शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

मणप्पुरम गोल्ड दरोड्यातील गुंडाचे बिहारमध्ये एन्काऊंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 12:08 IST

जरीपटक्यातील मणप्पुरम गोल्ड बँकेत पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालून तेथील ३१ किलो सोने तसेच १० लाखांची रोकड लुटणाऱ्या सुबोधसिंग टोळीतील प्रमूख गुंड मनीषकुमार सिंग याला बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने (एसटीएफ) एन्काऊंटरमध्ये ठार मारले.

ठळक मुद्देएसटीएफसोबत झाली चकमक तिघांची शरणागती, मोठा शस्त्रसाठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील मणप्पुरम गोल्ड बँकेत पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालून तेथील ३१ किलो सोने तसेच १० लाखांची रोकड लुटणाऱ्या सुबोधसिंग टोळीतील प्रमूख गुंड मनीषकुमार सिंग याला बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने (एसटीएफ) एन्काऊंटरमध्ये ठार मारले. यावेळी मनीषकुमारच्या तीन साथीदारांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यांच्याकडून एके-४७ सह पिस्तूल आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.जरीपटक्यातील मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयात शिरून बिहारचा मोस्ट वाँटेड गुंड सुबोध सिंग आणि त्याच्या साथीदारांनी २८ सप्टेंबर २०१६ ला ३१ किलो सोने तसेच १० लाख रुपये लुटून नेले होते. राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या या लुटमारीत कुख्यात सुबोध सिंगसोबत बिहारमधील कुख्यात दरोडेखोर मनीष सिंग सहभागी होता.या टोळीने नंतर कोलकाता, मुझफ्फरपूर, कोटा, बालासोरसह अनेक ठिकाणच्या खासगी फायनान्स कंपनीत दरोडे घालून १७५ किलो सोने लुटून नेले होते. नागपूर पोलिसांनी सुबोध आणि मनीष सिंगला अटक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र तो हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी सुबोधची पत्नी जान्हवी हिला अटकही केली होती.तिकडे सुबोध-मनीष सिंगच्या टोळीने महाराष्ट्रासह कोलकाता, बिहार, चेन्नई, पंजाब या राज्यात सोने लुटण्याचा सपाटाच लावला होता. परिणामी देशभरातील ठिकठिकाणचे पोलीस या टोळीचा शोध घेत होते. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात बहलोलपूर दियारा परिसरात स्पेशल टास्क फोर्स(एसटीएफ)ने मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिवारी पहाटे मनीष सिंग साथीदारांसह लपून बसलेल्या ठिकाणी छापा घातला. पोलिसांची कुणकुण लागताच त्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात एसटीएफने केलेल्या गोळीबारात मनीष सिंग आणि त्याचे दोन साथीदार ठार झाले तर, तिघांनी नंतर एसटीएफसमोर शरणागती पत्करली.

महिनाभर शोधाशोधरविवारी भल्या सकाळी ही बातमी व्हायरल झाली. नागपूर पोलिसांनाही त्याची माहिती कळाली. सुबोध आणि मनीष सिंगचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे एपीआय ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या नेतृत्वात एक पोलीस पथक तब्बल महिनाभर बिहारमध्ये छापेमारी करीत फिरले. मात्र, हे दरोडेखोर त्यांच्या हाती लागले नव्हते. अखेर आज मनीष सिंग एसटीएफकडून मारला गेल्याचेच वृत्त नागपूर पोलिसांना कळले.

टोळी संपली !सोन्यावर कर्ज (गोल्ड लोन) देणाऱ्या मणप्पुरम, मुथ्थुट फायनान्ससारख्या देशातील विविध शहरात असलेल्या वित्तीय संस्थांमध्ये पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालून सोने लुटण्यासाठी कुख्यात सुबोध-मनीष सिंगची टोळी कुप्रसिद्ध आहे. टोळीचा म्होरक्या सुबोध सध्या बिहारमधील पटना कारागृहात बंदिस्त असून, चार ते पाच जण अन्य कारागृहात बंदिस्त आहेत. सुबोधला ताब्यात घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केले मात्र, बिहार पोलिसांनी दाद दिली नाही. त्यामुळे त्याला नागपुरात आणता आले नाही. दुसरीकडे सुबोधसह अन्य साथीदार कारागृहात असूनही ही टोळी संचलित करणारा मनीष सिंग आणि अन्य दोघे एसटीएफकडून बिहारमध्ये मारले गेल्याने आणि तिघांनी शरणागती पत्करल्याने आता ही टोळी संपल्यात जमा झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी