शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

दिवाळीआधीच वीज संकट; राज्यातील नऊ युनिट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 10:16 IST

कोळसा कंपन्यांनी रेकॉर्ड उत्पादनाच्या दावा केला असला तरी महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र कोळशासाठी तडफडत आहेत. राज्यातील ९ वीज केंद्रातील युनिट कोळशाच्याअभावी पडले असून ११ युनिट प्रभावित झाले आहेत.

ठळक मुद्देनागपुरातील खापरखेड्यात एक, कोराडीतील दोन युनिट प्रभावित

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोळसा कंपन्यांनी रेकॉर्ड उत्पादनाच्या दावा केला असला तरी महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र कोळशासाठी तडफडत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, राज्यातील ९ वीज केंद्रातील युनिट कोळशाच्याअभावी पडले असून ११ युनिट प्रभावित झाले आहेत.महाजेनकोच्या अहवालानुसार भुसावळ औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ३, चंद्रपूर वीज केंद्रातील ५, ३, ८ आणि ९, खापरखेड्यातील १, कोराडीतील ६ आणि ७ तर परळी येथील ७ क्रमांकाच्या युनिटमधील वीज उत्पादन कोळशाअभावी रोखण्यात आले आहे. त्याचप्रकारे भुसावळ येथील ४,५, चंद्रपूर येथील ४,६,७, कोराडीतील ८,९,१० आणि पारस येथील ४ क्रमांकाच्या युनिटचे उत्पादन प्रभावित झाले आहे. दुसरीकडे परळी औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ४ व ५ ला वित्तीय कारणांमुळे बंद ठेवले आहे. चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ३, पारस आणि परळी येथील १-१ युनिट तांत्रिक त्रुटीमुळे बंद ठेवले आहे.दिवाळी तोंडावर असताना विजेचे हे संकट उभे ठाकले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रात १०,१७० मेगावॉट क्षमतेच्या ऐवजी केवळ ५१३२ मेगावॉट विजेचे उत्पादन होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पॉवर एक्सचेंजमधून महागड्या दरावर ३४०५ मेगावॉट वीज खरेदी करावी लागत आहे. प्रदेशातील खासगी वीज आणि केंद्रीय ग्रीडच्या भरवशावर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे. यानंतरही मागणी आणि पुरवठा यातील अंतर वाढत आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मुंबई वगळता राज्यात २०,४७४ मेगावॉट इतकी विजेची मागणी होती. तर पुरवठा केवळ १३,७७२ इतका होत आहे. परिणामी राज्यातील ग्रामीण भागातील विशेषत: अधिक हानी असणारे जी १, जी २ आणि जी ३ क्षेत्रात लोडशेडिंग केली जात आहे.

१५ हजार मेट्रिक टन कोळशाची रस्त्याने वाहतूककोळशाच्या कमतरतेमुळे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. सूत्रानुसार कोळशाच्या आयातमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. दुसरीकडे महाजेनकोचे वरिष्ठ अधिकारी वेकोलि आणि रेल्वेदरम्यान समन्वय मजबूत करून कोळसा पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोळसा खदानीतून रस्ते मार्गाने रोज १५ हजार मेट्रिक टन कोळशाची वाहतूक महाजेनको करीत आहे.

किती पुरेल कोळसा?राज्यातील सर्व औष्णिक वीज केंद्रातील कोळशाच्या साठ्याबाबत अतिसंवेदनशील स्थिती आहे. कोराडीमध्ये चार दिवस, नाशिक, परळी, पारस आणि चंद्रपूरमध्ये एक दिवसाचा कोळशाचा साठा आहे. खापरखेडा आणि भुसावळ हेसुद्धा प्रत्येकी अडीच दिवसाच्या साठ्यासह संवेदनशील स्थितीत आहेत. 

टॅग्स :electricityवीज