शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

देशातील आर्थिक मंदी जाणीवपूर्वक  : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 20:04 IST

आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देआरएसएसचा अजेंडा कठोरपणे राबवण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात ४० टक्के लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहतात. त्यामुळे या देशात आर्थिक मंदी कधीच येऊ शकत नाही. आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली.प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशातील पहिल्या पंतप्रधानांपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत एकाही पंतप्रधानांना देशात आर्थिक परिस्थिती चांगली लाभली नाही. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पहिल्यांदा देशात चांगली आर्थिक परिस्थिती लाभली. परंतु त्यांनी याचा फायदा घेतला नाही. उलट नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन या देशातील छोट्या उद्योगांचे कंबरडे मोडण्याचे काम केले. यातच जीएसटीसारखा निर्णय घेतला. हा सर्व प्रकार आरएसएसचा छुपा अजेंडा या देशात राबवण्यासाठी केलेला होता. हा देश कसा चालवावा याचे एक ‘फ्रे मवर्क’ ज्याला आरएसएसचे संविधानही म्हणता येऊ शकेल, असे तयार आहे. २००३ साली अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना मी खासदार होतो. तेव्हा आरएसएसची राज्यघटना मी लोकसभेच्या पटलावर ठेवली होती. त्यांचे संपूर्ण फ्रेमवर्क कसे तयार आहे, हे मी सांगितले होते. ते आजही लोकसभेत आहे.सीएए-एनपीआर,एनआरसी हा त्यातलाच प्रकार आहे. अगोदर सरकार एनपीआर आणणार आहे. त्यानंतर एनआरसी लावण्यात येईल. सीएएच्या माध्यमातून केंद्र सरकार असे सांगत आहे की, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून येणारे हिंदू, बौद्ध, पारशी, जैन, सीख आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व दिले जाईल. परंतु हे केवळ एक बूम आहे. अगोदर नागरिकत्व घालवायचे आहे. नागरिकत्व गेले की संपत्तीचा अधिकार जातो. हा आरएसएसचाच अजेंडा असून, याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.सावरकरांचा सन्मान करण्यापूर्वी त्यावर चर्चा व्हावीसावरकरांना भारतरत्न देण्यावरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारी होते. परंतु यासोबतच इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या पत्रिसरकारच्या विरोधात त्यांची भूमिका राहिली आहे. एकूणच सावरकर यांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. तेव्हा त्यांचा सन्मान करीत असताना त्यावर चर्चा झाली पाहिजे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरEconomyअर्थव्यवस्था