शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

शैक्षणिक धोरण विकेंद्रित पद्धतीने तयार व्हावे : सरसंघचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:19 IST

भारत देशात सांस्कृतिक, भाषिक तसेच सामाजिक विविधता आहेत. त्यामुळे शिक्षणाची दिशा एक असली तरी पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. अशा स्थितीत शिक्षणाचे धोरण किंवा योजना केंद्रातून तयार होणे ही अव्यवहार्य बाब आहे. त्यामुळेच शिक्षणाचे धोरण हे विकेंद्रित पद्धतीने तयार झाले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सेवासदन शिक्षण संस्थेद्वारे आयोजित रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बुधवारी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देरमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत देशात सांस्कृतिक, भाषिक तसेच सामाजिक विविधता आहेत. त्यामुळे शिक्षणाची दिशा एक असली तरी पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. अशा स्थितीत शिक्षणाचे धोरण किंवा योजना केंद्रातून तयार होणे ही अव्यवहार्य बाब आहे. त्यामुळेच शिक्षणाचे धोरण हे विकेंद्रित पद्धतीने तयार झाले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सेवासदन शिक्षण संस्थेद्वारे आयोजित रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बुधवारी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.सीताबर्डी येथील सेवासदन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण नुवाल हे होते. याशिवाय आ.नागो गाणार, चेन्नई येथील उद्योजक श्री.आर.श्रीधर, संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी हे प्रामुख्याने उपस्थित होते. अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूलचे सचिन देशपांडे व भाग्यश्री देशपांडे यांना रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण हा सर्व प्रकारच्या प्रगतीचा पाया आहे. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही. तर शिकलेल्या गोष्टींचा व्यावहारिक उपयोग कसा करावा याचा विवेक ज्ञानात असतो. प्रत्येकाच्या कलेचे काही ना काही महत्त्व असते. त्यामुळे जे आहोत त्याची लाज वाटता कामा नये. स्वत्वाचे जागरण करणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.देशात शिक्षणाचा प्रचार-प्रसार होत आहे. जागृतीदेखील वाढते आहे. मात्र देश, समाज, कुटुंबाप्रति संवेदना नसणे हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच शिक्षणातून हे संस्कार होणे आवश्यक आहे, असे मत नुवाल यांनी व्यक्त केले. नवीन पिढी ही नोकरी मागणारी नको, तर नोकरी देणारी असावी. तरुणांनी कृषी क्षेत्रातील उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन सचिन देशपांडे यांनी केले. कांचन गडकरी यांनी प्रास्ताविकातून सेवासदन संस्थेच्या प्रवासावर भाष्य केले. महिला सक्षमीकरणात संस्थेच्या कार्यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला. यावेळी संस्थेच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अमर कुळकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. मंचावर सेवासदन शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष वासंती भागवत, सचिव इंदुबाला मुकेवार, प्रमोद मसराम, सहसचिव भागवत भांगे हेदेखील उपस्थित होते. आशुतोष अडोणी यांनी संचालन केले.महिलांना बेड्यांतून बाहेर काढावेदेशाची प्रगती होणे अपेक्षित असेल तर महिलांची उपेक्षा करुन चालणार नाही. मातृशक्तीमध्ये स्वत:च प्रगतीची असामान्य ताकद असते. मात्र महिलांना स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता आहे. आपल्या परंपरेत नसलेल्या मात्र मध्ययुगीन काळात लादल्या गेलेल्या बेड्यांमधून त्यांना बाहेर काढावे लागेल, असे प्रतिपादन करत सरसंघचालकांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्याबाबत भाष्य केले.पुढे काय होईल यावर शैक्षणिक धोरण अवलंबूनयावेळी सरसंघचालकांनी देशातील नवीन शैक्षणिक धोरणावरदेखील भाष्य केले. नवीन शैक्षणिक धोरण तयार झाले आहे, असे ऐकिवात आहे. मात्र अद्याप ते लागू झाले नाही. पुढे काय होईल त्यावर शैक्षणिक धोरण कधी व कसे लागू होईल हे अवलंबून असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतEducationशिक्षण