शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

अखेरपर्यंत लढा देऊन संभाजींनी स्वराज्याला उंचीवर नेले : नितीन बानगुडे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:41 IST

छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात निपुण होऊन स्वराज्याचे हित जोपासले. एकेक मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. सैन्य वाढविले, किल्ले ताब्यात घेतले. अखेरपर्यंत औरंगजेबाशी झुंज देऊन त्याच्या नाकीनऊ आणले. स्वराज्याचा विस्तार करून नऊ राज्य ताब्यात घेत संभाजी महाराजांनी स्वराज्याला उंचीवर नेले, असे प्रतिपादन सातारा येथील शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.

ठळक मुद्दे‘संभाजी महाराजांचा राष्ट्रधर्म’ यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात निपुण होऊन स्वराज्याचे हित जोपासले. एकेक मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. सैन्य वाढविले, किल्ले ताब्यात घेतले. अखेरपर्यंत औरंगजेबाशी झुंज देऊन त्याच्या नाकीनऊ आणले. स्वराज्याचा विस्तार करून नऊ राज्य ताब्यात घेत संभाजी महाराजांनी स्वराज्याला उंचीवर नेले, असे प्रतिपादन सातारा येथील शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.सन्मित्र सभा, नागपूरच्यावतीने दक्षिण अंबाझरी मार्गावरील मुंडले सभागृहात ‘संभाजी महाराजांचा राष्ट्रधर्म’ या विषयावर प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मंगेश काशीकर होते. व्यासपीठावर सन्मित्र सभेचे अध्यक्ष डॉ. संजय घटाटे, अरविंद गरुड उपस्थित होते. प्रा. नितीन बानगुडे-पाटील म्हणाले, कामाचे नियोजन महत्त्वाचे असून नियोजनाद्वारेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. मातृछत्र हरविल्यानंतर संभाजी महाराज जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रात निपुण झाले. १६ भाषांवर प्रभुत्व मिळविले. शिवाजी महाराजांनी हवा तसा आपला पुत्र घडविला. साडेआठ वर्षांचे असताना संभाजींचा राजकारणात प्रवेश झाला. आग्रा येथून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटताना संभाजींनी शिवाजी महाराजांना तुमची स्वराज्याला गरज आहे, तुम्ही पुढे जा, असे सांगून आपल्या राष्ट्रधर्माचा परिचय दिला. पुढे संभाजी महाराज खटल्यांचा निकाल देऊ लागले. दान प्रमुख करून शिवाजी महाराजांनी त्यांना दानाचे महत्त्व शिकविले. संभाजी महाराजांवर कुठलाही डाग नव्हता. त्यांच्या आयुष्यात राणी येसुबाई शिवाय दुसरी कोणतीही स्त्री नव्हती. परंतु चुकीचा इतिहास रंगवून त्यांना नाटक, चित्रपटातून बदनाम करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, संभाजींवर दिलेरखानाला जाऊन मिळाल्याचा आरोप करण्यात येतो. परंतु प्रत्यक्षात शिवाजींनीच त्यांना राष्ट्रहितासाठी दिलेरखानाकडे पाठविले. संभाजी पन्हाळ्यात कैदेत होते, असा आरोप होतो. परंतु ते कधीही कैदेत नव्हते.राजारामच्या लग्नाला न येण्यामागे ते बुऱ्हाणपुराच्या लढाईत व्यस्त असल्याचे कारण होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य ताब्यात घेऊ अशी औरंगजेबाची भूमिका होती. परंतु संभाजी महाराजांनी अखेरपर्यंत त्याला स्वराज्यात प्रवेश करू दिला नाही. एकटा रामशेज किल्ला घेण्यासाठी पाच वर्षे झुंजवत ठेवले. गोवा, तामिळनाडु, कोलकाता, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार अशा नऊ राज्यांवर भगवा फडकवून अखेरपर्यंत स्वराज्यासाठी झुंज दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. संजय घटाटे यांनी केले. यावेळी डॉ. धनंजय मोडक यांनी सन्मित्र सभेची प्रार्थना म्हटली. सोमलवार निकालसच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन शिल्पा नंदनपवार यांनी केले. आभार अरविंद गरुड यांनी मानले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीnagpurनागपूर