शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

‘एमआरओ’चे ‘ईएएसए सर्टिफिकेशन’ लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 10:34 AM

नागपुरात एअर इंडियाच्या ‘एमआरओ’ला ‘युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए)’ हवे असलेले सर्टिफिकेशनचे काम टाळेबंदीमुळे लटकले आहे.

ठळक मुद्देमहाद्विपीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात एअर इंडियाच्या ‘एमआरओ’ला ‘युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए)’ हवे असलेले सर्टिफिकेशनचे काम टाळेबंदीमुळे लटकले आहे. हे प्रमाणपत्र व्यापारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून, याच आधारावर मिहान स्थित एमआरओचा व्यापार अन्य महाद्विपांपर्यंत विस्तारित होऊ शकते.

‘ईएएसए सर्टिफिकेशन’साठी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (एआयईएलएल)ने गेल्या वर्षाच्या अखेरीस आवेदन केले होते. त्यानंतर २०२० मध्ये बेल्जियम येथून आलेल्या ईएएसएच्या टीमने एमआरओचे आॅडिट केले होते. मात्र, याच काळात कोविड-१९चा प्रादुर्भाव सुरू झाला आणि टाळेबंदीमुळे ही प्रक्रिया थंडबस्त्यात गेली. हे सर्टिफिकेशन मिळाल्यावर आशिया खंडातील अनेक देशांचे बोर्इंग ७७७ व ७३७ आणि एअरबस ३२० विमान नागपूरच्या एमआरओमध्ये दुरुस्तीसाठी आणले जाऊ शकतात. ईएएसए सर्टिफिकेशन असलेल्या एमआरओमध्येच आपले विमान देखदेखीकरिता जावे, असेही विमाने बनविणाऱ्या कंपनीला वाटते.

शिवाय, देशातील विविध एअरलाईन्सच्या बेड्यात बहुतांश विमाने याच युरोपियन एअरबस कंपनीची आहेत. हे सर्टिफिकेशन प्राप्त झाल्यास मेजर चेक्ससाठी एअरबसच्या विमानांना देशाच्या बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. वर्तमानात शेजारच्या श्रीलंकेकडे ईएएसए सर्टिफिकेशन आहे. त्यामुळेच, भारतातून अनेक एअरक्राफ्ट उच्चस्तरीय देखरेखीकरिता श्रीलंकेत पाठविण्यात येत असतात. सद्य:स्थितीत एमआरओकडे फेडरल एव्हिएशन एजन्सी (एफएए)चे सर्टिफिकेशन आहे.

देशात केंद्रीय व्यवस्था असल्यामुळे ईएएसए सर्टिफिकेशन प्राप्त झाल्यावर कतर एअरवेज, एतिहाद सह अन्य खाडी देशांतील विमान कंपन्या आपली विमाने नागपुरातच देखरेखीकरिता पाठवू शकतात. नागपुरात रनवे बहुतांश वेळेस रिकामे असते आणि एमआरओमध्ये आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित व्यवस्था असल्यानेच, हे सर्टिफिकेशन प्राप्त झाले तर या विमानन कंपन्यांना त्याचा लाभ मिळू शकतो.

टॅग्स :Airportविमानतळ