शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

अखेरपर्यंत लढा देऊन संभाजींनी स्वराज्याला उंचीवर नेले : नितीन बानगुडे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:41 IST

छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात निपुण होऊन स्वराज्याचे हित जोपासले. एकेक मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. सैन्य वाढविले, किल्ले ताब्यात घेतले. अखेरपर्यंत औरंगजेबाशी झुंज देऊन त्याच्या नाकीनऊ आणले. स्वराज्याचा विस्तार करून नऊ राज्य ताब्यात घेत संभाजी महाराजांनी स्वराज्याला उंचीवर नेले, असे प्रतिपादन सातारा येथील शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.

ठळक मुद्दे‘संभाजी महाराजांचा राष्ट्रधर्म’ यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात निपुण होऊन स्वराज्याचे हित जोपासले. एकेक मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. सैन्य वाढविले, किल्ले ताब्यात घेतले. अखेरपर्यंत औरंगजेबाशी झुंज देऊन त्याच्या नाकीनऊ आणले. स्वराज्याचा विस्तार करून नऊ राज्य ताब्यात घेत संभाजी महाराजांनी स्वराज्याला उंचीवर नेले, असे प्रतिपादन सातारा येथील शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.सन्मित्र सभा, नागपूरच्यावतीने दक्षिण अंबाझरी मार्गावरील मुंडले सभागृहात ‘संभाजी महाराजांचा राष्ट्रधर्म’ या विषयावर प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मंगेश काशीकर होते. व्यासपीठावर सन्मित्र सभेचे अध्यक्ष डॉ. संजय घटाटे, अरविंद गरुड उपस्थित होते. प्रा. नितीन बानगुडे-पाटील म्हणाले, कामाचे नियोजन महत्त्वाचे असून नियोजनाद्वारेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. मातृछत्र हरविल्यानंतर संभाजी महाराज जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रात निपुण झाले. १६ भाषांवर प्रभुत्व मिळविले. शिवाजी महाराजांनी हवा तसा आपला पुत्र घडविला. साडेआठ वर्षांचे असताना संभाजींचा राजकारणात प्रवेश झाला. आग्रा येथून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटताना संभाजींनी शिवाजी महाराजांना तुमची स्वराज्याला गरज आहे, तुम्ही पुढे जा, असे सांगून आपल्या राष्ट्रधर्माचा परिचय दिला. पुढे संभाजी महाराज खटल्यांचा निकाल देऊ लागले. दान प्रमुख करून शिवाजी महाराजांनी त्यांना दानाचे महत्त्व शिकविले. संभाजी महाराजांवर कुठलाही डाग नव्हता. त्यांच्या आयुष्यात राणी येसुबाई शिवाय दुसरी कोणतीही स्त्री नव्हती. परंतु चुकीचा इतिहास रंगवून त्यांना नाटक, चित्रपटातून बदनाम करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, संभाजींवर दिलेरखानाला जाऊन मिळाल्याचा आरोप करण्यात येतो. परंतु प्रत्यक्षात शिवाजींनीच त्यांना राष्ट्रहितासाठी दिलेरखानाकडे पाठविले. संभाजी पन्हाळ्यात कैदेत होते, असा आरोप होतो. परंतु ते कधीही कैदेत नव्हते.राजारामच्या लग्नाला न येण्यामागे ते बुऱ्हाणपुराच्या लढाईत व्यस्त असल्याचे कारण होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य ताब्यात घेऊ अशी औरंगजेबाची भूमिका होती. परंतु संभाजी महाराजांनी अखेरपर्यंत त्याला स्वराज्यात प्रवेश करू दिला नाही. एकटा रामशेज किल्ला घेण्यासाठी पाच वर्षे झुंजवत ठेवले. गोवा, तामिळनाडु, कोलकाता, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार अशा नऊ राज्यांवर भगवा फडकवून अखेरपर्यंत स्वराज्यासाठी झुंज दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. संजय घटाटे यांनी केले. यावेळी डॉ. धनंजय मोडक यांनी सन्मित्र सभेची प्रार्थना म्हटली. सोमलवार निकालसच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन शिल्पा नंदनपवार यांनी केले. आभार अरविंद गरुड यांनी मानले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीnagpurनागपूर