शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या भेटीतील गावांनाच मदतीची हुलकावणी

By admin | Updated: May 14, 2014 02:04 IST

दारव्हा तालुक्यात बर्फवृष्टीसारखी गारपीट झाली. प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. मदतीची यादीही लागली. मात्र ज्या गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली

संतोष तांगडे - बोरीअरब (यवतमाळ)

दारव्हा तालुक्यात बर्फवृष्टीसारखी गारपीट झाली. प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन मदतीचे आश्‍वासन दिले. मदतीची यादीही लागली. मात्र ज्या गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली त्या गावांची नावेच मदतीच्या यादीत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

यवतमाळ जिल्हय़ात मार्च महिन्यात प्रचंड गारपीट झाली. संपूर्ण रबी हंगाम उद्ध्वस्त झाला. दारव्हा तालुक्यातील बोरीअरब आणि कंझारा परिसरातही बर्फवृष्टीचा झाली. संपूर्ण शेतशिवार गारांमुळे पांढरे झाले होते. लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण १२ मार्च रोजी बोरीअरब येथे आले. कंझारा शिवारातील किरण कावरे यांच्या शेतीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी उपस्थित शेतकर्‍यांपुढे तत्काळ मदतीचे आश्‍वासन दिले.

मुख्यमंत्री गेल्यानंतर गारपीटग्रस्त भागाचे सर्वेक्षण झाले. कृषी विभागाने तहसीलला याद्या पाठविल्या. दारव्हा तालुक्यासाठी साडेबारा कोटी रुपये मदतही आली. १0६ गावांचे वाटप जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू झाले. मात्र या मदतीच्या यादीत मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेले बोरीअरब आणि कंझारी ही दोन गावे दिसतच नव्हती. हा प्रकार पाहून शेतकरी अचंबित झाले. अधिक चौकशी केली असता कृषी सहायकाने या दोन गावांचे सर्व्हेक्षण करून यादी कृषी विभागाला उशिरा पाठविली. एवढेच नाही तर ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर यादी प्रसिद्धही केली नाही.

परिणामी कृषी विभागाकडून तहसीलकडे आणि तहसीलकडून बँकेकडे या गावातील शेतकर्‍यांची नावेच आली नाही.

बोरीअरब येथे गारपिटीत १२३ शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून त्यांना १९ लाख ७0 हजार ४00 रुपये तर कंझारा येथील ६७ शेतकर्‍यांसाठी ९ लाख ६२ हजार ५00 रुपये मंजूर झाले आहे. आता कुठे या याद्या तहसीलमध्ये आल्या. तेथून बँकेत येतील आणि नंतर शेतकर्‍यांना वाटप होईल. मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या दोन गावांना पहिल्या टप्प्यातच मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु दप्तर दिरंगाईने ही दोन गावेच मदतीपासून वंचित आहेत. यामुळे शेतकर्‍यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.