शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बदल्यांच्या मुद्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

By admin | Updated: February 26, 2015 02:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात काही कर्मचाऱ्यांच्या केवळ कागदोपत्री बदल्या करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत.

नागपूर: जिल्हाधिकारी कार्यालयात काही कर्मचाऱ्यांच्या केवळ कागदोपत्री बदल्या करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत. यामुळे महत्त्वाच्या टेबलवर नव्या लोकांना काम करण्याची संधीच नाकारली जाते, अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे.दर तीन वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असा नियम आहे. असे असतानाही जिल्ह्यातील महसूल सेवेत काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर काम करीत आहेत. वादग्रस्त प्रसंग घडला किंवा तक्रारी आल्या तर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. पण हे करताना कधी त्यांना कार्यमुक्त केले जात नाही किंवा बदली झाल्यवर कालांतराने पुन्हा तो क र्मचारी त्याच टेबलवर परत येईल, अशी तजवीज केली जाते. यामुळे एकीकडे कर्मचाऱ्याची बदली झाल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र स्थिती जैसे थे असते. अशी काही उदाहरणे जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात दिसून येते. ग्रामीण तहसील कार्यालयात एका कर्मचाऱ्याची बदली हिंगणा तालुक्यात झाली. पण त्याला कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे तो आहे त्याच जागेवर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही एका वादग्रस्त प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात बदली झाल्यावर पुन्हा काही महिन्यानंतर जुनाच टेबल त्याच्याकडे सोपवण्यात आला. निलंबन, सेवासंलग्नच्या काही प्रकरणात अशाच प्रकारचे सोयीचे निर्णय घेण्यात आले आहेत. वाहन चालकांच्या पदांबाबतही काही तक्रारी आल्या आहेत. बदली झाल्यावरही कार्यमुक्त न केल्याने काही अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी चालकच नसल्याने त्या उभ्या आहेत. नियम डावलून काम करण्यास नकार दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याला त्याच्या विभागातून इतरत्र हलविण्यात आले आहे.नवीन सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणात पारदर्शकता आणण्यासाठी पावले उचलली आहेत. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतानाही काही नियम आखून दिल्यास कर्मचाऱ्यांना नवीन टेबलवर काम करण्याची संधी मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)