शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणूक व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:38 IST

लोकशाहीत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. दुर्दैवाने आज निवडणुकांना इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. निकोप लोकशाहीसाठी हे घातक असून निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावणात व्हाव्यात, असे मत असित सिन्हा यांनी शनिवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देअसित सिन्हा : पब्लिक रिलेशन्न्स सोसायटी आॅफ इंडियातर्फे जनसंपर्क दिनाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. दुर्दैवाने आज निवडणुकांना इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. निकोप लोकशाहीसाठी हे घातक असून निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावणात व्हाव्यात, असे मत असित सिन्हा यांनी शनिवारी व्यक्त केले.पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे राष्ट्रीय जनसंपर्क दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित ‘भारतीय लोकतंत्र सार्थक चुनाव का मंत्र’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून असित सिन्हा बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर व अमरावती विभागाचे माहिती व जनसंपर्क उपसंचालक राधाकृष्ण मुळी, पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडिया नागपूर शाखेचे अध्यक्ष एस.पी. सिंग, अतुल त्रिवेदी आदी उपस्थित होते.सिन्हा म्हणाले, राजकीय पक्षांचे निवडणूक जाहीरनामे जवळपास सारखेच असतात. परंतु ‘कथनी व करनी’ यात फरक आहे. राजकारणात स्वच्छ चारित्र्याच्या लोकांनी येण्याची गरज आहे. विविध घटकांत संवाद असला पाहिजे. संविधानाला समानता अभिप्रेत आहे. परंतु आज निवडणुका पैशाच्या बळावर लढल्या जातात. मतदान यंत्रामुळे देशातील नागरिक चिंतित आहेत. अशापरिस्थितीत देशातील लोकशाही बळकट होणार नसल्याचे असित सिन्हा म्हणाले.आपल्या देशाची संसदीय मार्गानेच प्रगती झाली आहे. दैनंदिन जीवनात लोकशाहीची मूल्ये जपली तर देशातील लोकशाही बळकट होण्याला मदत होईल. जगात लोकशाहीपेक्षा दुसरी कोणतीही व्यवस्था प्रभावी नाही, असे विचार राधाकृष्ण मुळी यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. प्रारंभी पब्लिक रिलेशन्न्स सोसायटी आॅफ इंडियाच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष एस.पी. सिंग यांनी प्रास्ताविकातून भारतीय लोकशाही व अभिप्रेत निवडणूक प्रक्रिया तसेच संस्थेच्या कामकाजावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन अतुल त्रिवेदी यांनी तर आभार संस्थेचे सदस्य सुधीर जाधव यांनी मानले. यावेळी शोभा धनवटे, नरेश मेश्राम, यशवंत मोहिते, योगश विटणकर, रवींद्र मिश्रा यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.कोल्हटकर व देशमुख यांचा गौरवराष्ट्रीय जनसंपर्क दिन कार्यक्रमात उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून नागपूर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर व एम.एस.देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊ न गौरव करण्यात आला.

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर