शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बदल्यांच्या मुद्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

By admin | Updated: February 26, 2015 02:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात काही कर्मचाऱ्यांच्या केवळ कागदोपत्री बदल्या करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत.

नागपूर: जिल्हाधिकारी कार्यालयात काही कर्मचाऱ्यांच्या केवळ कागदोपत्री बदल्या करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत. यामुळे महत्त्वाच्या टेबलवर नव्या लोकांना काम करण्याची संधीच नाकारली जाते, अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे.दर तीन वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असा नियम आहे. असे असतानाही जिल्ह्यातील महसूल सेवेत काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर काम करीत आहेत. वादग्रस्त प्रसंग घडला किंवा तक्रारी आल्या तर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. पण हे करताना कधी त्यांना कार्यमुक्त केले जात नाही किंवा बदली झाल्यवर कालांतराने पुन्हा तो क र्मचारी त्याच टेबलवर परत येईल, अशी तजवीज केली जाते. यामुळे एकीकडे कर्मचाऱ्याची बदली झाल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र स्थिती जैसे थे असते. अशी काही उदाहरणे जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात दिसून येते. ग्रामीण तहसील कार्यालयात एका कर्मचाऱ्याची बदली हिंगणा तालुक्यात झाली. पण त्याला कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे तो आहे त्याच जागेवर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही एका वादग्रस्त प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात बदली झाल्यावर पुन्हा काही महिन्यानंतर जुनाच टेबल त्याच्याकडे सोपवण्यात आला. निलंबन, सेवासंलग्नच्या काही प्रकरणात अशाच प्रकारचे सोयीचे निर्णय घेण्यात आले आहेत. वाहन चालकांच्या पदांबाबतही काही तक्रारी आल्या आहेत. बदली झाल्यावरही कार्यमुक्त न केल्याने काही अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी चालकच नसल्याने त्या उभ्या आहेत. नियम डावलून काम करण्यास नकार दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याला त्याच्या विभागातून इतरत्र हलविण्यात आले आहे.नवीन सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणात पारदर्शकता आणण्यासाठी पावले उचलली आहेत. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतानाही काही नियम आखून दिल्यास कर्मचाऱ्यांना नवीन टेबलवर काम करण्याची संधी मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)