शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट, सरकारला धारेवर धरणार ; आ. पाटील, आ. सावंत व आ. देशपांडे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:25 IST

राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट असून शिक्षकांना आॅनलाईन कामांना जुंपले आहे. १३ हजार शाळा पटसंख्येचे कारण देऊन बंद पाडल्या आहेत.चर्चेदरम्यान सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती आ. कपिल पाटील, आ. दत्तात्रय सावंत आणि आ. श्रीकांत देशपांडे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे१३ हजार शाळा बंद पाडल्या आहेत

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट असून शिक्षकांना आॅनलाईन कामांना जुंपले आहे. १३ हजार शाळा पटसंख्येचे कारण देऊन बंद पाडल्या आहेत. यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी विधान परिषद नियम २६० अन्वये प्रस्ताव मांडण्यासाठी विधान परिषद सभापतींकडे परवानगी मागितली आहे. चर्चेदरम्यान सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती आ. कपिल पाटील, आ. दत्तात्रय सावंत आणि आ. श्रीकांत देशपांडे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.सरकारने ‘कायम’ हा शब्द कायमचा काढला आहे. १० वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांना एक मिनिट उशीर झाला तरी परीक्षेला बसू न देण्याचा जुलुमी निर्णय बोर्डाने घेणे, अंतर्गत मूल्यमापनाचे २० टक्के गुण रद्द करून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात टाकणे, शाळा बंद झाल्यामुळे २ लाख विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात येणे, राज्यातील ४ लाख विद्यार्थी शाळाबाह्य असणे, शिक्षण हक्क कायद्याची उघड उघड पायमल्ली होणे, राज्यातील १७६ रात्रशाळा १७ मे २०१७ च्या निर्णयाचा परिणाम म्हणून बंद पाडणे, १०१० शिक्षक तर ३४८ शिक्षकेतर कर्मचाºयांच्या सेवा तात्काळ समाप्त करणे, ज्युनिअर कॉलेज शिक्षकांना वेतन नाकारणे आदी आरोप आमदारांनी केले.शिक्षणाच्या चिंताग्रस्त परिस्थितीची शासनाने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी त्यांनी आमदारांनी केली.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७