शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वर्षभरात मास्क न वापरणाऱ्या ३६२१९ जणांनी भरला १ .६५ कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी गेल्यावर्षी २१ मार्चपासून उपायोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्यांवर मनपाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी गेल्यावर्षी २१ मार्चपासून उपायोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्यांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई केली जात आहे. सुरुवातीला मास्क न वापरणाऱ्यांवर २०० रुपये दंड आकारला जात होता. परंतु त्यानंतरही संख्या कमी झाली नाही. घराबाहेर पडताना सर्वांनी मास्क वापरावा यासाठी मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात आला. पथकामार्फत दररोज कारवाई केली जात आहे. त्यानंतरही अनेकजण मास्क वापरत नसल्याचे नागपूर शहरातील चित्र आहे. वर्षभरात पथकांनी ३६ हजार २९७ लोकांकडून १ कोटी ६५ लाख ७ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

...

२०० रुपये दंडानुसार ५७७० जणांवर कारवाई

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना संक्रमणाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विना मास्क फिरणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. त्यानुसार ५ हजार ७७० लोकांकडून १० लाख ९४ हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

....

५०० रुपये प्रमाणे ३६२२१ लोकांवर कारवाई

मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी विनामास्क फिरणाऱ्या ३० हजार ८२७ लोकांकडून १ कोटी ५४ लाख १३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

पथकामार्फत मनपाच्या सर्व झोनमध्ये दररोज कारवाई केली जात आहे.

....

५९ मंगल कार्यालयांना ८.५९ लाखांचा दंड

मंगल कार्यालय, लॉन येथील लग्न समारंभ व कार्यक्रमांत मर्यादेपेक्षा अधिक लोकांची व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५९ मंगल कार्यालय व लॉनवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८ लाख ५९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

...

१ जानेवारी ते २० मार्च दरम्यान १० हजार जणांवर कारवाई

शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर एनडीएस पथकाने मास्क न वापऱ्यांच्या विरोधातील कारवाईला अधिक गती दिली. १ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत १० हजार २७७ लोकांकडून ५१ लाख् ३८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

...

कारवाईला गती देण्याचे निर्देश

शहरात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार मनपाच्या एनडीएस पथकातर्फे विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते. आजवर ३६ हजारांहून अधिक लोकांवर कारवाई करून १ कोटी ६५ लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला. कारवाई मागे दंड वसूल करण्याचा हेतू नसून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी कोविड-१९ नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे.

वीरसेन तांबे, एनडीएस पथक प्रमुख मनपा