शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वीज न पोहोचलेल्या १११ गावांचे विद्युतीकरण प्रगतीपथावर; ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 20:53 IST

राज्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार ४० हजार ९५९ गावांचे विद्युतीकरण झाले असून पुनर्वसन किंवा इतर कारणामुळे बाकी राहिलेल्या १११ गावांचे विद्युतीकरण प्रगतीपथावर आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ट्रान्सफॉर्मर

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार ४० हजार ९५९ गावांचे विद्युतीकरण झाले असून पुनर्वसन किंवा इतर कारणामुळे बाकी राहिलेल्या १११ गावांचे विद्युतीकरण प्रगतीपथावर आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत दिली.आमदार शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, मनोहर भोईर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.मंत्री बावनकुळे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील ६६ तर नंदुरबार जिल्ह्यातील ३४ गावांचे विद्युतीकरण बाकी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ३४ पैकी ३३ गावे ही सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेली आहेत. तसेच अतिदुर्गम, डोंगराळ भागातील ७ तर पालघर, यवतमाळ, पुणे व रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी १ अशा १११ गावांचे विद्युतीकरण होणे बाकी आहे. यापैकी ५४ गावांचे विद्युतीकरण हे महावितरण कंपनीमार्फत तर ५७ गावांचे विद्युतीकरण हे महाऊर्जाद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे. आॅक्टोबर २०१७ अखेर महावितरण कंपनीमार्फत ५४ पैकी १४ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले असून महाऊर्जाद्वारे ५७ पैकी २८ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. उर्वरित गावांच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ट्रान्सफॉर्मरसदस्य सुनील केदार यांनी ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोरच ट्रान्सफॉर्मर असून त्यांच्या घराला तेथून वीज मिळत असल्याचा आरोप केला. दरम्यान ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आपल्या घरासमोर कुठलेही ट्रान्सफॉर्मर नसल्याचे स्पष्ट करीत हा आरोप खोडून काढला.

 

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे