शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

अखेरपर्यंत लढा देऊन संभाजींनी स्वराज्याला उंचीवर नेले : नितीन बानगुडे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:41 IST

छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात निपुण होऊन स्वराज्याचे हित जोपासले. एकेक मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. सैन्य वाढविले, किल्ले ताब्यात घेतले. अखेरपर्यंत औरंगजेबाशी झुंज देऊन त्याच्या नाकीनऊ आणले. स्वराज्याचा विस्तार करून नऊ राज्य ताब्यात घेत संभाजी महाराजांनी स्वराज्याला उंचीवर नेले, असे प्रतिपादन सातारा येथील शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.

ठळक मुद्दे‘संभाजी महाराजांचा राष्ट्रधर्म’ यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात निपुण होऊन स्वराज्याचे हित जोपासले. एकेक मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. सैन्य वाढविले, किल्ले ताब्यात घेतले. अखेरपर्यंत औरंगजेबाशी झुंज देऊन त्याच्या नाकीनऊ आणले. स्वराज्याचा विस्तार करून नऊ राज्य ताब्यात घेत संभाजी महाराजांनी स्वराज्याला उंचीवर नेले, असे प्रतिपादन सातारा येथील शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.सन्मित्र सभा, नागपूरच्यावतीने दक्षिण अंबाझरी मार्गावरील मुंडले सभागृहात ‘संभाजी महाराजांचा राष्ट्रधर्म’ या विषयावर प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मंगेश काशीकर होते. व्यासपीठावर सन्मित्र सभेचे अध्यक्ष डॉ. संजय घटाटे, अरविंद गरुड उपस्थित होते. प्रा. नितीन बानगुडे-पाटील म्हणाले, कामाचे नियोजन महत्त्वाचे असून नियोजनाद्वारेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. मातृछत्र हरविल्यानंतर संभाजी महाराज जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रात निपुण झाले. १६ भाषांवर प्रभुत्व मिळविले. शिवाजी महाराजांनी हवा तसा आपला पुत्र घडविला. साडेआठ वर्षांचे असताना संभाजींचा राजकारणात प्रवेश झाला. आग्रा येथून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटताना संभाजींनी शिवाजी महाराजांना तुमची स्वराज्याला गरज आहे, तुम्ही पुढे जा, असे सांगून आपल्या राष्ट्रधर्माचा परिचय दिला. पुढे संभाजी महाराज खटल्यांचा निकाल देऊ लागले. दान प्रमुख करून शिवाजी महाराजांनी त्यांना दानाचे महत्त्व शिकविले. संभाजी महाराजांवर कुठलाही डाग नव्हता. त्यांच्या आयुष्यात राणी येसुबाई शिवाय दुसरी कोणतीही स्त्री नव्हती. परंतु चुकीचा इतिहास रंगवून त्यांना नाटक, चित्रपटातून बदनाम करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, संभाजींवर दिलेरखानाला जाऊन मिळाल्याचा आरोप करण्यात येतो. परंतु प्रत्यक्षात शिवाजींनीच त्यांना राष्ट्रहितासाठी दिलेरखानाकडे पाठविले. संभाजी पन्हाळ्यात कैदेत होते, असा आरोप होतो. परंतु ते कधीही कैदेत नव्हते.राजारामच्या लग्नाला न येण्यामागे ते बुऱ्हाणपुराच्या लढाईत व्यस्त असल्याचे कारण होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य ताब्यात घेऊ अशी औरंगजेबाची भूमिका होती. परंतु संभाजी महाराजांनी अखेरपर्यंत त्याला स्वराज्यात प्रवेश करू दिला नाही. एकटा रामशेज किल्ला घेण्यासाठी पाच वर्षे झुंजवत ठेवले. गोवा, तामिळनाडु, कोलकाता, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार अशा नऊ राज्यांवर भगवा फडकवून अखेरपर्यंत स्वराज्यासाठी झुंज दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. संजय घटाटे यांनी केले. यावेळी डॉ. धनंजय मोडक यांनी सन्मित्र सभेची प्रार्थना म्हटली. सोमलवार निकालसच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन शिल्पा नंदनपवार यांनी केले. आभार अरविंद गरुड यांनी मानले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीnagpurनागपूर