शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सिटी सर्व्हेच्या कार्यालयात कोरोना नियमांची धूळधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 21:42 IST

corona rules violate City Survey office, Nagpur news कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने धास्तावलेल्या सरकारने अंशत: टाळेबंदीची घोषणा ३१ मार्चपर्यंत केली आहे. त्या अनुषंगाने नियमांसह शासकीय, खासगी प्रतिष्ठानांसोबतच सर्वसामान्यांना कोरोनाचे नियम घालून दिले आहेत. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणांकडून कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र, शासकीय कार्यालयातच या नियमांची धूळधाण उडवली जात आहे.

ठळक मुद्देटोकन वॉचचा उपयोग काय? : दलालांमुळे नागरिकांना धरले जातेय वेठीस

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने धास्तावलेल्या सरकारने अंशत: टाळेबंदीची घोषणा ३१ मार्चपर्यंत केली आहे. त्या अनुषंगाने नियमांसह शासकीय, खासगी प्रतिष्ठानांसोबतच सर्वसामान्यांना कोरोनाचे नियम घालून दिले आहेत. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणांकडून कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र, शासकीय कार्यालयातच या नियमांची धूळधाण उडवली जात आहे. त्यांच्यावर कारवाई कोण करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सिव्हिल लाईन्स येथील विभागीय कार्यालयाच्या परिसरातील प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर सिटी सर्व्हेचे कार्यालय आहे. येथे शहरातील शेकडो-हजारोंच्या संख्येने नागरिक आपापल्या कामांसाठी येत असतात. कामात सुसूत्रता असावी आणि कुणाला ताटकळत बसावे लागू नये म्हणून कार्यालयात दररोज सकाळी ९ वाजता १०० टोकन वाटले जातात. ज्याचा क्रमांक लागेल त्याचा क्रमांक भिंतीवर टांगलेल्या टोकन वॉचवर झळकण्याची व्यवस्था आहे. मात्र, ही टोकन वॉच सुरू असतानाही त्याचा वापर होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रचंड गर्दी उसळलेली असते. शिवाय, दलालांचा राबता मोठा असतो. दलालांची कामे प्रथम, या तत्त्वावर येथील कर्मचारी काम करताना दिसतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना संध्याकाळपर्यंत ताटकळत उभे ठेवले जाते. ही बाब प्रशासकीय दिरंगाईची आहे. सोबतच कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. नागरिकांच्या तर सोडाच, कर्मचाऱ्यांच्या तोंडालाही मास्क दिसत नाही. नागरिकांमध्ये व्यक्तिश: अंतर जपण्याचे आवाहन केले जात नाही. सॅनिटायझरची व्यवस्था केवळ नाममात्र आहे. अशा स्थितीत कोरोना संक्रमण आटोक्यात येणार का आणि त्यात शासकीय कार्यालयांची भूमिका जबाबदारीची आहे का, असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत शिवसेनेचे युवा नेते प्रवीण शर्मा यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व महापौरांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाच्या नावाखाली प्रशासन वेठीस धरत आहे आणि दुसरीकडे स्वत:च कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर