शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आवक घटल्याने आंबा खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 11:34 IST

उन्हाळ्यात आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. पण आंध्र प्रदेशात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्याची आवक कमी होऊन भाव वधारले आहेत.

ठळक मुद्देवादळी पावसामुळे आंध्रमधे नुकसानवाढीव भावामुळे ग्राहकांची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यात आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. पण आंध्र प्रदेशात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्याची आवक कमी होऊन भाव वधारले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या भावामुळे आंब्याची गोडी कमी झाली आहे.बेमोसमी हवामान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळंंचा राजा असलेल्या आंब्याच्या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाल्याने परिणामी आंध्र प्रदेशातून कळमना बाजारात येणाऱ्या बैंगनफल्ली आंब्याची आवक कमी झाली असून भाव ठोकमध्ये दर्जानुसार २५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहे. किरकोळमध्ये आंबा ८० ते १०० रुपये किलो विकण्यात येत आहे.

वादळी तडाख्याचा परिणामकृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे अडतिया असोसिशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी सांगितले की, मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा आंब्याची आवक कमी असल्याने ग्राहकांना पसंतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे. तुलनात्मरीत्या यंदा आंब्याचे ३० टक्केच उत्पादन आहे. यासोबत वादळी पावसामुळे १० टक्के आंबा खराब झाला आहे. वादळी तडाख्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेशातून कळमन्यात गेल्या १५ दिवसांपासून ५ ते ८ टन क्षमतेच्या १२० ते १२५ गाड्या येत आहेत. आवक मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहील. याशिवाय भिवापूर, कुही, मांढळ, पवनी, लाखांदूर आणि गोंदिया भागातून गावरान लंगडा दसेरी आंब्याची आवक सुरू आहे. गेल्यावर्षीच्या २० ते २५ टेम्पोच्या तुलनेत यंदा केवळ २ ते ३ टेम्पो कळमन्यात येत आहेत. तसेच कोकणातील हापूस आंबे यंदा कमी प्रमाणात येत आहेत. एक डझन पेटीचे भाव ४०० ते ४५० रुपये आहेत.डोंगरे म्हणाले, मे महिन्यानंतर उत्तर प्रदेशातून दसेरी आंबे बाजारात येतील. पण या राज्यातही वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा ५० टक्के आंबे बाजारात येण्याचा अंदाज आहे. तपत्या उन्हामुळे जमिनीतील उष्णता वाढत आहे. त्यामुळे आंब्याची वाढ व दर्जा घसरत चालला आहे. आंबा उत्पादन कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून काढणे अवघड झाले आहे. समाधानकारक बहर न आल्याने आंबा उत्पादकांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :Mangoआंबा