शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

सोशल मीडियामुळे भावनांचा ओलावा संपला

By admin | Updated: July 27, 2015 04:07 IST

देशवासीयांसाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांना पैसे किंवा नावाचा कधीच मोह नसतो. त्यांना आपल्या

विवेक ओबेरॉय : भोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगील विजयदिन साजरानागपूर : देशवासीयांसाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांना पैसे किंवा नावाचा कधीच मोह नसतो. त्यांना आपल्या देशवासीयांकडून केवळ सन्मान हवा असतो. एवढे आपण त्यांना नक्की देऊ शकतो. परंतु आजच्या फेसबुक व व्हॉटस् अ‍ॅपच्या काळात भावनांचा ओलावाच संपला आहे. कारगील विजयासारख्या विशिष्ट दिवशी अनेक जण सोशल मीडियावर (फेसबुक व व्हॉटस् अ‍ॅपवर) सैनिकांना आदरांजली वाहणारी एखादी पोस्ट टाकून आपापल्या कामाला लागतात, असे मत चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉयने व्यक्त केले.नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित भोंसला मिलिटरी स्कूलतर्फे रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात कारगील विजयदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी तो सन्माननीय अतिथी म्हणून बोलत होता. कामठी येथील गार्डस् रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर डी. व्ही. सिंग प्रमुख अतिथी होते. संस्थेचे उपाध्यक्ष कुमार काळे, नागपूर विभागाचे सचिव तरुण पटेल, शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, कमांडंट कर्नल जे. एस. भंडारी व प्राचार्य ललित जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.कारगील विजयदिनासारख्या विशिष्ट प्रसंगीच आपल्यामध्ये देशभक्ती संचारते. तीन-चार दिवसांनंतर सर्वजण आपापल्या कामाला लागतात. देशाच्या संरक्षणासाठी सैनिक प्राणांची आहुती देतात, हे आपण विसरून जातो. आपण केवळ स्वत:चा विचार करणे सोडले पाहिजे. देशासाठी काय योगदान देता येईल, ही भावना प्रत्येकाच्या मनात असायला हवी, असे विवेक म्हणाला. त्याने भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांमधील शिस्त व संयमाची प्रशंसा केली. हे दोन गुण जीवनभर सोबत राहतात व त्याचा देशाला लाभ मिळतो. मी अभिनेता नसतो तर आर्मीत असतो, असे त्याने सांगितले.कारगील युद्धाबद्दल बोलताना डी. व्ही. सिंग म्हणाले, पाकिस्तानी घुसखोरांना श्रीनगरला लेहपासून तोडून संपूर्ण उत्तर भाग स्वत:च्या ताब्यात घ्यायचा होता. भारताला वेळेवर घुसखोरीची माहिती मिळाल्यामुळे त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ शकले नाही. कारगील युद्ध लढले गेले तो भाग अतिशय थंड असतो. या युद्धात लढलेल्या तुकड्यांचे नेतृत्व तरुण लेफ्टनंट व कॅप्टन्सनी केले होते. देशभक्ती त्यांची ताकद होती व भारतवासीयांच्या प्रेमामुळे त्यांना लढण्याची स्फूर्ती मिळत होती.कारगील युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा प्रशिक्षणादरम्यान सामान्य कॅडेटसारखेच होते. परंतु, युद्धभूमीवरून त्यांना ‘ये दिल माँगे मोअर’ असे म्हणताना एका चॅनेलवर पाहिल्यानंतर छाती अभिमानाने फुलली. अशीच स्फूर्ती, समर्पणभाव व परिश्रम करण्याची तयारी भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये पहायला मिळाली. या मुलांना मिलिटरी शाळेत टाकणारे पालकही देशभक्त आहेत. असे देशप्रेम सतत कायम राहिल्यास सैनिक कधीच या देशाला शत्रूच्या ताब्यात जाऊ देणार नाही. ते जाती-धर्माची बंधने तोडून देशाला पुढे घेऊन जातील असा विश्वास सिंग यांनी दिला. तरुण पटेल यांनी प्रास्ताविक केले तर, शैलेश जोगळेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाच्या व्हिडिओफितीचे प्रसारण करण्यात आले. (प्रतिनिधी)त्या सैनिकाला मदत करणे अभिमानास्पद४विवेक ओबेरॉयने एका सैनिकाला मदत केल्याची जुनी आठवण सांगितली. त्यावेळी विवेक १६ वर्षांचा होता. तो रेल्वेने मुंबईला परत येताना एक सैनिक, पत्नी व ६ महिन्यांच्या मुलासह त्याच्या डब्यात चढला. त्यांच्याकडे तिकीट होते पण, आरक्षण पक्के झाले नव्हते. यामुळे विवेकने सैनिकाच्या पत्नीला स्वत:चा बर्थ दिला व तो स्वत: खाली झोपला. कडाक्याच्या थंडीमुळे कुडकुडलो होतो पण, सैनिकाला मदत केल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे विवेकने सांगितले.सैनिकांवर चित्रपट काढण्याची घोषणा४विवेक ओबेरॉयने सैनिकांवर चित्रपट काढण्याची घोषणा कार्यक्रमात केली. या देशाचे सैनिक खरे हिरो आहेत. देशासाठी ते स्वत:च्या प्राणांची चिंता करीत नाही, असे तो म्हणाला. विवेकने दिलेल्या माहितीनुसार त्याचे आजोबा आर्मीत होते. ते पाकिस्तानविरुद्धच्या एका युद्धात लढले होते. आजोबांनी सांगितलेल्या युद्धकथा ऐकून शरीरावर रोमांच उभे होत होते, असे सांगून विवेकने सेंट्रल हिंदू मिलिटरी शिक्षण संस्थेला आवश्यक ती मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.