शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गुंड, उपद्रवींची खैर नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:07 IST

नागपुरात निवडणुका शांततेत पार पडेल, असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचे आश्वासनकोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीवर लक्ष ठेवून काही उपद्रवी मंडळी मुद्दामहून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. हे ध्यानात ठेवून परिस्थिती कशी हाताळायची, यासंबंधाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण (इलेक्शन ट्रेनिंग) देण्यात आले आहे. उपद्रवींना वठणीवर आणण्यासाठी आणि कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी शहर पोलीस दल सज्ज आहे. त्यामुळे नागपुरात निवडणुका शांततेत पार पडेल, असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला. नागपुरात दिग्गज नेत्यांमध्ये लोकसभेची लढत होत आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या नागपुरात जाहीर सभा पार पडणार आहेत. त्यामुळे नागपूर पोलिसांचीही बंदोबस्ताच्या माध्यमातून कसोटी लागली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. उपाध्याय यांच्याशी लोकमतने बातचित केली.

निवडणुकीसाठी पोलिसांची काय तयारी?पोलिसांची अभूतपूर्व तयारी आहे. सहा हजार पोलीस, १००० अधिकारी, १५०० होमगार्डस् बंदोबस्तात तैनात आहेत. सीआयएसएफची एक तर एसआरपीएफच्या दोन कंपन्याही बंदोबस्तासाठी मदतीला आहेत. नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी विविध भागात फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे. रात्रंदिवस पोलिसांची गस्त सुरू आहे.

मोठ्या नेत्यांच्या सभांचे दडपण राहील?देशातील मोठ्या नेत्यांच्या बंदोबस्ताचा विशेष प्रोटोकॉल असतो. ज्या नेत्यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा असते, अशा नेत्यांच्या सुरक्षा आणि सभांच्या बंदोबस्ताचे नियोजन ठरलेले आहे. विमानतळापासून ते ज्या ज्या ठिकाणी जातात, प्रचार सभा घेतात, त्या त्या मार्गावर, सभास्थळी, आजूबाजूच्या इमारतीवर पोलीस सुरक्षेचे कवच उभारण्यात येईल. आमची सर्व तयारी असल्याने प्रचार सभा, रोड शोचे फारसे दडपण वाटत नाही.

गुन्हेगारांचा बंदोबस्त कसा करणार?निवडणुकीदरम्यान जे असामाजिक तत्त्व गडबड करू शकतात, अशांची तसेच कुख्यात गुन्हेगारांची यादी तयार आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाईदेखील सुरू झाली आहे. आतापर्यंत ५०५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ३० जणांना तडीपार करण्यात आले. १२ जणांवर एमपीडीए लावून त्यांना कारागृहात डांबण्यात आले आहे. दोन टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. प्रत्येक गुन्हेगारावर नजर असून, त्याने थोडीही गडबड केली तर त्याच्या मुसक्या बांधून त्याला आतमध्ये डांबण्यात येणार आहे.

निवडणुकांमध्ये दारूला उधाण येते...!होय, खरे आहे. गुन्हेगारीचे, भांडणाचे मूळच दारूत आहे. त्यामुळे शहरातील १२५ ठिकाणी नाकेबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे. आतापर्यंत २५० दारू विक्रेत्यांवर कारवाई करून लाखोंची दारू जप्त करण्यात आली आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत ५०० पेक्षा जास्त दारू विक्रेत्यांना जेरबंद करणार.

झोपडपट्ट्यांमध्ये चहलपहल वाढली...!संवेदनशील भाग आणि झोपडपट्ट्यांवर विशेष लक्ष आहे. झोपडपट्टीत जाऊन आमिष दाखवून किंवा धाक दाखवून मते प्रभावित करण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांना तातडीने अटक करण्यासाठी झोपडपट्टींमध्ये सर्चिंग, कोम्बिंग केले जात आहे. पाचपेक्षा जास्त मंडळी रात्री ९ नंतर कोणत्या झोपडपट्टीत शिरत असेल तर त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले जाईल. संशय आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

पोलिसांच्या मनोबलाचे काय?पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी शहरातील पाचही परिमंडळातील सर्वच पोलीस ठाण्यांना मी प्रत्यक्ष भेटी दिल्या. ठाणेदार आणि तेथील कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला आहे. त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेत त्या तातडीने दूर करण्यात आल्या असून, सर्वच प्रकारची साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोलिसांचे मनोबल उंचावलेले आहे. कुणाच्याही दडपणात किंवा धाकात येण्याचा प्रश्नच नाही. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यकक्षेतील पोलीस ठाण्यातील स्थितीवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय