शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

दिवाळीआधीच वीज संकट; राज्यातील नऊ युनिट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 10:16 IST

कोळसा कंपन्यांनी रेकॉर्ड उत्पादनाच्या दावा केला असला तरी महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र कोळशासाठी तडफडत आहेत. राज्यातील ९ वीज केंद्रातील युनिट कोळशाच्याअभावी पडले असून ११ युनिट प्रभावित झाले आहेत.

ठळक मुद्देनागपुरातील खापरखेड्यात एक, कोराडीतील दोन युनिट प्रभावित

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोळसा कंपन्यांनी रेकॉर्ड उत्पादनाच्या दावा केला असला तरी महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र कोळशासाठी तडफडत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, राज्यातील ९ वीज केंद्रातील युनिट कोळशाच्याअभावी पडले असून ११ युनिट प्रभावित झाले आहेत.महाजेनकोच्या अहवालानुसार भुसावळ औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ३, चंद्रपूर वीज केंद्रातील ५, ३, ८ आणि ९, खापरखेड्यातील १, कोराडीतील ६ आणि ७ तर परळी येथील ७ क्रमांकाच्या युनिटमधील वीज उत्पादन कोळशाअभावी रोखण्यात आले आहे. त्याचप्रकारे भुसावळ येथील ४,५, चंद्रपूर येथील ४,६,७, कोराडीतील ८,९,१० आणि पारस येथील ४ क्रमांकाच्या युनिटचे उत्पादन प्रभावित झाले आहे. दुसरीकडे परळी औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ४ व ५ ला वित्तीय कारणांमुळे बंद ठेवले आहे. चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ३, पारस आणि परळी येथील १-१ युनिट तांत्रिक त्रुटीमुळे बंद ठेवले आहे.दिवाळी तोंडावर असताना विजेचे हे संकट उभे ठाकले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रात १०,१७० मेगावॉट क्षमतेच्या ऐवजी केवळ ५१३२ मेगावॉट विजेचे उत्पादन होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पॉवर एक्सचेंजमधून महागड्या दरावर ३४०५ मेगावॉट वीज खरेदी करावी लागत आहे. प्रदेशातील खासगी वीज आणि केंद्रीय ग्रीडच्या भरवशावर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे. यानंतरही मागणी आणि पुरवठा यातील अंतर वाढत आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मुंबई वगळता राज्यात २०,४७४ मेगावॉट इतकी विजेची मागणी होती. तर पुरवठा केवळ १३,७७२ इतका होत आहे. परिणामी राज्यातील ग्रामीण भागातील विशेषत: अधिक हानी असणारे जी १, जी २ आणि जी ३ क्षेत्रात लोडशेडिंग केली जात आहे.

१५ हजार मेट्रिक टन कोळशाची रस्त्याने वाहतूककोळशाच्या कमतरतेमुळे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. सूत्रानुसार कोळशाच्या आयातमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. दुसरीकडे महाजेनकोचे वरिष्ठ अधिकारी वेकोलि आणि रेल्वेदरम्यान समन्वय मजबूत करून कोळसा पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोळसा खदानीतून रस्ते मार्गाने रोज १५ हजार मेट्रिक टन कोळशाची वाहतूक महाजेनको करीत आहे.

किती पुरेल कोळसा?राज्यातील सर्व औष्णिक वीज केंद्रातील कोळशाच्या साठ्याबाबत अतिसंवेदनशील स्थिती आहे. कोराडीमध्ये चार दिवस, नाशिक, परळी, पारस आणि चंद्रपूरमध्ये एक दिवसाचा कोळशाचा साठा आहे. खापरखेडा आणि भुसावळ हेसुद्धा प्रत्येकी अडीच दिवसाच्या साठ्यासह संवेदनशील स्थितीत आहेत. 

टॅग्स :electricityवीज