शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

नागपुरात आवक घटल्याने आंबा खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 11:34 IST

उन्हाळ्यात आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. पण आंध्र प्रदेशात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्याची आवक कमी होऊन भाव वधारले आहेत.

ठळक मुद्देवादळी पावसामुळे आंध्रमधे नुकसानवाढीव भावामुळे ग्राहकांची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यात आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. पण आंध्र प्रदेशात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्याची आवक कमी होऊन भाव वधारले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या भावामुळे आंब्याची गोडी कमी झाली आहे.बेमोसमी हवामान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळंंचा राजा असलेल्या आंब्याच्या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाल्याने परिणामी आंध्र प्रदेशातून कळमना बाजारात येणाऱ्या बैंगनफल्ली आंब्याची आवक कमी झाली असून भाव ठोकमध्ये दर्जानुसार २५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहे. किरकोळमध्ये आंबा ८० ते १०० रुपये किलो विकण्यात येत आहे.

वादळी तडाख्याचा परिणामकृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे अडतिया असोसिशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी सांगितले की, मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा आंब्याची आवक कमी असल्याने ग्राहकांना पसंतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे. तुलनात्मरीत्या यंदा आंब्याचे ३० टक्केच उत्पादन आहे. यासोबत वादळी पावसामुळे १० टक्के आंबा खराब झाला आहे. वादळी तडाख्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेशातून कळमन्यात गेल्या १५ दिवसांपासून ५ ते ८ टन क्षमतेच्या १२० ते १२५ गाड्या येत आहेत. आवक मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहील. याशिवाय भिवापूर, कुही, मांढळ, पवनी, लाखांदूर आणि गोंदिया भागातून गावरान लंगडा दसेरी आंब्याची आवक सुरू आहे. गेल्यावर्षीच्या २० ते २५ टेम्पोच्या तुलनेत यंदा केवळ २ ते ३ टेम्पो कळमन्यात येत आहेत. तसेच कोकणातील हापूस आंबे यंदा कमी प्रमाणात येत आहेत. एक डझन पेटीचे भाव ४०० ते ४५० रुपये आहेत.डोंगरे म्हणाले, मे महिन्यानंतर उत्तर प्रदेशातून दसेरी आंबे बाजारात येतील. पण या राज्यातही वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा ५० टक्के आंबे बाजारात येण्याचा अंदाज आहे. तपत्या उन्हामुळे जमिनीतील उष्णता वाढत आहे. त्यामुळे आंब्याची वाढ व दर्जा घसरत चालला आहे. आंबा उत्पादन कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून काढणे अवघड झाले आहे. समाधानकारक बहर न आल्याने आंबा उत्पादकांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :Mangoआंबा