शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

मातृत्वाचे स्वागत करताना आहाराइतकीच भावनिक आंदोलनेही महत्त्वाची मानली जावी - डॉ. प्रभा चंद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 19:56 IST

गरोदर स्त्रीच्या मनोआरोग्याचेही महत्त्व जाणण्याची गरज बंगळुरु येथील निम्हान्समधील (नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूरो सायन्सेस) आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रभा चंद्रा यांनी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देअन्य देशांमध्ये आहार व मानसिक आरोग्याचा साकल्याने होतो विचारआपण प्रत्युत्तरवादी झालो आहोत

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गरोदर स्त्रीच्या आहाराबाबत आपला देश थोडाफार सजग झाला असला तरी तिच्या मानसिक आरोग्याबाबत मात्र आपण इतर देशांच्या तुलनेत अजूनही फार मागे आहोत असे प्रतिपादन करतानाच तिच्या मनोआरोग्याचेही महत्त्व जाणण्याची गरज बंगळुरु येथील निम्हान्समधील (नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूरो सायन्सेस) आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रभा चंद्रा यांनी येथे व्यक्त केली. नागपुरात भारतीय स्त्री शक्तीच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी त्या येथे आल्या होत्या.गरोदर स्त्रिया जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांना, तुम्ही इथे कशा पोहचलात असा प्रश्न विचारतो. त्यावरची त्यांची उत्तरे फार अंतर्मुख करणारी असतात. आजही आपल्या देशात स्त्रियांना प्रेग्नन्सी ही नियोजनपूर्वकरित्या आखता येत नाही. ती त्यांच्यावर लादली जाते किंवा ती अपघाताने त्यांच्या आयुष्यात येते. त्या मानसिकदृष्ट्या मातृत्वासाठी तयारच नसतात. अशात प्रेग्नन्सीमुळे होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे होणारी भावनिक आंदोलने सांभाळण्याचे कसब त्यांच्यात तर नसतेच पण त्यांच्या कुटुंबियांनाही त्याचे महत्त्व वाटत नसते.अनेक देशांमध्ये तेथील गरोदर स्त्रियांच्या आहारासोबत त्यांच्या आनंदी राहण्याबाबतही तेथील वैद्यक क्षेत्र व सरकार सजग असते. त्यादृष्टीने तेथे आहार व विहार सुचविला जातो. आपल्याकडे या सगळ््याच बाबीची उणीव आहे.अलीकडची पिढी ही प्रत्युत्तरवादी (रिअ‍ॅक्टिव्ह) झाली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या हाती सदैव असलेला मोबाईल होय. कुठल्याही स्टेटसला तात्काळ उत्तर देण्याची जी सवय मनाला जडली आहे त्यामुळे आपण आपल्या आत्मप्रतिबिंबापासून फार दूर चाललो आहोत. सगळं काही बाहेरून आपल्यात कोसळत आहे. मात्र आपल्यातलं आतलं पाहणं आपण विसरत चाललो आहोत.कृतज्ञता हा मानवाचा फार मोठा गुण असून तोच आपण विसरत चाललो आहोत. आभार मानणे वा आभारी असणे हे शिकवले जात नाही. कोरड्या थँक्स पुरेसे नाहीत. ते मनापासून जाणवलं पाहिजे. तरंच माणसामाणसातले संबंध अधिक बळकट होतील. जगात सर्वत्र तणावाचे वातावरण वाढते आहे. त्याकरिता सकारात्मक मानसिकता वाढवणे व जपण्याची चळवळ सर्वत्र सुरू व्हायला हवी, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकास