शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भूकंपाची हॅटट्रिक, ही संकटाची चाहुल तर नाही ना? केंद्र उमरेड तालुक्यात

By निशांत वानखेडे | Updated: May 5, 2024 18:11 IST

केंद्र उमरेड तालुक्यात, तीव्रता २.७ वर : प्रशासन म्हणते, धाेका नाहीच

नागपूर : रविवारी नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे साैम्य धक्के बसले. उमरेड तालुक्यातील आमगाव, देवळी, भिवगड या गावांच्या मध्ये भूकंपाचे केंद्र हाेते व रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता २.७ नाेंदविण्यात आली. ही भूकंपाची हॅटट्रिक ठरली असल्याने ही येणाऱ्या माेठ्या संकटाची चाहुल तर नाही ना, असा भीतीयुक्त सवाल सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

नागपूर जिल्ह्यात रविवारी सलग तिसऱ्या दिवशी भूगर्भातील हालचालींचा कंप अनुभवण्यात आला. भूविज्ञान मंत्रालयाच्या भूकंप विज्ञान केंद्राने दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी या भूकंपाची नाेंद केली. शनिवारी कुहीनंतर आज उमरेड तालुक्यातील आमगाव या गावाजवळ भूकंपाचे केंद्र हाेते व त्याची खाेली ५ किलाेमीटरवर हाेती. 

भूकंपाची तीव्रता कमी असल्याने याची जाणीव नागरिकांना झाली नाही. मात्र सलग तिसऱ्या दिवशी या भूकंपाची नाेंद झाल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी पारशिवनी, शनिवारी कुही व रविवारी उमरेड तालुक्यात भूकंपाचे केंद्र आहेत. तसा नागपूर जिल्ह्यात भूकंपाची ही चाैथी घटना आहे. यापूर्वी २६ मार्च राेजी जिल्ह्यात सलग दाेनदा धरणीकंप झाल्याची नाेंद करण्यात आली. त्यावेळी रिश्टर स्केलवरील तीव्रता २.८ एवढ्या क्षमतेची हाेती. अशाप्रकारे सातत्याने हाेणाऱ्या घटनांमध्ये नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.

नागरिकांमध्ये भीती असली तरी प्रशासनाकडून भविष्यात भाैगाेलिक आपत्तीचा इनकार केला जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मते अशाप्रकारे साैम्य स्वरुपाचे धक्के ही धाेकदायक बाब नाही. दुसरीकडे केंद्रीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागानेही ही भूगर्भातील सामान्य घडामाेड असल्याचे म्हटले आहे. नागपूरचा भूगर्भ परिसर सलग एका प्लेटने बनलेला असल्याने कुठल्याही भूकंपाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहेल. मात्र काही अनावश्यक हालचालींमुळे साखळीने भूकंप घडत असल्याचे जीएसआयच्या एका वैज्ञानिकांनी स्पष्ट केले.

खाणीतील हालचाली भूकंपाचे कारण?जिल्ह्यात झालेले भूकंपाचे चारही धक्के खाणकाम असलेल्या भागात झाले आहेत. पारशिवनी भागात काेळसा खाण, कुही भागात काळ्या दगडाच्या खाणी तर रविवारी उमरेड तालुक्यात झालेला भूकंपाचे केंद्र हे वेकाेलि काेळसा खाणीच्या भागात आहे. यामुळे खाणीमध्ये उत्खननासाठी हाेणाऱ्या स्फाेटांमुळे हादरे बसत असल्याचे बाेलले जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जीएसआयच्या वैज्ञानिकांनी यावर भाष्य केले नाही.

या विभागांकडून काेणत्या हालचाली?- जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने पहिल्या दिवशी झालेल्या भूकंपाबाबत सर्वेक्षण करून अहवाल सरकारकडे पाठविल्याचे सांगितले.- भूकंपाची तीव्रता अतिशय कमी असल्यामुळे जीएसआयने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले पण सलग भूकंप हाेत असल्याने त्यांनीही हालचाली सुरू केल्याचे सुत्राकडून समजते.- भारतीय हवामान विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे हाेणाऱ्या भूकंपाबाबत तपास व अभ्यास केला जात असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरEarthquakeभूकंप