शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

आर्थिक संकट! नागपूर मनपाला हवे २०० कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:23 IST

उत्पन्नाचे मर्यादित स्रोत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला यातून बाहेर पडण्यासाठी कर्ज घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याचा विचार करता १५० ते २०० कोटींचे कर्ज घेतल्यानंतरच महापालिकेची आर्थिक गाडी रुळावर येईल.

ठळक मुद्देआर्थिक प्रश्नांमधून बाहेर पडण्यात अपयश २०० कोटींच्या कर्जाचा बोजा वाढणार

राजीव सिंग।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्पन्नाचे मर्यादित स्रोत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला यातून बाहेर पडण्यासाठी कर्ज घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याचा विचार करता १५० ते २०० कोटींचे कर्ज घेतल्यानंतरच महापालिकेची आर्थिक गाडी रुळावर येईल. परंतु महापालिकेवर आधीच ५२९ कोटींचे कर्ज असल्याने नवीन कर्ज काढले तरी परिस्थितीत फारशी सुधारणा होण्याची शक्यता नाही.कंत्राटदारांची बिले तर दूरच सेवानिवृत्त होणारे कर्मचारी व अधिकाºयांना देणी देताना महापालिकेच्या वित्त विभागाची दमछाक होत आहे. दरवर्षी दिवाळीला कंत्राटदारांना बिले दिली जात होती. परंतु यावेळी दिवाळीनंतर वित्त विभागात चिंतेचे वातावरण आहे. मदन घाडगे सेवानिवृत्त झाल्यानंतर वित्त विभागाची जबाबदारी मोना ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली. परंतु कंत्राटदार व ज्यांची बिले थकीत आहेत त्यांना वित्त विभागातून परत पाठविले जात असल्याने असंतोष वाढला आहे. त्यातच जाणकारांच्या मते केंद्र व राज्य सरकारडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता नाही.मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य स्रोत आहे. परंतु या विभागाची गेल्या काही दिवसातील वसुली थंडावली आहे. आजवर १३० कोटींचीच वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.५० कोटींनी अधिक आहे. केंद्र्र व राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी मिळालेले अनुदानही खर्च करण्यात आले आहे. त्यामुळे आता कर्ज हा एकच पर्याय शिल्लक आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला आर्थिक स्रोत वाढविण्याचा सल्ला दिला आहे.तर कर्ज घेण्याची वेळ येणार नाहीराज्य सरकारकडे प्रलंबित असलेले अनुदान मिळाले तर महापालिकेला कर्ज घ्यावे लागणार नाही. तसेच मार्च अखेरपर्यंत मालमत्ता करातून २५० ते २६० कोटी जमा झाले तर कर्जाचे प्रमाण कमी होईल. राज्य सरकारला नागपूर महापालिकेला निधी देण्यात कोणतीही अडचण नाही. कारण शिक्षण, आरोग्य विभागाचे विशेष अनुदान गेल्या काही वर्षापासून महापालिकेला मिळालेले नाही. शिक्षण विभागाचे २५.९ कोटी तर सुरेश भट सभागृहाचे ३७.८५ कोटी, मुद्रांक शुल्काचे ३९ कोटी तसेच १९९६ -९७ या वर्षातील १४१.४१ कोटींचे अनुदान राज्य सरकारडे प्रलंबित आहे. अशाप्रकारे २७६.९६ कोटी प्रलंबित आहेत. यातील २०० कोटी मिळाले तरी महापालिकेला कर्ज घ्यावे लागणार नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका