शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शैक्षणिक धोरण विकेंद्रित पद्धतीने तयार व्हावे : सरसंघचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:19 IST

भारत देशात सांस्कृतिक, भाषिक तसेच सामाजिक विविधता आहेत. त्यामुळे शिक्षणाची दिशा एक असली तरी पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. अशा स्थितीत शिक्षणाचे धोरण किंवा योजना केंद्रातून तयार होणे ही अव्यवहार्य बाब आहे. त्यामुळेच शिक्षणाचे धोरण हे विकेंद्रित पद्धतीने तयार झाले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सेवासदन शिक्षण संस्थेद्वारे आयोजित रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बुधवारी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देरमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत देशात सांस्कृतिक, भाषिक तसेच सामाजिक विविधता आहेत. त्यामुळे शिक्षणाची दिशा एक असली तरी पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. अशा स्थितीत शिक्षणाचे धोरण किंवा योजना केंद्रातून तयार होणे ही अव्यवहार्य बाब आहे. त्यामुळेच शिक्षणाचे धोरण हे विकेंद्रित पद्धतीने तयार झाले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सेवासदन शिक्षण संस्थेद्वारे आयोजित रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बुधवारी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.सीताबर्डी येथील सेवासदन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण नुवाल हे होते. याशिवाय आ.नागो गाणार, चेन्नई येथील उद्योजक श्री.आर.श्रीधर, संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी हे प्रामुख्याने उपस्थित होते. अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूलचे सचिन देशपांडे व भाग्यश्री देशपांडे यांना रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण हा सर्व प्रकारच्या प्रगतीचा पाया आहे. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही. तर शिकलेल्या गोष्टींचा व्यावहारिक उपयोग कसा करावा याचा विवेक ज्ञानात असतो. प्रत्येकाच्या कलेचे काही ना काही महत्त्व असते. त्यामुळे जे आहोत त्याची लाज वाटता कामा नये. स्वत्वाचे जागरण करणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.देशात शिक्षणाचा प्रचार-प्रसार होत आहे. जागृतीदेखील वाढते आहे. मात्र देश, समाज, कुटुंबाप्रति संवेदना नसणे हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच शिक्षणातून हे संस्कार होणे आवश्यक आहे, असे मत नुवाल यांनी व्यक्त केले. नवीन पिढी ही नोकरी मागणारी नको, तर नोकरी देणारी असावी. तरुणांनी कृषी क्षेत्रातील उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन सचिन देशपांडे यांनी केले. कांचन गडकरी यांनी प्रास्ताविकातून सेवासदन संस्थेच्या प्रवासावर भाष्य केले. महिला सक्षमीकरणात संस्थेच्या कार्यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला. यावेळी संस्थेच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अमर कुळकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. मंचावर सेवासदन शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष वासंती भागवत, सचिव इंदुबाला मुकेवार, प्रमोद मसराम, सहसचिव भागवत भांगे हेदेखील उपस्थित होते. आशुतोष अडोणी यांनी संचालन केले.महिलांना बेड्यांतून बाहेर काढावेदेशाची प्रगती होणे अपेक्षित असेल तर महिलांची उपेक्षा करुन चालणार नाही. मातृशक्तीमध्ये स्वत:च प्रगतीची असामान्य ताकद असते. मात्र महिलांना स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता आहे. आपल्या परंपरेत नसलेल्या मात्र मध्ययुगीन काळात लादल्या गेलेल्या बेड्यांमधून त्यांना बाहेर काढावे लागेल, असे प्रतिपादन करत सरसंघचालकांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्याबाबत भाष्य केले.पुढे काय होईल यावर शैक्षणिक धोरण अवलंबूनयावेळी सरसंघचालकांनी देशातील नवीन शैक्षणिक धोरणावरदेखील भाष्य केले. नवीन शैक्षणिक धोरण तयार झाले आहे, असे ऐकिवात आहे. मात्र अद्याप ते लागू झाले नाही. पुढे काय होईल त्यावर शैक्षणिक धोरण कधी व कसे लागू होईल हे अवलंबून असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतEducationशिक्षण