शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

देशातील आर्थिक मंदी जाणीवपूर्वक  : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 20:04 IST

आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देआरएसएसचा अजेंडा कठोरपणे राबवण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात ४० टक्के लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहतात. त्यामुळे या देशात आर्थिक मंदी कधीच येऊ शकत नाही. आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली.प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशातील पहिल्या पंतप्रधानांपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत एकाही पंतप्रधानांना देशात आर्थिक परिस्थिती चांगली लाभली नाही. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पहिल्यांदा देशात चांगली आर्थिक परिस्थिती लाभली. परंतु त्यांनी याचा फायदा घेतला नाही. उलट नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन या देशातील छोट्या उद्योगांचे कंबरडे मोडण्याचे काम केले. यातच जीएसटीसारखा निर्णय घेतला. हा सर्व प्रकार आरएसएसचा छुपा अजेंडा या देशात राबवण्यासाठी केलेला होता. हा देश कसा चालवावा याचे एक ‘फ्रे मवर्क’ ज्याला आरएसएसचे संविधानही म्हणता येऊ शकेल, असे तयार आहे. २००३ साली अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना मी खासदार होतो. तेव्हा आरएसएसची राज्यघटना मी लोकसभेच्या पटलावर ठेवली होती. त्यांचे संपूर्ण फ्रेमवर्क कसे तयार आहे, हे मी सांगितले होते. ते आजही लोकसभेत आहे.सीएए-एनपीआर,एनआरसी हा त्यातलाच प्रकार आहे. अगोदर सरकार एनपीआर आणणार आहे. त्यानंतर एनआरसी लावण्यात येईल. सीएएच्या माध्यमातून केंद्र सरकार असे सांगत आहे की, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून येणारे हिंदू, बौद्ध, पारशी, जैन, सीख आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व दिले जाईल. परंतु हे केवळ एक बूम आहे. अगोदर नागरिकत्व घालवायचे आहे. नागरिकत्व गेले की संपत्तीचा अधिकार जातो. हा आरएसएसचाच अजेंडा असून, याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.सावरकरांचा सन्मान करण्यापूर्वी त्यावर चर्चा व्हावीसावरकरांना भारतरत्न देण्यावरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारी होते. परंतु यासोबतच इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या पत्रिसरकारच्या विरोधात त्यांची भूमिका राहिली आहे. एकूणच सावरकर यांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. तेव्हा त्यांचा सन्मान करीत असताना त्यावर चर्चा झाली पाहिजे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरEconomyअर्थव्यवस्था