शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

‘पंचगव्य’ सेवन करा, ‘कोरोना’ला लांब ठेवा; गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:31 IST

गाईच्या पंचगव्यापासून शरीराची क्षमता वाढते आणि आज जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंपासून लांब राहता येते, असा दावा देवलापारच्या गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने केला आहे.

ठळक मुद्देआरोग्य मंत्रालयास संशोधनासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरात सार्स, स्वाईन फ्लू, चिकन गुन्यासारख्या विषाणूंचा इतिहास सगळ्यांनीच बघितला आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यावर प्रतिकारक औषधांवर संशोधन केले जाते. मात्र, आयुर्वेदात अशा विषाणूंचा प्रभाव टाळण्यासाठी मानवाची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याचे गुण सांगितले आहेत. गाईच्या पंचगव्यापासून शरीराची क्षमता वाढते आणि आज जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंपासून लांब राहता येते, असा दावा देवलापारच्या गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने केला आहे. बडकस चौक येथील केंद्राच्या मुख्य कार्यालयात मंगळवारी पत्रपरिषदेत हा दावा केंद्राचे समन्वयक सुनील मानसिंहका व नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांच्यासह डॉ. हेमंत जांभेकर, डॉ. संजय काते, वैद्य नंदिनी भोजराज व सनत गुप्ता यांनी केला.डॉ. तपन चक्रवर्ती यांनी कोरानाची लक्षणे आणि त्यासंदर्भात घ्यावयाच्या काळजीवर प्रकाश टाकला. कोरोना विषाणूने जगाला विळखा घातला आहे. त्यातुलनेत भारतात याचा प्रभाव कमी दिसून येत आहे. त्याचे कारण आपल्याकडील रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. कोरोना विषाणू चार मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचा असल्याने, तो स्वत: लांब जाऊ शकत नाही किंवा उडूही शकत नाही. हा विषाणू संसर्गामुळेच होतो, हे सिद्ध झाले आहे. संसर्ग होऊ नये म्हणून गोमूत्र अर्क आणि गोमूत्र आसव हे दोन उपाय अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आज देशभरात दहा लाखावर लोक अर्क व आसवाचे सेवन करीत आहेत. यापूर्वी स्वाईन फ्लूच्या वेळी आम्ही याचा प्रयोग केला तेव्हा ७५ टक्के सेवन करणाऱ्या लोकांना स्वाईन फ्लूची बाधा झाली नव्हती आणि ज्यांना झाली त्यांना अगदी सौम्य बाधा झाल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गोमूत्र अर्क, गोमूत्र आसव यासह नस्य व धुपम ही प्रक्रिया उत्तम असल्याचा दावा त्यांनी केला. यावरील संशोधनाचे प्रस्ताव केंद्रातर्फे पाठविण्यात येत असून, देशभरातून आयुर्वेदिक तज्ज्ञांचेही याला समर्थन असल्याचे सुनील मानसिंहका यांनी सांगितले. अ‍ॅलोपॅथी औषधांनी रोग होऊच नये, याची काळजी कधीच घेतली नाही. मात्र आपल्याकडील आयुर्वेदाने प्राचीन काळापासून कुठल्याही विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना आधीच स्पष्ट केल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस