शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पृथ्वीलाही ‘लॉकडाऊन’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 10:53 IST

पृथ्वीचे तापमान वाढत आहे, याचा अर्थ पृथ्वी आजारी आहे आणि हा आजार दूर करण्यासाठी 'लॉकडाऊन'सारख्या उपचाराची नक्कीच गरज आहे. जलवायू परिवर्तनाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक याबाबत गंभीर इशारा देत आहेत.

ठळक मुद्देजलवायू परिवर्तनाचे दिसतील गंभीर परिणाम वैज्ञानिकांचा इशारा

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तापमान आणि हवामान बदल याच घटकांवरून जलवायू परिवर्तनाचे आकलन करता येणार नाही. मात्र कोरोनासारखा कोणताही आजार आला की माणसाच्या शरीराचे तापमान वाढते त्याचप्रमाणे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, याचा अर्थ पृथ्वी आजारी आहे आणि हा आजार दूर करण्यासाठी 'लॉकडाऊन'सारख्या उपचाराची नक्कीच गरज आहे. जलवायू परिवर्तनाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक याबाबत गंभीर इशारा देत आहेत.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)च्या जलवायू परिवर्तन विभागाचे प्रमुख व प्रधान वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे यांनी गेल्या काही वर्षांतील वातावरणात झालेले बदल अधोरेखित केले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात थोड्या अधिक फरकाने पण जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात निर्धारित व नियमित स्वरूपात येतो. गेल्या वर्षी मात्र जून संपल्यावर पाऊस सुरू झाला आणि पुढे हिवाळ्यापर्यंत गेला आणि वर्षभर थोड्या थोड्या दिवसाने हजेरी लावली. तापमान २ ते ३ अंशाने वाढलेच आहे. हा वरवर दिसणारा फरक झाला. मात्र जलवायू परिवर्तनामुळे पृथ्वीवरील अनेक प्राणी आणि पक्षी नामशेष होण्याच्या स्थितीत पोहचले आहेत. एवढेच नाही तर काही वनस्पतीही नष्ट झाल्या आहेत. भविष्यात कदाचित या संकटामुळे काही वनस्पती बहरणार नाही. यामुळे जैवविविधतेवर अदृश्य असे परिणाम होत आहेत.कार्बन सायकल व हायड्रोलॉजिकल सायकल (पाणी) हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. टाळेबंदीमुळे जलवायू परिवर्तनात मोठी आणि सकारात्मक घट झाली. यासाठी कोणते मोठे तंत्रज्ञान व खर्च करण्याची गरज पडली नाही. हेच नियोजन पुढे करणे गरजेचे आहे. औद्योगिकीकरण, ‘रेसिडेन्सियल अ‍ॅक्टिव्हिटी’ करताना पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.‘ग्रीन कव्हर’ वाढविणे व ‘कार्बन फूटप्रिंट’ कमी करणे काळाची गरज आहे. सर्वात मोठे म्हणजे शिक्षण आणि जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याची भावना डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.

सामूहिक शेतीची गरजआज देशात ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि प्रत्येक शेतकरी आपल्या पिकांसाठी नियोजन न करता पाण्याचा अमर्याद वापर करतो. यामुळे भूजल पातळी घसरून ‘हायड्रोलॉजिकल फूटप्रिंट’वर परिणाम झाला. यासाठी एकतर सामूहिक शेती किंवा कुणाला किती पाणी द्यायचे याचे नियोजन व नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र स्वायत्त संस्था निर्माण करण्याची गरज डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Earthपृथ्वी