शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

नागपुरात मुस्लीम बांधवांचा एल्गार; संविधान बचाव रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 10:32 IST

शुक्रवारी नागपुरात मुस्लीम समाजाने भव्य अशी संविधान बचाव रॅली काढून संविधानाच्या संरक्षणाचा एल्गार केला.

ठळक मुद्देसीएए-एनसीआर रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकता संरक्षण कायद्या (सीएए) आणि येऊ घातलेला एनआरसी, एनपीआर च्या विरोधात मुस्लीम समाज देशभरात रस्त्यावर उतरला आहे. हा कायदा संविधानविरोधी असून आज संविधानच धोक्यात आले आहे. त्यामुळे सर्वप्रथम संविधान वाचवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नागपुरातही मुस्लीम समाजाने भव्य अशी संविधान बचाव रॅली काढून संविधानाच्या संरक्षणाचा एल्गार केला. या रॅलीमध्ये मुस्लीम समाजासोबतच बौद्ध, ख्रिश्चन, शिख, ओबीसी आदींसह विविध धर्माचे व समाजाचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नागरिकता संशोधन कायदा (सीएए) आणि त्यासोबतच एनआरसी व एनपीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी फारुखनगर येथून संविधान बचाव रॅली काढण्यात आली. ही रॅली आसीनगर, कमाल चौक, पाचपावली उड्डाणपूल, गोळीबार चौक, टिमकी, मोमीनपुरा, सीए रोड रामझुला, कस्तूरचंद पार्क होत संविधान चौकात पोहोचली. यावेळी प्रामुख्याने मुस्लीम धर्मगुरू मौलाना सय्यद आलमगीर अशरफ, शीख समाजाचे सरदार मलकीत सिंह, मुफ्ती मोहम्मद अकरम, बौद्ध धम्माचे भदंत सदानंद महाथेरो, भदंत ज्ञानबोधी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मौलाना आलमगीर अशरफ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या सरकारने नागरिकता संशोधन कायद्यात (सीएए) एका धर्माला वगळले आहे. या माध्यमातून सरकार देशातील एकता नष्ट करू पाहत आहे. धर्माच्या आधारावर कायदा करता येत नाही. त्यामुळे हा कायदा भारतीय संविधानाच्या विरुद्ध आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध आहे. यात उघडपणे भेदभाव केला गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आहे, त्यात समानता आहे. सरकार भारतीय संविधानाला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु देशातील जनता हे कधीही होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जेव्हापर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.यानंतर एका शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नावे एक निवेदन सोपवण्यात आले. यात नागरिकता संशोधन कायदा रद्द करणे, एनपीआर परत घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच पूर्वीप्रमाणे जनगणना करून एनआरसी रोखण्याची मागणी केली गेली.यावेळी जलील अंसारी, अकील अफसर, माजी मंत्री अनिस अहमद, नगरसेवक इब्राहिम टेलर, हाफिज अख्तर आलम अशरफी, हाफिज अब्दुल बासित, अतीक मालिक, पार्षद मनोज सांगोळे, हाजी आसिफ, इकबाल अंसारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :NCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्रcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक