शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मिठाई खा, पण जरा जपून

By admin | Updated: October 30, 2016 02:51 IST

दिवाळीत निरनिराळ्या प्रकारची मिठाई खरेदी करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी

काळजीपूर्वक खरेदी करा : अन्न व औषध प्रशासनाचे आवाहननागपूर : दिवाळीत निरनिराळ्या प्रकारची मिठाई खरेदी करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच मिठाई निर्मिती करणारे आणि विक्री करणाऱ्यांनी मिठाईची शुद्धता आणि चवीबाबत जागृत राहावे. मुदत संपल्यानंतर मिठाईची विक्री करू नये. कारण ऐन सणाच्या काळात मुदतबाह्य मिठाई खाण्यात आली तर विषबाधा होऊ शकते. नागरिकांनी मिठाई खरेदी करताना मुदतीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केले आहे. मुदतीनंतरच्या मिठाईने होऊ शकते विषबाधादिवाळीत निरनिराळ्या प्रकारची मिठाई खरेदी केली जाते. या काळात आप्तस्वकीयांना भेटकार्ड देताना सणाचा गोडवा अधिक वाढावा यासाठी मिठाई देण्याची प्रथा आहे. या काळात दुग्धजन्य मिठाईची सर्वाधिक खरेदी केली जाते. मुदतीनंतर मिठाई खाण्यात आली तर विषबाधा होऊ शकते. त्यामुळे मिठाई खरेदी करताना नागरिकांनी मुदतीचा आणि संभाव्य विषबाधेचा विचार करावा. मिठाई विकताना उत्पादक कंपनी आणि विक्रेत्यांनीही डब्यावर मुदतीचा उल्लेख करावा. मुदतबाह्य मिठाई विकू नये. कारण दिवाळीचा आनंद साजरा होत असताना मिठाई खाण्यातून विषबाधा होऊ नये. अन्न आणि औषध प्रशासन ठिकठिकाणी तपासणी करीत आहे. पण नागरिकांनी मिठाई खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात विषबाधेच्या घटनादिवाळीत मिठाईमुळे विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दिवाळी सणात अनेक हॉटेलमालक मिठाईचे उत्पादन महिन्यापूर्वीच सुरू करतात. दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केलेली मिठाई जास्त दिवस टिकत नाही, हे सर्वश्रुत आहे. बहुतांश उत्पादक मिठाईच्या पॅकेजवर मुदत तारखेचा उल्लेख करीत नाहीत. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिवाळीत शहरातील सर्व रेस्टॉरंटमध्ये मिठाईची तपासणी करणे शक्य नाही, पण जास्तीतजास्त रेस्टॉरंटची तपासणी करण्यात येते. याशिवाय बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या खोव्याचा दर्जा तपासण्यात येत आहे. निकृष्ट असलेला खोवा जप्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका रेस्टॉरंटमधून निकृष्ट मिठाई जप्त केली आहे. दिवाळीत विभाग सज्ज असल्याचे अधिकारी म्हणाला.