शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दहा राज्यांमध्ये अभियांत्रिकीचे मातृभाषेतून शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 22:17 IST

Nagpur News देशात मराठीसह इतर पाच भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जात आहे. दहा राज्यांमधील १९ महाविद्यालयांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन ‘एआयसीटीई’चे (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले.

ठळक मुद्देपुढील दोन वर्षे नवीन महाविद्यालयांना मान्यता नाही

नागपूर : . राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेतून उच्चशिक्षणावर भर देण्यात आला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण केवळ इंग्रजीतूनच द्यावे, असा कुठेही उल्लेख नाही. परंतु तशी परंपराच चालली. मात्र आता स्थिती बदलते आहे. देशात मराठीसह इतर पाच भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जात आहे. दहा राज्यांमधील १९ महाविद्यालयांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन ‘एआयसीटीई’चे (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित चर्चासत्रासाठी ते नागपुरात आले होते. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

मराठीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याचा प्रयोग पिंपरी-चिंचवडमधील एका महाविद्यालयाने सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य मातृभाषेत उपलब्ध होत नसल्याची अडचण असते. त्यामुळे आता एआयसीटीई स्वत: विविध भाषांमध्ये अभ्यासाचे साहित्य तयार करण्यावर जोर देत असून, सहा भाषांमधील पुस्तके तयार झाली आहेत. यात तेलगू, तामीळ, कन्नड, मराठी, हिंदी आणि बांगला या भाषांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आवश्यकतेपेक्षा जास्त अभियांत्रिकी महाविद्यालये असल्याने, अनेक ठिकाणी जागा रिक्त राहत होत्या. त्यामुळे मागील दोन वर्षे एकाही नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी देण्यात आली नाही. पुढील दोन वर्षेदेखील परवानगी देण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ‘एआयसीटीई’चे सल्लागार डॉ. राजेंद्र काकडे हे देखील उपस्थित होते.

अभियांत्रिकीसाठी भारतीय पारंपरिक ज्ञानावर पुस्तक

अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात भारतीय पारंपरिक ज्ञानदेखील समाविष्ट झाले पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे एका ठिकाणी असावे व त्या माध्यमातून क्रेडिट आधारित अभ्यासक्रम सुरू करता यावा, यासाठी पुस्तक तयार करण्यात येत असल्याचे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

उच्च शिक्षणातील नोंदणी प्रमाण ५० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट

येणाऱ्या पाच वर्षांत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २७ टक्क्यापासून ते ५० टक्क्यापर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ‘एआयसीटीई’ने ठेवले आहे. याशिवाय अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांसाठी विशिष्ट अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, तो पूर्ण केल्याशिवाय त्यांना नियमित होता येणार नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.

परीक्षा पद्धतीत प्रात्यक्षिक ज्ञानावर भर हवा

विद्यापीठांच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदलांची गरज आहे. तीन तासात विद्यार्थ्यांनी पाठांतर केलेल्या उत्तरांवर त्यांचे मूल्यमापन होऊ शकत नाही. त्यामुळे प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देत त्या अनुषंगाने परीक्षा पद्धतीत बदल व्हायला हवा, असे मत डॉ. सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र