आर्थिक विषमता दूर करण्याचे प्रभावी साधन असल्याने आजही आश्रमात कायम आहे; पण खादी व ग्रामोद्योग आयोग विभागीय कार्यालय, नागपूर यांनी आश्रमाला पत्र पाठवून खादी प्रमाणपत्र नसल्याने खादी उत्पादन बंद करण्यास सांगितले, अशी माहिती मंत्री चतुरा रासकर यांनी खा. सुप्रिया सुळे यांना दिली. तसेच प्रमाणपत्र घेणे सरकारचा नियम असला तरी खादी प्रमाणपत्राची सक्ती न करता खादी असरकारी असावी, यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती रासकर यांनी केली.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे