शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाची हॅटट्रिक, ही संकटाची चाहुल तर नाही ना? केंद्र उमरेड तालुक्यात

By निशांत वानखेडे | Updated: May 5, 2024 18:11 IST

केंद्र उमरेड तालुक्यात, तीव्रता २.७ वर : प्रशासन म्हणते, धाेका नाहीच

नागपूर : रविवारी नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे साैम्य धक्के बसले. उमरेड तालुक्यातील आमगाव, देवळी, भिवगड या गावांच्या मध्ये भूकंपाचे केंद्र हाेते व रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता २.७ नाेंदविण्यात आली. ही भूकंपाची हॅटट्रिक ठरली असल्याने ही येणाऱ्या माेठ्या संकटाची चाहुल तर नाही ना, असा भीतीयुक्त सवाल सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

नागपूर जिल्ह्यात रविवारी सलग तिसऱ्या दिवशी भूगर्भातील हालचालींचा कंप अनुभवण्यात आला. भूविज्ञान मंत्रालयाच्या भूकंप विज्ञान केंद्राने दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी या भूकंपाची नाेंद केली. शनिवारी कुहीनंतर आज उमरेड तालुक्यातील आमगाव या गावाजवळ भूकंपाचे केंद्र हाेते व त्याची खाेली ५ किलाेमीटरवर हाेती. 

भूकंपाची तीव्रता कमी असल्याने याची जाणीव नागरिकांना झाली नाही. मात्र सलग तिसऱ्या दिवशी या भूकंपाची नाेंद झाल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी पारशिवनी, शनिवारी कुही व रविवारी उमरेड तालुक्यात भूकंपाचे केंद्र आहेत. तसा नागपूर जिल्ह्यात भूकंपाची ही चाैथी घटना आहे. यापूर्वी २६ मार्च राेजी जिल्ह्यात सलग दाेनदा धरणीकंप झाल्याची नाेंद करण्यात आली. त्यावेळी रिश्टर स्केलवरील तीव्रता २.८ एवढ्या क्षमतेची हाेती. अशाप्रकारे सातत्याने हाेणाऱ्या घटनांमध्ये नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.

नागरिकांमध्ये भीती असली तरी प्रशासनाकडून भविष्यात भाैगाेलिक आपत्तीचा इनकार केला जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मते अशाप्रकारे साैम्य स्वरुपाचे धक्के ही धाेकदायक बाब नाही. दुसरीकडे केंद्रीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागानेही ही भूगर्भातील सामान्य घडामाेड असल्याचे म्हटले आहे. नागपूरचा भूगर्भ परिसर सलग एका प्लेटने बनलेला असल्याने कुठल्याही भूकंपाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहेल. मात्र काही अनावश्यक हालचालींमुळे साखळीने भूकंप घडत असल्याचे जीएसआयच्या एका वैज्ञानिकांनी स्पष्ट केले.

खाणीतील हालचाली भूकंपाचे कारण?जिल्ह्यात झालेले भूकंपाचे चारही धक्के खाणकाम असलेल्या भागात झाले आहेत. पारशिवनी भागात काेळसा खाण, कुही भागात काळ्या दगडाच्या खाणी तर रविवारी उमरेड तालुक्यात झालेला भूकंपाचे केंद्र हे वेकाेलि काेळसा खाणीच्या भागात आहे. यामुळे खाणीमध्ये उत्खननासाठी हाेणाऱ्या स्फाेटांमुळे हादरे बसत असल्याचे बाेलले जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जीएसआयच्या वैज्ञानिकांनी यावर भाष्य केले नाही.

या विभागांकडून काेणत्या हालचाली?- जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने पहिल्या दिवशी झालेल्या भूकंपाबाबत सर्वेक्षण करून अहवाल सरकारकडे पाठविल्याचे सांगितले.- भूकंपाची तीव्रता अतिशय कमी असल्यामुळे जीएसआयने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले पण सलग भूकंप हाेत असल्याने त्यांनीही हालचाली सुरू केल्याचे सुत्राकडून समजते.- भारतीय हवामान विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे हाेणाऱ्या भूकंपाबाबत तपास व अभ्यास केला जात असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरEarthquakeभूकंप