शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

नागपुरात मुस्लीम बांधवांचा एल्गार; संविधान बचाव रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 10:32 IST

शुक्रवारी नागपुरात मुस्लीम समाजाने भव्य अशी संविधान बचाव रॅली काढून संविधानाच्या संरक्षणाचा एल्गार केला.

ठळक मुद्देसीएए-एनसीआर रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकता संरक्षण कायद्या (सीएए) आणि येऊ घातलेला एनआरसी, एनपीआर च्या विरोधात मुस्लीम समाज देशभरात रस्त्यावर उतरला आहे. हा कायदा संविधानविरोधी असून आज संविधानच धोक्यात आले आहे. त्यामुळे सर्वप्रथम संविधान वाचवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नागपुरातही मुस्लीम समाजाने भव्य अशी संविधान बचाव रॅली काढून संविधानाच्या संरक्षणाचा एल्गार केला. या रॅलीमध्ये मुस्लीम समाजासोबतच बौद्ध, ख्रिश्चन, शिख, ओबीसी आदींसह विविध धर्माचे व समाजाचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नागरिकता संशोधन कायदा (सीएए) आणि त्यासोबतच एनआरसी व एनपीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी फारुखनगर येथून संविधान बचाव रॅली काढण्यात आली. ही रॅली आसीनगर, कमाल चौक, पाचपावली उड्डाणपूल, गोळीबार चौक, टिमकी, मोमीनपुरा, सीए रोड रामझुला, कस्तूरचंद पार्क होत संविधान चौकात पोहोचली. यावेळी प्रामुख्याने मुस्लीम धर्मगुरू मौलाना सय्यद आलमगीर अशरफ, शीख समाजाचे सरदार मलकीत सिंह, मुफ्ती मोहम्मद अकरम, बौद्ध धम्माचे भदंत सदानंद महाथेरो, भदंत ज्ञानबोधी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मौलाना आलमगीर अशरफ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या सरकारने नागरिकता संशोधन कायद्यात (सीएए) एका धर्माला वगळले आहे. या माध्यमातून सरकार देशातील एकता नष्ट करू पाहत आहे. धर्माच्या आधारावर कायदा करता येत नाही. त्यामुळे हा कायदा भारतीय संविधानाच्या विरुद्ध आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध आहे. यात उघडपणे भेदभाव केला गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आहे, त्यात समानता आहे. सरकार भारतीय संविधानाला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु देशातील जनता हे कधीही होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जेव्हापर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.यानंतर एका शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नावे एक निवेदन सोपवण्यात आले. यात नागरिकता संशोधन कायदा रद्द करणे, एनपीआर परत घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच पूर्वीप्रमाणे जनगणना करून एनआरसी रोखण्याची मागणी केली गेली.यावेळी जलील अंसारी, अकील अफसर, माजी मंत्री अनिस अहमद, नगरसेवक इब्राहिम टेलर, हाफिज अख्तर आलम अशरफी, हाफिज अब्दुल बासित, अतीक मालिक, पार्षद मनोज सांगोळे, हाजी आसिफ, इकबाल अंसारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :NCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्रcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक