शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

निवडणूक २०१९; आमचा जाहीरनामा; असंघटित श्रमिकासाठी नियोजन व्हायला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:12 IST

देशात ९३ टक्के असलेल्या असंघटित श्रमिकासाठी नियोजन व्हायला पाहिजे असे मत कष्टकरी जनआंदोलनाचे नेते विलास भोंगाडे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशात ९३ टक्के असलेल्या असंघटित श्रमिकासाठी नियोजन व्हायला पाहिजे असे मत कष्टकरी जनआंदोलनाचे नेते विलास भोंगाडे यांनी व्यक्त केले. लोकमतने ‘आमचा जाहीरनामा’ या शीर्षकांतर्गत घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी भावी सरकारकडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.देशात असंघटित असलेल्या श्रमिक वर्गाचे शोषण होत आहे. भारतीय समूहात जल, जंगल, जमिनीचे प्रश्न वाढले आहेत. जमिनीचे सिलिंग असताना जमिनीची लूट चालली आहे. आदिवासी विस्थापित होत आहेत. प्रकल्प वेगाने होत आहेत, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही कायम आहेत. शेती परवडणारी नसल्याने शेतमजुरांचे प्रश्न आहेत. असंघटित श्रमिक बेवारस होत आहेत. त्यांना काम नाही. कुठे श्रमाचा दाम नाही. निवारा, आरोग्य, सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. विदर्भात पोट भरण्यासाठी जमीन कसणारे जबरणजोतधारक परिवार ५० हजाराच्या वर आहे. त्यांच्या जमिनीपासून सातबारापर्यंतचे प्रश्न सुटलेले नाही. प्रकल्पग्रस्त शेतावरून,गावातून,घरातून फेकल्या जात आहे. त्याचे नीट पुनर्वसन नाही, त्यांचे कुटुंब अस्थिर झाले आहे. गावातील कला संस्कृती, प्रज्ञा संपुष्टात येत आहे.माणसाला जीवन जगण्याची हमी दिली पाहिजे. शहरीकरण वाढत चालले आहे, पण प्रश्न बिकट होत आहे. शहरी रोजगार, निवारा, पाणी, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. शेती, अन्न सुरक्षा मिळाली पाहिजे. लोकांचे स्वतंत्र, लोकशाहीचे रक्षण झाले पाहिजे. बोलणे, लिहिणे, अभिव्यक्त होणे यावरील बंधने काढली पाहिजेत. गरीब-श्रीमंत दरी कमी झाली पाहिजे. आर्थिक, सामाजिक विषमता कमी झाली पाहिजे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९