शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

सक्षम पत्रकारितेतूनच देशाला आर्थिक आणि सामाजिक न्याय : सिद्धार्थ वरदराजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:41 IST

पत्रकारिता ही मूल्यांवर आधारलेली असते. त्यामुळे सक्षम पत्रकारिताच या देशातील लोकशाही बळकट करू शकते तसेच या देशातील आर्थिक आणि सामाजिक न्यायही यातूनच मिळविला जाऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक सिद्धार्थ वरदराज यांनी केले.

ठळक मुद्दे‘मूकनायक’ शताब्दी समारोह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्रकारिता ही मूल्यांवर आधारलेली असते. त्यामुळे सक्षम पत्रकारिताच या देशातील लोकशाही बळकट करू शकते तसेच या देशातील आर्थिक आणि सामाजिक न्यायही यातूनच मिळविला जाऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक सिद्धार्थ वरदराज यांनी केले.दीक्षाभूमी येथील ऑडिटोरियम सभागृहात मंगळवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मूकनायक’ पत्रकारितेचा शताब्दी समारंभ झाला. अध्यक्षस्थानी प्रा. रणजित मेश्राम होते. ज्येष्ठ संपादक सुभाष शिर्के आणि कार्यक्रमाचे आयोजक आवाज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमन कांबळे मुख्य पाहुणे होते.प्रश्न विचारण्याची हिंमत विसरलात तर पत्रकारितेला काहीच अर्थ नाही, असे डॉ. आंबेडकर म्हणायचे, याची आठवण करून सिद्धार्थ वरदराज म्हणाले, मीडियावर सामाजिक जबाबदारी मोठी असते. मात्र आज मीडिया धोक्याच्या वळणावर उभा असल्याचा इशारा त्यांनी दिला. मीडियात सामाजिक प्रश्नांना हवे तेवढे स्थान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेबांनी मूकनायकची सुरुवातच बहुजनांचा अर्थात भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी केली होती. मात्र १०० वर्षांनंतरही असे होत नसेल तर लोकशाही धोक्यात आहे, असे समजावे लागेल. व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. मात्र त्यात खरेपणा जपा, असे अवाहन पत्रकारितेतील नवोदितांना केले. दिसते ती सत्य परिस्थिती मांडा. सतत व्यक्त होत राहा, तिरंग्याचा आदर्श पायदळी तुडविणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा, असा सल्ला त्यांनी दिला.सुभाष शिर्के म्हणाले, पत्रकारितेतील बाबासाहेबांची दृष्टी वेगळी होती. त्यांचे पत्रकारितेतील मोठेपण देशातील तत्कालीन नेत्यांना उशिरा कळले. मीडियाची शक्ती त्यांनी ओळखली होती, मात्र बहुजन समाजाने मीडियाकडे लक्ष दिले नाही. देशातील मीडियात कोणत्या समाजाचे किती आहेत याचा सर्वे व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.प्रा. रणजित मेश्राम म्हणाले, बाबासाहेबांची पत्रकारिता म्हणजे समाजाचा आरसा होती. त्यांचा संतसाहित्यावर प्रचंड अभ्यास होता. त्यांनी विषमतेवर सतत प्रहार केले. मूकनायक आणि नंतरच्या पत्रकारितेतून त्यांनी पेरलेले बीज लोकशाही सशक्त करणारे आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या मुख्य पाहुण्या अरफा खानन शेरवानी येऊ शकल्या नाहीत. यांचा संदेश यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आला. प्रास्ताविक अमन कांबळे यांनी केले. संचालन राजेंद्र फुले यांनी केले. नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरJournalistपत्रकार