शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

निवडणूक विभाग तीन दिवसापासून जागाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:35 IST

लोकशाहीमध्ये निवडणूक ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा प्रशासन गेल्या काही दिवसंपासून दिवसरात्र राबत आहेत. तीन दिवसांपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच २४ तास काम करीत आहे. मतदानाच्या दिवशी तर निवडणूक विभागच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच जागे होते, हे विशेष.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच दिवस-रात्र राबताहेतमतदानाच्या दिवशी संपूर्ण रात्र काढली जागून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीमध्ये निवडणूक ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा प्रशासन गेल्या काही दिवसंपासून दिवसरात्र राबत आहेत. तीन दिवसांपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच २४ तास काम करीत आहे. मतदानाच्या दिवशी तर निवडणूक विभागच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच जागे होते, हे विशेष.निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली. तेव्हापासून निवडणूक विभागाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. परंतु मंगळवारपासून निवडणूक विभागाची धावपळ वाढली. साहित्य वाटपाच्या दिवसापासून जागरण सुरु झाले. मतदानाचा दिवस तर सर्वात महत्त्वाचा ठरला. नागपूर लोकसभेतील २०१६ आणि रामटेक येथील २३६४ असे एकूण ४४२९ मतदान केंद्रातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी सर्व ईव्हीएम मशीन सील करून ते आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. येथे प्रत्येक ईव्हीएमची मोजणी झाली. किती बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट नेण्यात आले, त्या प्रत्येकाची मोजणी झाली. किती खराब झाले. त्या परत आलेत का? या सगळ्यांची बूथनिहाय मोजणी केली. त्यानंतर प्रत्येक मशीन विधानसभानिहाय कंटेनरमध्ये सीआयपीएफच्या सुरक्षेत कळमना येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित पोहोचवण्यात आले. यासंपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांपासून तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व कक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांचे जागरण होत आहेच. परंतु निवडणूक विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारीही रात्रभर जागत आहेत. निवडणूक विभागातील गुरुवारी कामावर आलेले अनेक अधिकारी तर आज शुक्रवारी दुपारपर्यंत कार्यालयातच होते, हे विशेष.आमचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने राबत आहे. त्यांची झोप झालेली नाही. मतदानाचे साहित्य वाटपापासून तर त्यांच्यावर कामाचा अधिकच ताण आहे. आज थोडे कामापासून मोकळे झाले. त्यांनी पुरेशी झोप घेण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना सवलत दिली जाईल.अश्विन मुदगलजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, तथा जिल्हाधिकारी३८ ठिकाणी सुरु होते ६ नंतरही मतदाननिवडणूक विभागाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान चालणार होते. परंतु ६ वाजता मतदान केंद्रावर रांगेत असलेली शेवटची व्यक्ती मतदान करेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार होती. त्यानुसार नागपूर शहरात एकूण ३८ ठिकाणी सायंकाळी ६ नंतरही लोकं रांगेत होते. त्यांची एकूण मतदानाची प्रक्रिया ७ ते ७.३० पर्यंत चालली.विधानसभानिहाय ६ नंतर सुरु असलेले मतदान केंद्रविधानसभा मतदान केंद्रउत्तर नागपूर १३पूर्व नागपूर ४मध्य नागपूर ३दक्षिण नागपूर ९पश्चिम नागपूर ४दक्षिण-पश्चिम नागपूर - ५----------------------------एकूण ३८

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019