शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

हनिमूनला जाण्यासाठी हवा ई-पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 21:49 IST

E-pass missused काहींना गावात राहून कंटाळलो, म्हणून बाहेरगावी जाऊन फिरून यायचे, म्हणून ही पास हवी होती. अनेकांची कारणे अफलातून होती. त्यामुळे ६५ ते ७० टक्के ई-पास ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आल्या.

ठळक मुद्देसुविधेचा गैरफायदा : थंड हवेच्या ठिकाणी मारायचा आहे फेरफटका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने संबंधितांना शहराबाहेर जाता यावे, म्हणून सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, काही महाभागांनी या सुविधेसाठी अफलातून कारणे सांगत ई-पासची मागणी केली. काहींना हनिमूनसाठी ई-पासची आवश्यकता होती. काहींना थंड हवेच्या ठिकाणी जायचे होते, तर काहींना गावात राहून कंटाळलो, म्हणून बाहेरगावी जाऊन फिरून यायचे, म्हणून ही पास हवी होती. अनेकांची कारणे अफलातून होती. त्यामुळे ६५ ते ७० टक्के ई-पास ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आल्या.

कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे गावाबाहेर जाण्याची सोय नव्हती. मात्र, ज्यांना अत्यावश्यक काम आहे. त्यांना ई-पास मिळवून कोणत्याही ठिकाणी जाता येत होते. ही पास मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले. मे महिन्यात २५ ते ३० टक्के अर्जदारांनी अंत्यसंस्काराला किंवा रुग्णालयात असलेल्या नातेवाइकांच्या भेटीला जाण्याचे कारण दाखविले, तर काही महाभागांनी हनिमून, सहज फिरायला जायचे आहे, म्हणून ई-पासची मागणी केली.

३८ दिवसांत ४९,६६८ अर्ज

नागपुरात २३ एप्रिल ते ३१ मे दरम्यान ४९,६६८ जणांनी ई-पास मिळण्यासाठी अर्ज केला. अर्जामध्ये पुरावा म्हणून जोडलेली कागदपत्रे आणि कारण संयुक्तिक असल्यामुळे १६,३३५ जणांना पास इश्यू करण्यात आली, तर ३३,३३३ जणांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले.

महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी ५,८४४ पास मंजूर

मंजूर झालेल्या अर्जामध्ये महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. संयुक्तिक कारणांमुळे ५,८४४ जणांना ई-पास देण्यात आले.

कारणे तीच ती!

बहुतांश अर्जदार ई-पास मिळविण्यासाठी एकसारखी कारणे सांगत होते. आजारी असलेल्या व्यक्तीला भेटायला जाण्यासाठी किंवा अंत्यसंस्काराला जाण्यासाठी ई-पासची मागणी करीत असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. मात्र, अनेक महाभाग गावात कंटाळलो, म्हणून बाहेरगावी जायचे आहे, असे सांगत आणि काही जण नुसतेच बाहेरगावच्या नातेवाइकाला भेटायला जायचे आहे, म्हणून ई-पास मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

म्हणून नाकारला पास

पोलिसांच्या साईटवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर २४ तासांत ई-पास उपलब्ध करून दिला जातो. अर्ज केल्यानंतर संबंधितांना एक टोकन मिळते. नागपुरात पाच परिमंडळ असून, त्या-त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना पोलीस ठाण्याच्या माध्यमातून किंवा थेट पोलीस उपायुक्त कार्यालयात ई- पाससाठी ऑनलाइन अर्ज करता येते. अर्जासोबत ज्या गावाला जायचे आहे, ज्यांच्याकडे जायचे आहे, त्यांच्याकडून मागितलेले तेथील डॉक्टरांचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे फोटो, पत्ता, तसेच आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात ही माहिती जोडल्यानंतर संबंधित व्यक्तीला टोकण दिले जाते. पोलीस उपायुक्त कार्यालयात त्या अर्जाची छाननी केली जाते. यावेळी अनेक जण संयुक्तिक कारण सांगत नसल्याने किंवा आवश्यक कागदपत्रे जोडत नसल्याने ई-पास नाकारला जातो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस