शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

‘पंचगव्य’ सेवन करा, ‘कोरोना’ला लांब ठेवा; गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:31 IST

गाईच्या पंचगव्यापासून शरीराची क्षमता वाढते आणि आज जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंपासून लांब राहता येते, असा दावा देवलापारच्या गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने केला आहे.

ठळक मुद्देआरोग्य मंत्रालयास संशोधनासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरात सार्स, स्वाईन फ्लू, चिकन गुन्यासारख्या विषाणूंचा इतिहास सगळ्यांनीच बघितला आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यावर प्रतिकारक औषधांवर संशोधन केले जाते. मात्र, आयुर्वेदात अशा विषाणूंचा प्रभाव टाळण्यासाठी मानवाची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याचे गुण सांगितले आहेत. गाईच्या पंचगव्यापासून शरीराची क्षमता वाढते आणि आज जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंपासून लांब राहता येते, असा दावा देवलापारच्या गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने केला आहे. बडकस चौक येथील केंद्राच्या मुख्य कार्यालयात मंगळवारी पत्रपरिषदेत हा दावा केंद्राचे समन्वयक सुनील मानसिंहका व नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांच्यासह डॉ. हेमंत जांभेकर, डॉ. संजय काते, वैद्य नंदिनी भोजराज व सनत गुप्ता यांनी केला.डॉ. तपन चक्रवर्ती यांनी कोरानाची लक्षणे आणि त्यासंदर्भात घ्यावयाच्या काळजीवर प्रकाश टाकला. कोरोना विषाणूने जगाला विळखा घातला आहे. त्यातुलनेत भारतात याचा प्रभाव कमी दिसून येत आहे. त्याचे कारण आपल्याकडील रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. कोरोना विषाणू चार मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचा असल्याने, तो स्वत: लांब जाऊ शकत नाही किंवा उडूही शकत नाही. हा विषाणू संसर्गामुळेच होतो, हे सिद्ध झाले आहे. संसर्ग होऊ नये म्हणून गोमूत्र अर्क आणि गोमूत्र आसव हे दोन उपाय अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आज देशभरात दहा लाखावर लोक अर्क व आसवाचे सेवन करीत आहेत. यापूर्वी स्वाईन फ्लूच्या वेळी आम्ही याचा प्रयोग केला तेव्हा ७५ टक्के सेवन करणाऱ्या लोकांना स्वाईन फ्लूची बाधा झाली नव्हती आणि ज्यांना झाली त्यांना अगदी सौम्य बाधा झाल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गोमूत्र अर्क, गोमूत्र आसव यासह नस्य व धुपम ही प्रक्रिया उत्तम असल्याचा दावा त्यांनी केला. यावरील संशोधनाचे प्रस्ताव केंद्रातर्फे पाठविण्यात येत असून, देशभरातून आयुर्वेदिक तज्ज्ञांचेही याला समर्थन असल्याचे सुनील मानसिंहका यांनी सांगितले. अ‍ॅलोपॅथी औषधांनी रोग होऊच नये, याची काळजी कधीच घेतली नाही. मात्र आपल्याकडील आयुर्वेदाने प्राचीन काळापासून कुठल्याही विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना आधीच स्पष्ट केल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस