शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

देशातील आर्थिक मंदी जाणीवपूर्वक  : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 20:04 IST

आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देआरएसएसचा अजेंडा कठोरपणे राबवण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात ४० टक्के लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहतात. त्यामुळे या देशात आर्थिक मंदी कधीच येऊ शकत नाही. आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली.प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशातील पहिल्या पंतप्रधानांपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत एकाही पंतप्रधानांना देशात आर्थिक परिस्थिती चांगली लाभली नाही. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पहिल्यांदा देशात चांगली आर्थिक परिस्थिती लाभली. परंतु त्यांनी याचा फायदा घेतला नाही. उलट नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन या देशातील छोट्या उद्योगांचे कंबरडे मोडण्याचे काम केले. यातच जीएसटीसारखा निर्णय घेतला. हा सर्व प्रकार आरएसएसचा छुपा अजेंडा या देशात राबवण्यासाठी केलेला होता. हा देश कसा चालवावा याचे एक ‘फ्रे मवर्क’ ज्याला आरएसएसचे संविधानही म्हणता येऊ शकेल, असे तयार आहे. २००३ साली अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना मी खासदार होतो. तेव्हा आरएसएसची राज्यघटना मी लोकसभेच्या पटलावर ठेवली होती. त्यांचे संपूर्ण फ्रेमवर्क कसे तयार आहे, हे मी सांगितले होते. ते आजही लोकसभेत आहे.सीएए-एनपीआर,एनआरसी हा त्यातलाच प्रकार आहे. अगोदर सरकार एनपीआर आणणार आहे. त्यानंतर एनआरसी लावण्यात येईल. सीएएच्या माध्यमातून केंद्र सरकार असे सांगत आहे की, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून येणारे हिंदू, बौद्ध, पारशी, जैन, सीख आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व दिले जाईल. परंतु हे केवळ एक बूम आहे. अगोदर नागरिकत्व घालवायचे आहे. नागरिकत्व गेले की संपत्तीचा अधिकार जातो. हा आरएसएसचाच अजेंडा असून, याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.सावरकरांचा सन्मान करण्यापूर्वी त्यावर चर्चा व्हावीसावरकरांना भारतरत्न देण्यावरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारी होते. परंतु यासोबतच इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या पत्रिसरकारच्या विरोधात त्यांची भूमिका राहिली आहे. एकूणच सावरकर यांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. तेव्हा त्यांचा सन्मान करीत असताना त्यावर चर्चा झाली पाहिजे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरEconomyअर्थव्यवस्था