शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नागपुरात  आठ विमाने उशिरा पोहोचली, चक्रीवादळामुळे कोलकाताची उड्डाणे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:38 IST

. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ विमाने उशिरा पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.

ठळक मुद्देगो एअरच्या विमानाला तीन तास विलंब

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशाच्या अन्य शहरांमधून नागपुरात विविध कंपन्यांच्या विमानांच्या लेटलतिफीचा क्रम सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत धुके असल्याने अनेक विमाने नागपुरात उशिरा आली होती. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ विमाने उशिरा पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.याशिवाय बंगालच्या उपमहासागरात ‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डाण शनिवारी सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत रद्द करण्यात आले आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसला. नागपुरातून कोलकाताला जाणारे इंडिगोचे विमान आणि कोलकाताहून नागपुरात येणारी दोन विमाने रद्द करण्यात आली आहेत.गो एअरचे जी८२८३ पुणे-नागपूर विमान सकाळी ८.५५ ऐवजी तब्बल ३ तास उशिरा ११.५५ वाजता आणि एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई- नागपूर विमान रात्री ८.३५ मिनिटांऐवजी दोन तास उशिरा पोहोचले. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. एअर इंडियाच्या काऊंटरवर विचारपूस केली असता, काहीही उत्तर मिळाले नाही.इंडिगोच्या ६ई५६३ चेन्नई-नागपूर विमान १ तास ५ मिनिटे उशिरा दुपारी १ ऐवजी २.०५ वाजता, इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान ३५ मिनिटे विलंबाने दुपारी १.४० वाजता, इंडिगोचेच ६ई४०३ मुंबई-नागपूर विमान ३३ मिनिटे उशिरा सायंकाळी ६.०३ वाजता, गो एअरचे दिल्ली-नागपूर विमान ३२ मिनिटे विलंबाने रात्री ९.२७ वाजता, इंडिगोचे ६ई५३७७ मुंबई-नागपूर विमान ३० मिनिटे उशिराने रात्री १०.१५ वाजता आणि गो एअरचे जी८ ७१२ बेंगळुरू-नागपूर विमान ३० मिनिटे उशिरा मध्यरात्रीनंतर आले. याशिवाय गो एअरचे जी८१४१ नागपूर-मुंबई विमान दुपारी ३ तास उशिरा विलंबाने मुंबईला पोहोचल्याची माहिती आहे.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर