शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

इमर्जन्सी रुग्ण जीवनदायीपासून वंचित

By admin | Updated: March 16, 2015 02:30 IST

गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रु ग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळत आहे.

नागपूर : गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रु ग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळत आहे. परंतु या योजनेचे कार्यालय सहा ते आठ तासांसाठी उघडे राहत असल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत. विशेष म्हणजे, रात्री-बेरात्री लाभार्थी असलेल्या गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया करायची असेल तर त्याला याचा लाभ मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. गोरगरीब रु ग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली ही योजना नागपूर जिल्ह्यात तीन शासकीय रुग्णालयांसोबतच निवडक ३६ खासगी इस्पितळांमध्ये सुरू आहे. खासगी इस्पितळांत या योजनेतील आरोग्य मित्रांची वेळ ठराविक आहे. सकाळी ९ वाजता सुरू होणारे हे केंद्र सायंकाळी ५ वाजताच बंद होते. या वेळेत योजनेतील लाभार्थी आलाच तरच त्याला याचा लाभ मिळतो, अन्यथा त्याला पदरमोड करून उपचार घ्यावा लागतो किंवा दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागते. सूत्राने दिलेल्या महितीनुसार, एका इस्पितळात रात्री हृदयविकाराचा एक रुग्ण भरती झाला. त्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. रुग्णाचे नातेवाईक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया करण्याची विनंती करीत होते. परंतु डॉक्टर केंद्र बंद झाल्याचे कारण देत होते. पैसा जमा करा किंवा मेडिकलमध्ये न्या, असा सांगितले जात होते. अखेर रुग्णाच्या नातेवाईकांनी पैशांची जमवाजमव करून तिथेच उपचार घेतला. रुग्णाचा जीव वाचला तरी कर्जात अडकला. असेच प्रकार इतरही इस्पितळात होत असल्याच्या तक्रारी आहेत.नियमानुसार राजीव गांधी जीवनदायी योजनेत इमरजन्सी रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी केंद्र सुरू असण्याची गरज नाही. योजनेत समाविष्ट इस्पितळांना ‘इआयटी’ (इमरजन्सी टेलिफोनिक इन्टिमेशन) नंबर दिले आहेत. डॉक्टरांना या दूरध्वनीवरून फक्त माहिती देऊन लाभार्थ्यांवर उपचार सुरू करायचे असतात, तर रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक दस्तावेज ७२ तासांत इस्पितळे जमा करायचे असतात. परंतु काही खासगी इस्पितळे पैशाचा मोहापायी आणि कटकट कोण लावून घेणार यासाठी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)