शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

दहा राज्यांमध्ये अभियांत्रिकीचे मातृभाषेतून शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 22:17 IST

Nagpur News देशात मराठीसह इतर पाच भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जात आहे. दहा राज्यांमधील १९ महाविद्यालयांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन ‘एआयसीटीई’चे (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले.

ठळक मुद्देपुढील दोन वर्षे नवीन महाविद्यालयांना मान्यता नाही

नागपूर : . राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेतून उच्चशिक्षणावर भर देण्यात आला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण केवळ इंग्रजीतूनच द्यावे, असा कुठेही उल्लेख नाही. परंतु तशी परंपराच चालली. मात्र आता स्थिती बदलते आहे. देशात मराठीसह इतर पाच भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जात आहे. दहा राज्यांमधील १९ महाविद्यालयांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन ‘एआयसीटीई’चे (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित चर्चासत्रासाठी ते नागपुरात आले होते. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

मराठीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याचा प्रयोग पिंपरी-चिंचवडमधील एका महाविद्यालयाने सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य मातृभाषेत उपलब्ध होत नसल्याची अडचण असते. त्यामुळे आता एआयसीटीई स्वत: विविध भाषांमध्ये अभ्यासाचे साहित्य तयार करण्यावर जोर देत असून, सहा भाषांमधील पुस्तके तयार झाली आहेत. यात तेलगू, तामीळ, कन्नड, मराठी, हिंदी आणि बांगला या भाषांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आवश्यकतेपेक्षा जास्त अभियांत्रिकी महाविद्यालये असल्याने, अनेक ठिकाणी जागा रिक्त राहत होत्या. त्यामुळे मागील दोन वर्षे एकाही नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी देण्यात आली नाही. पुढील दोन वर्षेदेखील परवानगी देण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ‘एआयसीटीई’चे सल्लागार डॉ. राजेंद्र काकडे हे देखील उपस्थित होते.

अभियांत्रिकीसाठी भारतीय पारंपरिक ज्ञानावर पुस्तक

अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात भारतीय पारंपरिक ज्ञानदेखील समाविष्ट झाले पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे एका ठिकाणी असावे व त्या माध्यमातून क्रेडिट आधारित अभ्यासक्रम सुरू करता यावा, यासाठी पुस्तक तयार करण्यात येत असल्याचे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

उच्च शिक्षणातील नोंदणी प्रमाण ५० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट

येणाऱ्या पाच वर्षांत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २७ टक्क्यापासून ते ५० टक्क्यापर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ‘एआयसीटीई’ने ठेवले आहे. याशिवाय अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांसाठी विशिष्ट अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, तो पूर्ण केल्याशिवाय त्यांना नियमित होता येणार नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.

परीक्षा पद्धतीत प्रात्यक्षिक ज्ञानावर भर हवा

विद्यापीठांच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदलांची गरज आहे. तीन तासात विद्यार्थ्यांनी पाठांतर केलेल्या उत्तरांवर त्यांचे मूल्यमापन होऊ शकत नाही. त्यामुळे प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देत त्या अनुषंगाने परीक्षा पद्धतीत बदल व्हायला हवा, असे मत डॉ. सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र