शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नागपुरात आवक घटल्याने आंबा खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 11:34 IST

उन्हाळ्यात आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. पण आंध्र प्रदेशात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्याची आवक कमी होऊन भाव वधारले आहेत.

ठळक मुद्देवादळी पावसामुळे आंध्रमधे नुकसानवाढीव भावामुळे ग्राहकांची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यात आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. पण आंध्र प्रदेशात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्याची आवक कमी होऊन भाव वधारले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या भावामुळे आंब्याची गोडी कमी झाली आहे.बेमोसमी हवामान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळंंचा राजा असलेल्या आंब्याच्या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाल्याने परिणामी आंध्र प्रदेशातून कळमना बाजारात येणाऱ्या बैंगनफल्ली आंब्याची आवक कमी झाली असून भाव ठोकमध्ये दर्जानुसार २५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहे. किरकोळमध्ये आंबा ८० ते १०० रुपये किलो विकण्यात येत आहे.

वादळी तडाख्याचा परिणामकृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे अडतिया असोसिशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी सांगितले की, मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा आंब्याची आवक कमी असल्याने ग्राहकांना पसंतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे. तुलनात्मरीत्या यंदा आंब्याचे ३० टक्केच उत्पादन आहे. यासोबत वादळी पावसामुळे १० टक्के आंबा खराब झाला आहे. वादळी तडाख्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेशातून कळमन्यात गेल्या १५ दिवसांपासून ५ ते ८ टन क्षमतेच्या १२० ते १२५ गाड्या येत आहेत. आवक मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहील. याशिवाय भिवापूर, कुही, मांढळ, पवनी, लाखांदूर आणि गोंदिया भागातून गावरान लंगडा दसेरी आंब्याची आवक सुरू आहे. गेल्यावर्षीच्या २० ते २५ टेम्पोच्या तुलनेत यंदा केवळ २ ते ३ टेम्पो कळमन्यात येत आहेत. तसेच कोकणातील हापूस आंबे यंदा कमी प्रमाणात येत आहेत. एक डझन पेटीचे भाव ४०० ते ४५० रुपये आहेत.डोंगरे म्हणाले, मे महिन्यानंतर उत्तर प्रदेशातून दसेरी आंबे बाजारात येतील. पण या राज्यातही वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा ५० टक्के आंबे बाजारात येण्याचा अंदाज आहे. तपत्या उन्हामुळे जमिनीतील उष्णता वाढत आहे. त्यामुळे आंब्याची वाढ व दर्जा घसरत चालला आहे. आंबा उत्पादन कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून काढणे अवघड झाले आहे. समाधानकारक बहर न आल्याने आंबा उत्पादकांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :Mangoआंबा