शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपूर विमानतळावरून आठ विमानांची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 21:29 IST

लॉकडाऊनपूर्वी देशाच्या विविध भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास ४० विमानांची ये-जा होती. पण लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये उड्डाणांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी तीन कंपन्यांच्या आठ विमानांनी विमानतळावरून उड्डाण केले.

ठळक मुद्देअनेक दिवसांपासून पुरेशा प्रवासी संख्येअभावी उड्डाणे होताहेत रद्द

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनपूर्वी देशाच्या विविध भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास ४० विमानांची ये-जा होती. पण लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये उड्डाणांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी तीन कंपन्यांच्या आठ विमानांनी विमानतळावरून उड्डाण केले. विमानांच्या दररोज बदलत्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.एरवी नागपूर विमानतळावरून मुंबई आणि दिल्ली या हवाई मार्गावर सर्वाधिक गर्दी असते. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. परिणामत: हवाई वाहतूक कमी झाली आहे. पुढील काही दिवसांत यात वाढ होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दररोज मुंबई आणि दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान आता आठवड्यात तीन दिवस सोमवार, गुरुवार आणि शनिवारी दिल्लीला जात आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशांतर्गत विमान रद्द करण्याची शृंखला येणारे काही आठवडे कायम राहणार आहे. याचा जोरदार फटका ग्राहकांना तसेच एअरलाईन्स कंपन्यांना बसणार आहे. क्वारंटाईनच्या भीतीने अनेकजण विमानाऐवजी रस्ता मार्गाने प्रवास करीत आहेत. त्यामुळे पुरेशा प्रवासी संख्येअभावी अनेकदा विमान फेरी रद्द करावी लागत आहे. २५ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मार्गावर केवळ कार्गो विमानांनी उड्डाण केले आहे.मंगळवारी इंडिगोचे सहा, गो-एअर आणि स्पाईज जेटचे प्रत्येकी एक अशा एकूण आठ विमानांनी उड्डाण भरले. गो-एअरचे नागपूर-मुंबई विमान सकाळी ८.४० वाजता, इंडिगोच्या सहा उड्डाणांमध्ये दोन विमाने नागपूर-पुणे, दोन नागपूर-मुंंबई, दोन नागपूर-दिल्ली आणि स्पाईस जेटचे एक विमान दिल्लीकरिता होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरAir Indiaएअर इंडिया