शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

वर्षभरात मास्क न वापरणाऱ्या ३६२१९ जणांनी भरला १ .६५ कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी गेल्यावर्षी २१ मार्चपासून उपायोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्यांवर मनपाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी गेल्यावर्षी २१ मार्चपासून उपायोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्यांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई केली जात आहे. सुरुवातीला मास्क न वापरणाऱ्यांवर २०० रुपये दंड आकारला जात होता. परंतु त्यानंतरही संख्या कमी झाली नाही. घराबाहेर पडताना सर्वांनी मास्क वापरावा यासाठी मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात आला. पथकामार्फत दररोज कारवाई केली जात आहे. त्यानंतरही अनेकजण मास्क वापरत नसल्याचे नागपूर शहरातील चित्र आहे. वर्षभरात पथकांनी ३६ हजार २९७ लोकांकडून १ कोटी ६५ लाख ७ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

...

२०० रुपये दंडानुसार ५७७० जणांवर कारवाई

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना संक्रमणाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विना मास्क फिरणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. त्यानुसार ५ हजार ७७० लोकांकडून १० लाख ९४ हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

....

५०० रुपये प्रमाणे ३६२२१ लोकांवर कारवाई

मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी विनामास्क फिरणाऱ्या ३० हजार ८२७ लोकांकडून १ कोटी ५४ लाख १३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

पथकामार्फत मनपाच्या सर्व झोनमध्ये दररोज कारवाई केली जात आहे.

....

५९ मंगल कार्यालयांना ८.५९ लाखांचा दंड

मंगल कार्यालय, लॉन येथील लग्न समारंभ व कार्यक्रमांत मर्यादेपेक्षा अधिक लोकांची व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५९ मंगल कार्यालय व लॉनवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८ लाख ५९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

...

१ जानेवारी ते २० मार्च दरम्यान १० हजार जणांवर कारवाई

शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर एनडीएस पथकाने मास्क न वापऱ्यांच्या विरोधातील कारवाईला अधिक गती दिली. १ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत १० हजार २७७ लोकांकडून ५१ लाख् ३८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

...

कारवाईला गती देण्याचे निर्देश

शहरात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार मनपाच्या एनडीएस पथकातर्फे विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते. आजवर ३६ हजारांहून अधिक लोकांवर कारवाई करून १ कोटी ६५ लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला. कारवाई मागे दंड वसूल करण्याचा हेतू नसून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी कोविड-१९ नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे.

वीरसेन तांबे, एनडीएस पथक प्रमुख मनपा