शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

बॅलेटने निवडणुका पारदर्शी आणि कमी खर्चिक; राजकुमार तिरपुडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 10:34 IST

विदेशांमध्ये ईव्हीएम बंद करून बॅलेटचा वापर निवडणुकीत करण्यात येत आहे. त्यामुळे भारतातील निवडणुका ह्या बॅलेटनेच घ्याव्यात, अशी अपेक्षा विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देईव्हीएम आणि मतपत्रिकेचे तुलनात्मक विश्लेषण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला खरा, पण प्रत्येक निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमच्या विश्वसनीयतेवर संशय व्यक्त करण्यात येण्याचे प्रकार घडताहेत. ईव्हीएम हे यंत्र असल्याने, त्यात तांत्रिक बदल करून निवडणुकीचे निकाल बदलविता येऊ शकतात. त्यामुळे ईव्हीएमद्वारे निवडणुका पारदर्शी नाहीच. विदेशांमध्ये ईव्हीएम बंद करून बॅलेटचा वापर निवडणुकीत करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाने सुद्धा वारंवार होणारे आक्षेप लक्षात घेता, भारतातील निवडणुका ह्या बॅलेटनेच घ्याव्यात, अशी अपेक्षा विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.ते म्हणाले की बॅलेटद्वारे घेण्यात येणाऱ्या निवडणुका ईव्हीएमच्या तुलनेत कमी खर्चात होतात. एक विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी १५० केंद्र असतात. प्रत्येक केंद्रावर २० हजार रुपये किमतीच्या ईव्हीएम मशीनची आवश्यकता असते. ज्याची एकूण किंमत ३० लाख रुपये होते. सोबतच मशीनच्या देखभालीचा खर्च वेगळा असतो.तुलनेत मतपत्रिकेचा विचार केला असला, निवडणुकीत एका उमेदवाराकडून १० हजार रुपये शुल्क निवडणुक आयोग घेते.एका विधानसभा क्षेत्रात १० उमेदवार उभे राहिल्यास १ लाख रुपये होतात. एका विधानसभा क्षेत्रासाठी दीड लाख मतपत्रिका छापण्यासाठी १५ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे मतपत्रिकेचा खर्च हा ईव्हीएमच्या तुलनेत अतिशय अत्यल्प आहे. शिवाय निवडणुक ीचा खर्च हा करदात्यांकडून वसूल केला जातो. त्यामुळे नागरिकांवरच त्याचा भुर्दंड बसतो.शिवाय मतपत्रिकेद्वारे मतदान केल्यानंतर मतदार हा आश्वस्त होतो. त्याला योग्य व्यक्तीला मतदान केल्याचे समाधान होते. त्यामुळे निवडणुकीचा खर्च कमी करण्यासाठी मतपत्रिकेद्वारे निवडणुका होणे गरजेचे असल्याचे तिरपुडे म्हणाले. पत्रपरिषदेला जयंत कुंभारे, अविनाश नागदिवे उपस्थित होते.

विदर्भ राज्य संकल्प दिवस साजराराज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शनिवार १९ मे रोजी विदर्भ राज्य संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. विदर्भातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या संकल्पाचे सामूहिक वाचन करावे , असे आवाहन तिरपुडे यांनी केले.

टॅग्स :Electionनिवडणूक