शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

विद्युत खांब, ट्रान्सफार्मर रस्त्यावर

By admin | Updated: May 3, 2015 02:12 IST

लालगंज व प्रेमनगर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण होऊन पाच वर्षांच्यावर कालावधी झाला.

नागपूर : लालगंज व प्रेमनगर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण होऊन पाच वर्षांच्यावर कालावधी झाला. परंतु रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध आलेले विद्युत खांब व ट्रान्सफार्मर अद्यापही हटविण्यात आलेले नाहीत. रहदारीला अडथळा ठरत असलेले हे खांब अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. विशेष म्हणजे, रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यासंदर्भात लालगंज सुधार संघर्ष समितीच्यावतीने मनपा आयुक्त, एसएनडीएल नागपूर विभाग, पोलीस आयुक्त, उत्तर नागपूर वाहतूक विभागाला निवेदन दिले, त्यानंतर स्मरणपत्रही दिले. परंतु उपाययोजना होत नसल्याने, संतप्त नागरिक व समितीने दोषी अधिकाऱ्यांच्या निंलबंन आंदोलनाचा इशारा दिला आहे.प्रभाग १७, बस्तरवारी येथील लालगंज परिसरातील राऊत चौक ते दहीबाजार चौक रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम होऊन आठ वर्षे झाली. यात ३०वर विद्युत खांब व दोन ट्रान्सफार्मर रस्त्याच्या मधोमध आले. तसेच प्रेमनगर परिसरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम पाच वर्षांपूर्वी झाले. यातही ३०वर विद्युत खांब व तीन ट्रान्सफार्मर रस्त्यावर आले. यामुळे आतापर्यंत अनेक वाहनचालक जखमी तर काही अपंग झाले आहेत. समितीचे अध्यक्ष गुणवंत झाडे यांनी सांगितले की, या परिसरात लवकरच मस्कासाथ उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे. यामुळे हा पूल बंद झाल्यास खैरीपुरा, नाईक तलाव, बांगलादेश येथील वाहतूक दहीबाजार पुलावरून जाईल. सध्या दहीबाजार पुलाचे काम अर्धवट झालेले आहे. असे असतानाही शांतिनगर, कावळापेठ, कळमना, कामठी, कन्हान, जबलपूर-शिवनी, रामटेकपर्यंतची वाहतूक या पुलावरून जाते. जेव्हा मस्कासाथ पुलाचे काम सुरू होईल तेव्हा या पुलावरील वाहतूक दुप्पट होईल आणि याच मार्गावर रस्त्यावर आलेले विद्युत खांब आणि ट्रान्सफार्मर वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरेल.१५ एप्रिल रोजी रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका विद्युत खांबाला वाहनाची धडक बसली. खांब खाली कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु खांब हटविण्यापासून नवीन खांब लावण्यापर्यंत परिसरातील वीज २४ तास खंडित होती. अशा अनेक समस्यांना येथील नागरिक तोंड देत आहेत. याची दखल लालगंज सुधार संघर्ष समितीने घेत या दोन्ही मार्गावरील विद्युत खांब हटविण्यासाठी १६ जानेवारी रोजी पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, लकडगंज पोलीस स्टेशन, उत्तर नागपूर वाहतूक विभाग, मनपाच्या झोन क्र. ७ सतरंजीपुरा यांना निवेदन दिले. रस्त्यावरील खांब हटविण्याची मागणी केली. तसेच एसएनडीएलचे बिझनेस हेड खुराणा आणि शंकरपूरकर यांनाही खांब हटविण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी तीन महिन्यात खांब हटविण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यानंतरही खांब जागेवर कायम होते. मात्र समस्या अद्यापही कायम आहे.