शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणूक व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:38 IST

लोकशाहीत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. दुर्दैवाने आज निवडणुकांना इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. निकोप लोकशाहीसाठी हे घातक असून निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावणात व्हाव्यात, असे मत असित सिन्हा यांनी शनिवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देअसित सिन्हा : पब्लिक रिलेशन्न्स सोसायटी आॅफ इंडियातर्फे जनसंपर्क दिनाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. दुर्दैवाने आज निवडणुकांना इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. निकोप लोकशाहीसाठी हे घातक असून निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावणात व्हाव्यात, असे मत असित सिन्हा यांनी शनिवारी व्यक्त केले.पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे राष्ट्रीय जनसंपर्क दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित ‘भारतीय लोकतंत्र सार्थक चुनाव का मंत्र’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून असित सिन्हा बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर व अमरावती विभागाचे माहिती व जनसंपर्क उपसंचालक राधाकृष्ण मुळी, पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडिया नागपूर शाखेचे अध्यक्ष एस.पी. सिंग, अतुल त्रिवेदी आदी उपस्थित होते.सिन्हा म्हणाले, राजकीय पक्षांचे निवडणूक जाहीरनामे जवळपास सारखेच असतात. परंतु ‘कथनी व करनी’ यात फरक आहे. राजकारणात स्वच्छ चारित्र्याच्या लोकांनी येण्याची गरज आहे. विविध घटकांत संवाद असला पाहिजे. संविधानाला समानता अभिप्रेत आहे. परंतु आज निवडणुका पैशाच्या बळावर लढल्या जातात. मतदान यंत्रामुळे देशातील नागरिक चिंतित आहेत. अशापरिस्थितीत देशातील लोकशाही बळकट होणार नसल्याचे असित सिन्हा म्हणाले.आपल्या देशाची संसदीय मार्गानेच प्रगती झाली आहे. दैनंदिन जीवनात लोकशाहीची मूल्ये जपली तर देशातील लोकशाही बळकट होण्याला मदत होईल. जगात लोकशाहीपेक्षा दुसरी कोणतीही व्यवस्था प्रभावी नाही, असे विचार राधाकृष्ण मुळी यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. प्रारंभी पब्लिक रिलेशन्न्स सोसायटी आॅफ इंडियाच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष एस.पी. सिंग यांनी प्रास्ताविकातून भारतीय लोकशाही व अभिप्रेत निवडणूक प्रक्रिया तसेच संस्थेच्या कामकाजावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन अतुल त्रिवेदी यांनी तर आभार संस्थेचे सदस्य सुधीर जाधव यांनी मानले. यावेळी शोभा धनवटे, नरेश मेश्राम, यशवंत मोहिते, योगश विटणकर, रवींद्र मिश्रा यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.कोल्हटकर व देशमुख यांचा गौरवराष्ट्रीय जनसंपर्क दिन कार्यक्रमात उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून नागपूर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर व एम.एस.देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊ न गौरव करण्यात आला.

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर