शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

तांत्रिक अडचणीमुळे रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 12:34 IST

सामान्य माणसांच्या गरजांशी जुळलेल्या शासनाच्या विविध विभागांचे डिजीटलाईजेशन करताना या प्रक्रियेत वेळोवेळी होणाऱ्या बदलांमुळे सामान्यांना फटका सहन करावा लागतो.

ठळक मुद्देओटीपी ठरली डोकेदुखीकर्मचाऱ्यांचाही वाढला मनस्ताप

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य माणसांच्या गरजांशी जुळलेल्या शासनाच्या विविध विभागांचे डिजीटलाईजेशन करताना या प्रक्रियेत वेळोवेळी होणाऱ्या बदलांमुळे सामान्यांना फटका सहन करावा लागतो. अन्न, नागरी पुरवठा विभागाला सध्या अशाच समस्यांचा सामना करावा लागतो आहे. रेशन कार्डधारकांचा डेटा डिजीटल करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी निस्तरण्याचे प्रयत्न सुरू असताना नव्याने आलेल्या ‘वन टाईम पासवर्ड’ (ओटीपी) बेस्ड प्रणालीमुळे गरजू लाभार्थ्यांसह विभागाचीही डोकेदुखी वाढली असून शेकडो कुटुंबांना रेशनच्या धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डिजीटल डेटा केंद्र शासनाने नेमलेल्या एजेन्सीमार्फत पून्हा अद्ययावत करण्याची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेदरम्यान शहरातील अनेक कार्डधारकांची नावे गहाळ झाली होती. अशा शेकडो तक्रारी विभागाच्या विविध झानेमध्ये प्राप्त झाल्या आहेत. तक्रारी व अर्ज करूनही त्यांच्या अडचणी दूर झाल्या नाही व परिणामी सरकारच्या प्राधान्यगटात असूनही अनेक गरीब कुटुंबांना गेल्या सहा-आठ महिन्यांपासून रेशन दुकानात धान्य मिळणे बंद झाले आहे. हा घोळ सुरू असतानाच केंद्र शासनाने पुरवठा विभागासाठी ओटीपी बेस्ड प्रणाली लागू केली आहे.या प्रणालीत विविध क्षेत्रातील पुरवठा निरीक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांना संगणक ‘लॉग ईन’ करण्यात अडचणी येत असल्याने त्यांचे काम खोळंबत आहे. शहरातील सर्व झोनमध्ये ही समस्या असल्याची माहिती समोर येत आहे. या ओटीपीच्या समस्येमुळे विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मन:स्ताप वाढला असून रेशनकार्डधारकांना समस्या सहन करावी लागते आहे. शहरात आकडेवारीनुसार शासनाच्या प्राधान्य गटात जवळपास ३ लाख रेशनकार्डधारक आहेत. बीपीएलची योजना बंद झाल्याने जुन्या बीपीएल कार्डधारकांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अंत्योदय लाभार्थ्यांची संख्या ३९२०७ एवढी आहे.ओटीपीच्या डोकेदुखीमुळे शहरातील विविध झोनमध्ये रेशनकार्ड संबंधित कामांचे शेकडो अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे प्राधान्य गटातील शेकडो कुटुंबांना धान्यापासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

काय आहे ओटीपीची अडचण?नव्याने कार्ड काढणे, बंद झालेले रेशनकार्ड पुन्हा सुरू करणे, कार्डातील नाव कमी करणे किंवा चढविणे, आर.सी. क्रमांक निर्माण करणे किंवा रेशनकार्ड संबंधीच्या इतर गोष्टी विभागात अद्ययावत करण्यासाठी नेमलेले पुरवठा निरीक्षक किंवा अधिकाऱ्यांसाठी वन टाईम पासवर्ड प्रणाली लागू करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी दरवेळी मिळालेला ओटीपी क्रमांक घालूनच लॉग इन करू शकेल. बहुतेक कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक आधारशी जुळले नसल्याने लॉग इन करण्यास अडचणी येत आहेत. अनेकांना ओटीपी जनरेट होण्यास अडचणी येत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

दक्षता समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनपूर्व नागपूर (महाल झोन) परिमंडळाच्या रेशन दक्षता समितीच्या सीमा ढोमणे यांनी सांगितले, समितीकडे दररोज अनेक नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. काहींना कार्डवरील नाव कमी करणे किंवा चढविण्यात अडचणी आहेत तर काहींना आर.सी. क्रमांक मिळत नाहीत. रेशन दुकानाच्या बदलीचे कामही सहा सहा महिने होत नाही. विभागाच्या समस्यांमुळे अनेक कुटुंब धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे समितीतर्फे ही समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.

डेटा अद्ययावत करताना लाभार्थ्यांची नावे कमी जास्त होण्याची शक्यता आहे. मात्र अशा लाभार्थ्यांचे प्रमाण एक टक्का असेल. आम्ही रेशन दुकानदरांकडून अशा नाव सुटलेल्या कार्डधारकांची माहिती मागविली आहे. ती विभागाकडे दिली जाईल. लॉग ईनच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आहेत. त्या लवकरच सोडविण्यात येतील. मात्र धान्यापासून कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही.- सुमेर चवरे, परिमंडळ अधिकारी, पूर्व विभाग

नवीन ओटीपी बेस्ड प्रणालीमुळे तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र प्रलंबित अर्जाचे प्रमाण अत्यल्प आहे. तांत्रिक अडचणींचा निपटारा करून लवकरच ही समस्या सोडविण्यात येईल.- प्रशांत काळे, अन्न वितरण अधिकारी, नागपूर.

टॅग्स :Governmentसरकार