शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

शैक्षणिक धोरण विकेंद्रित पद्धतीने तयार व्हावे : सरसंघचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:19 IST

भारत देशात सांस्कृतिक, भाषिक तसेच सामाजिक विविधता आहेत. त्यामुळे शिक्षणाची दिशा एक असली तरी पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. अशा स्थितीत शिक्षणाचे धोरण किंवा योजना केंद्रातून तयार होणे ही अव्यवहार्य बाब आहे. त्यामुळेच शिक्षणाचे धोरण हे विकेंद्रित पद्धतीने तयार झाले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सेवासदन शिक्षण संस्थेद्वारे आयोजित रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बुधवारी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देरमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत देशात सांस्कृतिक, भाषिक तसेच सामाजिक विविधता आहेत. त्यामुळे शिक्षणाची दिशा एक असली तरी पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. अशा स्थितीत शिक्षणाचे धोरण किंवा योजना केंद्रातून तयार होणे ही अव्यवहार्य बाब आहे. त्यामुळेच शिक्षणाचे धोरण हे विकेंद्रित पद्धतीने तयार झाले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सेवासदन शिक्षण संस्थेद्वारे आयोजित रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बुधवारी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.सीताबर्डी येथील सेवासदन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण नुवाल हे होते. याशिवाय आ.नागो गाणार, चेन्नई येथील उद्योजक श्री.आर.श्रीधर, संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी हे प्रामुख्याने उपस्थित होते. अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूलचे सचिन देशपांडे व भाग्यश्री देशपांडे यांना रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण हा सर्व प्रकारच्या प्रगतीचा पाया आहे. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही. तर शिकलेल्या गोष्टींचा व्यावहारिक उपयोग कसा करावा याचा विवेक ज्ञानात असतो. प्रत्येकाच्या कलेचे काही ना काही महत्त्व असते. त्यामुळे जे आहोत त्याची लाज वाटता कामा नये. स्वत्वाचे जागरण करणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.देशात शिक्षणाचा प्रचार-प्रसार होत आहे. जागृतीदेखील वाढते आहे. मात्र देश, समाज, कुटुंबाप्रति संवेदना नसणे हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच शिक्षणातून हे संस्कार होणे आवश्यक आहे, असे मत नुवाल यांनी व्यक्त केले. नवीन पिढी ही नोकरी मागणारी नको, तर नोकरी देणारी असावी. तरुणांनी कृषी क्षेत्रातील उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन सचिन देशपांडे यांनी केले. कांचन गडकरी यांनी प्रास्ताविकातून सेवासदन संस्थेच्या प्रवासावर भाष्य केले. महिला सक्षमीकरणात संस्थेच्या कार्यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला. यावेळी संस्थेच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अमर कुळकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. मंचावर सेवासदन शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष वासंती भागवत, सचिव इंदुबाला मुकेवार, प्रमोद मसराम, सहसचिव भागवत भांगे हेदेखील उपस्थित होते. आशुतोष अडोणी यांनी संचालन केले.महिलांना बेड्यांतून बाहेर काढावेदेशाची प्रगती होणे अपेक्षित असेल तर महिलांची उपेक्षा करुन चालणार नाही. मातृशक्तीमध्ये स्वत:च प्रगतीची असामान्य ताकद असते. मात्र महिलांना स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता आहे. आपल्या परंपरेत नसलेल्या मात्र मध्ययुगीन काळात लादल्या गेलेल्या बेड्यांमधून त्यांना बाहेर काढावे लागेल, असे प्रतिपादन करत सरसंघचालकांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्याबाबत भाष्य केले.पुढे काय होईल यावर शैक्षणिक धोरण अवलंबूनयावेळी सरसंघचालकांनी देशातील नवीन शैक्षणिक धोरणावरदेखील भाष्य केले. नवीन शैक्षणिक धोरण तयार झाले आहे, असे ऐकिवात आहे. मात्र अद्याप ते लागू झाले नाही. पुढे काय होईल त्यावर शैक्षणिक धोरण कधी व कसे लागू होईल हे अवलंबून असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतEducationशिक्षण