शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

लसीकरण मृत्यू प्रकरणाचे आज कळणार कारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:35 IST

भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीला गोवर-रुबेलाची लस दिल्यानंतर दोन दिवसातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाला आरोग्य विभागाने अद्यापही गंभीरपणे घेतले नाही, परंतु मेडिकल प्रशासन याच्या मुळापर्यंत जाऊ इच्छिते. त्यानुसार गुरुवारी पुनरावलोकन समिती स्थापन केली. शुक्रवारी या समितीचा अहवाल येऊन मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपुनरावलोकन समिती स्थापन : गोवर-रुबेला लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीला गोवर-रुबेलाची लस दिल्यानंतर दोन दिवसातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाला आरोग्य विभागाने अद्यापही गंभीरपणे घेतले नाही, परंतु मेडिकल प्रशासन याच्या मुळापर्यंत जाऊ इच्छिते. त्यानुसार गुरुवारी पुनरावलोकन समिती स्थापन केली. शुक्रवारी या समितीचा अहवाल येऊन मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.आराध्या वाघाये (११ महिने) रा. भंडारा असे मृताचे नाव आहे.विविध आजारांपासून बालकांचा बचाव व्हावा यासाठी राज्य शासनाने ‘रुबेला-गोवर’ लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील एकही बालक लसीकरणातून सुटू नये यासाठी राज्य शासनाने प्रत्येक विभागाला उद्दिष्ट दिले आहे. लसीकरणाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. मात्र, लाखामध्ये एखादे प्रकरण गंभीर होऊ शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आराध्याला ५ डिसेंबर रोजी गोवर-रुबेलाची लस देण्यात आली. दुसऱ्याच दिवशी तिची प्रकृती खालावल्याने भंडारा येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात नंतर सामान्य रुग्णालयात तर त्याच दिवशी दुपारी नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच ७ डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. याचे सर्वप्रथम वृत्त ‘लोकमत’ने १२ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले. यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली. मेडिकलने शवविच्छेदनासारखीच ‘क्लिनिकल आॅटोप्सी’ची तपासणी केली. यात आराध्याच्या शरीरातील मेंदू, यकृत, फुफ्फुस, मूत्रपिंडासह इतर अवयवांचे अंश घेऊन सूक्ष्म निरीक्षण केले जाते. याचा प्राथमिक अहवालात ‘टॉक्सिक शॉक सिंड्रोम’चा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणातील हिस्टोपॅथोलॉजी व मायक्रोबॉयलॉजीच्या काही तपासण्यांचाअहवाल प्रलंबित आहे. तो शुक्रवारी प्राप्त होणार आहे. दरम्यान बालरोग विभागाच्या एका वरिष्ठ डॉक्टरने आराध्याच्या उपचाराच्या कागदपत्रात विंचू चावल्याची शंका उपस्थित करणारी नोंद केली आहे. परंतु नातेवाईकांनी अशी कुठलीही घटना व शरीरावरही तशी खूण नसल्याचे सांगितले. यामुळे संबंधित डॉक्टरही अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान गुरुवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी या प्रकरणी पुनरावलोकन समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. या समितीत मेयोच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर बोकडे, मेडिकलच्या विभाग प्रमुख डॉ. दीप्ती जैन व डॉ. सायरा मर्चंट यांचा समावेश आहे.

टॅग्स :Deathमृत्यूmedicineऔषधं