शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

बॅलेटने निवडणुका पारदर्शी आणि कमी खर्चिक; राजकुमार तिरपुडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 10:34 IST

विदेशांमध्ये ईव्हीएम बंद करून बॅलेटचा वापर निवडणुकीत करण्यात येत आहे. त्यामुळे भारतातील निवडणुका ह्या बॅलेटनेच घ्याव्यात, अशी अपेक्षा विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देईव्हीएम आणि मतपत्रिकेचे तुलनात्मक विश्लेषण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला खरा, पण प्रत्येक निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमच्या विश्वसनीयतेवर संशय व्यक्त करण्यात येण्याचे प्रकार घडताहेत. ईव्हीएम हे यंत्र असल्याने, त्यात तांत्रिक बदल करून निवडणुकीचे निकाल बदलविता येऊ शकतात. त्यामुळे ईव्हीएमद्वारे निवडणुका पारदर्शी नाहीच. विदेशांमध्ये ईव्हीएम बंद करून बॅलेटचा वापर निवडणुकीत करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाने सुद्धा वारंवार होणारे आक्षेप लक्षात घेता, भारतातील निवडणुका ह्या बॅलेटनेच घ्याव्यात, अशी अपेक्षा विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.ते म्हणाले की बॅलेटद्वारे घेण्यात येणाऱ्या निवडणुका ईव्हीएमच्या तुलनेत कमी खर्चात होतात. एक विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी १५० केंद्र असतात. प्रत्येक केंद्रावर २० हजार रुपये किमतीच्या ईव्हीएम मशीनची आवश्यकता असते. ज्याची एकूण किंमत ३० लाख रुपये होते. सोबतच मशीनच्या देखभालीचा खर्च वेगळा असतो.तुलनेत मतपत्रिकेचा विचार केला असला, निवडणुकीत एका उमेदवाराकडून १० हजार रुपये शुल्क निवडणुक आयोग घेते.एका विधानसभा क्षेत्रात १० उमेदवार उभे राहिल्यास १ लाख रुपये होतात. एका विधानसभा क्षेत्रासाठी दीड लाख मतपत्रिका छापण्यासाठी १५ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे मतपत्रिकेचा खर्च हा ईव्हीएमच्या तुलनेत अतिशय अत्यल्प आहे. शिवाय निवडणुक ीचा खर्च हा करदात्यांकडून वसूल केला जातो. त्यामुळे नागरिकांवरच त्याचा भुर्दंड बसतो.शिवाय मतपत्रिकेद्वारे मतदान केल्यानंतर मतदार हा आश्वस्त होतो. त्याला योग्य व्यक्तीला मतदान केल्याचे समाधान होते. त्यामुळे निवडणुकीचा खर्च कमी करण्यासाठी मतपत्रिकेद्वारे निवडणुका होणे गरजेचे असल्याचे तिरपुडे म्हणाले. पत्रपरिषदेला जयंत कुंभारे, अविनाश नागदिवे उपस्थित होते.

विदर्भ राज्य संकल्प दिवस साजराराज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शनिवार १९ मे रोजी विदर्भ राज्य संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. विदर्भातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या संकल्पाचे सामूहिक वाचन करावे , असे आवाहन तिरपुडे यांनी केले.

टॅग्स :Electionनिवडणूक