शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

हनिमूनला जाण्यासाठी हवा ई-पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 21:49 IST

E-pass missused काहींना गावात राहून कंटाळलो, म्हणून बाहेरगावी जाऊन फिरून यायचे, म्हणून ही पास हवी होती. अनेकांची कारणे अफलातून होती. त्यामुळे ६५ ते ७० टक्के ई-पास ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आल्या.

ठळक मुद्देसुविधेचा गैरफायदा : थंड हवेच्या ठिकाणी मारायचा आहे फेरफटका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने संबंधितांना शहराबाहेर जाता यावे, म्हणून सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, काही महाभागांनी या सुविधेसाठी अफलातून कारणे सांगत ई-पासची मागणी केली. काहींना हनिमूनसाठी ई-पासची आवश्यकता होती. काहींना थंड हवेच्या ठिकाणी जायचे होते, तर काहींना गावात राहून कंटाळलो, म्हणून बाहेरगावी जाऊन फिरून यायचे, म्हणून ही पास हवी होती. अनेकांची कारणे अफलातून होती. त्यामुळे ६५ ते ७० टक्के ई-पास ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आल्या.

कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे गावाबाहेर जाण्याची सोय नव्हती. मात्र, ज्यांना अत्यावश्यक काम आहे. त्यांना ई-पास मिळवून कोणत्याही ठिकाणी जाता येत होते. ही पास मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले. मे महिन्यात २५ ते ३० टक्के अर्जदारांनी अंत्यसंस्काराला किंवा रुग्णालयात असलेल्या नातेवाइकांच्या भेटीला जाण्याचे कारण दाखविले, तर काही महाभागांनी हनिमून, सहज फिरायला जायचे आहे, म्हणून ई-पासची मागणी केली.

३८ दिवसांत ४९,६६८ अर्ज

नागपुरात २३ एप्रिल ते ३१ मे दरम्यान ४९,६६८ जणांनी ई-पास मिळण्यासाठी अर्ज केला. अर्जामध्ये पुरावा म्हणून जोडलेली कागदपत्रे आणि कारण संयुक्तिक असल्यामुळे १६,३३५ जणांना पास इश्यू करण्यात आली, तर ३३,३३३ जणांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले.

महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी ५,८४४ पास मंजूर

मंजूर झालेल्या अर्जामध्ये महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. संयुक्तिक कारणांमुळे ५,८४४ जणांना ई-पास देण्यात आले.

कारणे तीच ती!

बहुतांश अर्जदार ई-पास मिळविण्यासाठी एकसारखी कारणे सांगत होते. आजारी असलेल्या व्यक्तीला भेटायला जाण्यासाठी किंवा अंत्यसंस्काराला जाण्यासाठी ई-पासची मागणी करीत असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. मात्र, अनेक महाभाग गावात कंटाळलो, म्हणून बाहेरगावी जायचे आहे, असे सांगत आणि काही जण नुसतेच बाहेरगावच्या नातेवाइकाला भेटायला जायचे आहे, म्हणून ई-पास मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

म्हणून नाकारला पास

पोलिसांच्या साईटवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर २४ तासांत ई-पास उपलब्ध करून दिला जातो. अर्ज केल्यानंतर संबंधितांना एक टोकन मिळते. नागपुरात पाच परिमंडळ असून, त्या-त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना पोलीस ठाण्याच्या माध्यमातून किंवा थेट पोलीस उपायुक्त कार्यालयात ई- पाससाठी ऑनलाइन अर्ज करता येते. अर्जासोबत ज्या गावाला जायचे आहे, ज्यांच्याकडे जायचे आहे, त्यांच्याकडून मागितलेले तेथील डॉक्टरांचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे फोटो, पत्ता, तसेच आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात ही माहिती जोडल्यानंतर संबंधित व्यक्तीला टोकण दिले जाते. पोलीस उपायुक्त कार्यालयात त्या अर्जाची छाननी केली जाते. यावेळी अनेक जण संयुक्तिक कारण सांगत नसल्याने किंवा आवश्यक कागदपत्रे जोडत नसल्याने ई-पास नाकारला जातो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस