शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

हनिमूनला जाण्यासाठी हवा ई-पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 21:49 IST

E-pass missused काहींना गावात राहून कंटाळलो, म्हणून बाहेरगावी जाऊन फिरून यायचे, म्हणून ही पास हवी होती. अनेकांची कारणे अफलातून होती. त्यामुळे ६५ ते ७० टक्के ई-पास ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आल्या.

ठळक मुद्देसुविधेचा गैरफायदा : थंड हवेच्या ठिकाणी मारायचा आहे फेरफटका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने संबंधितांना शहराबाहेर जाता यावे, म्हणून सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, काही महाभागांनी या सुविधेसाठी अफलातून कारणे सांगत ई-पासची मागणी केली. काहींना हनिमूनसाठी ई-पासची आवश्यकता होती. काहींना थंड हवेच्या ठिकाणी जायचे होते, तर काहींना गावात राहून कंटाळलो, म्हणून बाहेरगावी जाऊन फिरून यायचे, म्हणून ही पास हवी होती. अनेकांची कारणे अफलातून होती. त्यामुळे ६५ ते ७० टक्के ई-पास ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आल्या.

कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे गावाबाहेर जाण्याची सोय नव्हती. मात्र, ज्यांना अत्यावश्यक काम आहे. त्यांना ई-पास मिळवून कोणत्याही ठिकाणी जाता येत होते. ही पास मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले. मे महिन्यात २५ ते ३० टक्के अर्जदारांनी अंत्यसंस्काराला किंवा रुग्णालयात असलेल्या नातेवाइकांच्या भेटीला जाण्याचे कारण दाखविले, तर काही महाभागांनी हनिमून, सहज फिरायला जायचे आहे, म्हणून ई-पासची मागणी केली.

३८ दिवसांत ४९,६६८ अर्ज

नागपुरात २३ एप्रिल ते ३१ मे दरम्यान ४९,६६८ जणांनी ई-पास मिळण्यासाठी अर्ज केला. अर्जामध्ये पुरावा म्हणून जोडलेली कागदपत्रे आणि कारण संयुक्तिक असल्यामुळे १६,३३५ जणांना पास इश्यू करण्यात आली, तर ३३,३३३ जणांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले.

महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी ५,८४४ पास मंजूर

मंजूर झालेल्या अर्जामध्ये महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. संयुक्तिक कारणांमुळे ५,८४४ जणांना ई-पास देण्यात आले.

कारणे तीच ती!

बहुतांश अर्जदार ई-पास मिळविण्यासाठी एकसारखी कारणे सांगत होते. आजारी असलेल्या व्यक्तीला भेटायला जाण्यासाठी किंवा अंत्यसंस्काराला जाण्यासाठी ई-पासची मागणी करीत असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. मात्र, अनेक महाभाग गावात कंटाळलो, म्हणून बाहेरगावी जायचे आहे, असे सांगत आणि काही जण नुसतेच बाहेरगावच्या नातेवाइकाला भेटायला जायचे आहे, म्हणून ई-पास मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

म्हणून नाकारला पास

पोलिसांच्या साईटवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर २४ तासांत ई-पास उपलब्ध करून दिला जातो. अर्ज केल्यानंतर संबंधितांना एक टोकन मिळते. नागपुरात पाच परिमंडळ असून, त्या-त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना पोलीस ठाण्याच्या माध्यमातून किंवा थेट पोलीस उपायुक्त कार्यालयात ई- पाससाठी ऑनलाइन अर्ज करता येते. अर्जासोबत ज्या गावाला जायचे आहे, ज्यांच्याकडे जायचे आहे, त्यांच्याकडून मागितलेले तेथील डॉक्टरांचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे फोटो, पत्ता, तसेच आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात ही माहिती जोडल्यानंतर संबंधित व्यक्तीला टोकण दिले जाते. पोलीस उपायुक्त कार्यालयात त्या अर्जाची छाननी केली जाते. यावेळी अनेक जण संयुक्तिक कारण सांगत नसल्याने किंवा आवश्यक कागदपत्रे जोडत नसल्याने ई-पास नाकारला जातो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस