शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

निवडणूक म्हणजे प्रतिमा प्रचाराचा व्यवसाय : लुडविग स्ट्रेईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:41 IST

नवे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत बेलफिल्ड विद्यापीठ, जर्मनीचे तत्त्वज्ञ प्रा. लुडविग स्ट्रेईट यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २००० वर्षापूर्वी ग्रीकमध्ये लोकशाहीचा उदय झाला असे मानले जाते. त्या काळात तंत्रज्ञानाचा एवढा प्रभाव नव्हता, मात्र लोकशाहीची मूल्ये महत्त्वाची होती. आज मात्र लोकांना अपेक्षित असलेली लोकशाही जगात कुठेही दिसत नाही. निवडणूक प्रक्रिया आज केवळ एखाद्या पक्षाचा व त्यांच्या नेत्यांच्या प्रतिमा प्रचाराचा व्यवसाय झाला आहे. लोकांसाठी महत्त्वाचे असलेले मुद्दे सोडून स्वत:ची प्रतिमा उंचावण्यातच राजकारण्यांचा वेळ जातो. त्यासाठी तंत्रज्ञानाचा हवा तसा वापर व हवा तेवढा पैसा खर्च केला जातो. ही लोकशाहीची पडझड आहे. नवे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत बेलफिल्ड विद्यापीठ, जर्मनीचे तत्त्वज्ञ प्रा. लुडविग स्ट्रेईट यांनी व्यक्त केले.सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट (सिरी) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय  परिषदेत मार्गदर्शनासाठी आलेले प्रा. लुडविग यांनी लोकमतशी बोलताना आपले विचार व्यक्त केले. त्यांनी २००० ते २००१ या काळात विविध देशातील वर्तमान परिस्थितीच्या अभ्यासावरून आपले विचार मांडले. ‘कॉम्प्लेक्सीटी, अ‍ॅक्सेलरेशन, ग्लोबलायझेशन : चॅलेंजेस फॉर डेमोक्रसी’ हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. लोकशाहीचा उदय झाला तेव्हा प्रक्रिया हळुवार चालत होत्या. लोकांकडे वेळ होता. मात्र पुढे राष्ट्रांमधील तणाव वाढत गेला, युद्ध होत गेले व त्यातून तंत्रज्ञानाची गरज भासू लागली. नवनवे तंत्रज्ञान विकसित होत गेले. आज तंत्रज्ञानाने जग एकमेकांशी जुळले, मात्र यातून गुंतागुंत वाढीला लागली. जग प्रचंड गतिमान झाले असून कुणाकडे ही गुंतागुंत सोडविण्यासाठी वेळ नाही. सरकारचेही तसेच. आधी आर्थिक धोरण म्हणजे भविष्याची गुंतवणूक असायची. आज दर महिन्याला आर्थिक धोरणे बदलली जातात. यातून आर्थिक मंदीसारखे प्रश्न सातत्याने निर्माण होत आहेत. यालाच अ‍ॅक्सेलरेशन म्हणतात. त्यातून जगभरात समस्या निर्माण केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.लोकांचे सरकार हा आभास असल्यासारखे वाटते. लोकशाहीच्या देशातील लोक नाखूश आहेत, कारण ते योग्य पद्धतीने चालविली जात नाही. चीनमध्ये लोकशाही नाही, मात्र तो देश विकास करीत असून गरिबी कमी झाली आहे. सिंगापूरचा अनुभवही तसाच आहे. लोकांना हुकूमशाही ऐवजी लोकशाहीच महत्त्वाची वाटते, मात्र निवडणूक प्रक्रिया बदलावी असा विचार समोर येत आहे. त्यामुळे लोकशाही एक मोठा बदल घडण्याची वाट पाहतेय, असे वाटते. भविष्यात याचे परिणाम दिसतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर