शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पृथ्वीलाही ‘लॉकडाऊन’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 10:53 IST

पृथ्वीचे तापमान वाढत आहे, याचा अर्थ पृथ्वी आजारी आहे आणि हा आजार दूर करण्यासाठी 'लॉकडाऊन'सारख्या उपचाराची नक्कीच गरज आहे. जलवायू परिवर्तनाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक याबाबत गंभीर इशारा देत आहेत.

ठळक मुद्देजलवायू परिवर्तनाचे दिसतील गंभीर परिणाम वैज्ञानिकांचा इशारा

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तापमान आणि हवामान बदल याच घटकांवरून जलवायू परिवर्तनाचे आकलन करता येणार नाही. मात्र कोरोनासारखा कोणताही आजार आला की माणसाच्या शरीराचे तापमान वाढते त्याचप्रमाणे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, याचा अर्थ पृथ्वी आजारी आहे आणि हा आजार दूर करण्यासाठी 'लॉकडाऊन'सारख्या उपचाराची नक्कीच गरज आहे. जलवायू परिवर्तनाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक याबाबत गंभीर इशारा देत आहेत.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)च्या जलवायू परिवर्तन विभागाचे प्रमुख व प्रधान वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे यांनी गेल्या काही वर्षांतील वातावरणात झालेले बदल अधोरेखित केले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात थोड्या अधिक फरकाने पण जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात निर्धारित व नियमित स्वरूपात येतो. गेल्या वर्षी मात्र जून संपल्यावर पाऊस सुरू झाला आणि पुढे हिवाळ्यापर्यंत गेला आणि वर्षभर थोड्या थोड्या दिवसाने हजेरी लावली. तापमान २ ते ३ अंशाने वाढलेच आहे. हा वरवर दिसणारा फरक झाला. मात्र जलवायू परिवर्तनामुळे पृथ्वीवरील अनेक प्राणी आणि पक्षी नामशेष होण्याच्या स्थितीत पोहचले आहेत. एवढेच नाही तर काही वनस्पतीही नष्ट झाल्या आहेत. भविष्यात कदाचित या संकटामुळे काही वनस्पती बहरणार नाही. यामुळे जैवविविधतेवर अदृश्य असे परिणाम होत आहेत.कार्बन सायकल व हायड्रोलॉजिकल सायकल (पाणी) हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. टाळेबंदीमुळे जलवायू परिवर्तनात मोठी आणि सकारात्मक घट झाली. यासाठी कोणते मोठे तंत्रज्ञान व खर्च करण्याची गरज पडली नाही. हेच नियोजन पुढे करणे गरजेचे आहे. औद्योगिकीकरण, ‘रेसिडेन्सियल अ‍ॅक्टिव्हिटी’ करताना पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.‘ग्रीन कव्हर’ वाढविणे व ‘कार्बन फूटप्रिंट’ कमी करणे काळाची गरज आहे. सर्वात मोठे म्हणजे शिक्षण आणि जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याची भावना डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.

सामूहिक शेतीची गरजआज देशात ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि प्रत्येक शेतकरी आपल्या पिकांसाठी नियोजन न करता पाण्याचा अमर्याद वापर करतो. यामुळे भूजल पातळी घसरून ‘हायड्रोलॉजिकल फूटप्रिंट’वर परिणाम झाला. यासाठी एकतर सामूहिक शेती किंवा कुणाला किती पाणी द्यायचे याचे नियोजन व नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र स्वायत्त संस्था निर्माण करण्याची गरज डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Earthपृथ्वी