शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

मातृत्वाचे स्वागत करताना आहाराइतकीच भावनिक आंदोलनेही महत्त्वाची मानली जावी - डॉ. प्रभा चंद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 19:56 IST

गरोदर स्त्रीच्या मनोआरोग्याचेही महत्त्व जाणण्याची गरज बंगळुरु येथील निम्हान्समधील (नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूरो सायन्सेस) आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रभा चंद्रा यांनी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देअन्य देशांमध्ये आहार व मानसिक आरोग्याचा साकल्याने होतो विचारआपण प्रत्युत्तरवादी झालो आहोत

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गरोदर स्त्रीच्या आहाराबाबत आपला देश थोडाफार सजग झाला असला तरी तिच्या मानसिक आरोग्याबाबत मात्र आपण इतर देशांच्या तुलनेत अजूनही फार मागे आहोत असे प्रतिपादन करतानाच तिच्या मनोआरोग्याचेही महत्त्व जाणण्याची गरज बंगळुरु येथील निम्हान्समधील (नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूरो सायन्सेस) आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रभा चंद्रा यांनी येथे व्यक्त केली. नागपुरात भारतीय स्त्री शक्तीच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी त्या येथे आल्या होत्या.गरोदर स्त्रिया जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांना, तुम्ही इथे कशा पोहचलात असा प्रश्न विचारतो. त्यावरची त्यांची उत्तरे फार अंतर्मुख करणारी असतात. आजही आपल्या देशात स्त्रियांना प्रेग्नन्सी ही नियोजनपूर्वकरित्या आखता येत नाही. ती त्यांच्यावर लादली जाते किंवा ती अपघाताने त्यांच्या आयुष्यात येते. त्या मानसिकदृष्ट्या मातृत्वासाठी तयारच नसतात. अशात प्रेग्नन्सीमुळे होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे होणारी भावनिक आंदोलने सांभाळण्याचे कसब त्यांच्यात तर नसतेच पण त्यांच्या कुटुंबियांनाही त्याचे महत्त्व वाटत नसते.अनेक देशांमध्ये तेथील गरोदर स्त्रियांच्या आहारासोबत त्यांच्या आनंदी राहण्याबाबतही तेथील वैद्यक क्षेत्र व सरकार सजग असते. त्यादृष्टीने तेथे आहार व विहार सुचविला जातो. आपल्याकडे या सगळ््याच बाबीची उणीव आहे.अलीकडची पिढी ही प्रत्युत्तरवादी (रिअ‍ॅक्टिव्ह) झाली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या हाती सदैव असलेला मोबाईल होय. कुठल्याही स्टेटसला तात्काळ उत्तर देण्याची जी सवय मनाला जडली आहे त्यामुळे आपण आपल्या आत्मप्रतिबिंबापासून फार दूर चाललो आहोत. सगळं काही बाहेरून आपल्यात कोसळत आहे. मात्र आपल्यातलं आतलं पाहणं आपण विसरत चाललो आहोत.कृतज्ञता हा मानवाचा फार मोठा गुण असून तोच आपण विसरत चाललो आहोत. आभार मानणे वा आभारी असणे हे शिकवले जात नाही. कोरड्या थँक्स पुरेसे नाहीत. ते मनापासून जाणवलं पाहिजे. तरंच माणसामाणसातले संबंध अधिक बळकट होतील. जगात सर्वत्र तणावाचे वातावरण वाढते आहे. त्याकरिता सकारात्मक मानसिकता वाढवणे व जपण्याची चळवळ सर्वत्र सुरू व्हायला हवी, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकास