शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

इमर्जन्सी रुग्ण जीवनदायीपासून वंचित

By admin | Updated: March 16, 2015 02:30 IST

गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रु ग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळत आहे.

नागपूर : गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रु ग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळत आहे. परंतु या योजनेचे कार्यालय सहा ते आठ तासांसाठी उघडे राहत असल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत. विशेष म्हणजे, रात्री-बेरात्री लाभार्थी असलेल्या गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया करायची असेल तर त्याला याचा लाभ मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. गोरगरीब रु ग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली ही योजना नागपूर जिल्ह्यात तीन शासकीय रुग्णालयांसोबतच निवडक ३६ खासगी इस्पितळांमध्ये सुरू आहे. खासगी इस्पितळांत या योजनेतील आरोग्य मित्रांची वेळ ठराविक आहे. सकाळी ९ वाजता सुरू होणारे हे केंद्र सायंकाळी ५ वाजताच बंद होते. या वेळेत योजनेतील लाभार्थी आलाच तरच त्याला याचा लाभ मिळतो, अन्यथा त्याला पदरमोड करून उपचार घ्यावा लागतो किंवा दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागते. सूत्राने दिलेल्या महितीनुसार, एका इस्पितळात रात्री हृदयविकाराचा एक रुग्ण भरती झाला. त्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. रुग्णाचे नातेवाईक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया करण्याची विनंती करीत होते. परंतु डॉक्टर केंद्र बंद झाल्याचे कारण देत होते. पैसा जमा करा किंवा मेडिकलमध्ये न्या, असा सांगितले जात होते. अखेर रुग्णाच्या नातेवाईकांनी पैशांची जमवाजमव करून तिथेच उपचार घेतला. रुग्णाचा जीव वाचला तरी कर्जात अडकला. असेच प्रकार इतरही इस्पितळात होत असल्याच्या तक्रारी आहेत.नियमानुसार राजीव गांधी जीवनदायी योजनेत इमरजन्सी रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी केंद्र सुरू असण्याची गरज नाही. योजनेत समाविष्ट इस्पितळांना ‘इआयटी’ (इमरजन्सी टेलिफोनिक इन्टिमेशन) नंबर दिले आहेत. डॉक्टरांना या दूरध्वनीवरून फक्त माहिती देऊन लाभार्थ्यांवर उपचार सुरू करायचे असतात, तर रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक दस्तावेज ७२ तासांत इस्पितळे जमा करायचे असतात. परंतु काही खासगी इस्पितळे पैशाचा मोहापायी आणि कटकट कोण लावून घेणार यासाठी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)