शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नागपुरात औषधांच्या तुटवड्याने रुग्णसेवा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:22 IST

बाह्यरुग्ण विभागात रोज येणारे ६०० वर रुग्ण व वॉर्डात उपचार घेत असलेले १५० वर रुग्णांसाठी औषधेच नाही, फारच गरजू रुग्णांना कशीतरी औषधे उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु ती पुरेशी नाहीत. रुग्णांच्या रोजच्या तक्रारीला घेऊन रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात औषधांचा साठा संपला, मात्र औषध पुरवठा करणाऱ्या ‘हाफकिन’ कंपनीकडून अद्यापही औषधे उपलब्ध न झाल्याचे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.

ठळक मुद्देकामगार रुग्णालयात भीषण स्थितीकेवळ १० टक्केच औषधांचा साठाजीवनावश्यक सोबतच सामान्य औषधेही नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाह्यरुग्ण विभागात रोज येणारे ६०० वर रुग्ण व वॉर्डात उपचार घेत असलेले १५० वर रुग्णांसाठी औषधेच नाही, फारच गरजू रुग्णांना कशीतरी औषधे उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु ती पुरेशी नाहीत. रुग्णांच्या रोजच्या तक्रारीला घेऊन रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात औषधांचा साठा संपला, मात्र औषध पुरवठा करणाऱ्या ‘हाफकिन’ कंपनीकडून अद्यापही औषधे उपलब्ध न झाल्याचे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.सुमारे दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य सांभाळले जावे म्हणून नागपुरात कामगार रुग्णालये स्थापन करण्यात आली. या कामगारांकडून कोट्यवधीची रक्कम शासनाकडे जमा होते, परंतु या रुग्णालयाच्या सोयी व विकासाकडे झालेल्या दुर्लक्षाने रुग्णच नव्हे तर रुग्णालय प्रशासनलाही याचा फटका बसत आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज ६०० वर रुग्ण येतात. परंतु यातील बहुसंख्य रुग्णांना औषधे नसल्याचे लिहून देऊन बाहेरुन औषधे खरेदी करण्यास सांगितले जात आहे. यावरून औषध वितरक आणि रुग्णांमध्ये भांडणे होत आहेत, तर अनेक कामगारांकडे औषध विकत घेण्याइतपत पैसे राहत नसल्याने ते उपचारापासून वंचित राहत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आकस्मिक विभागात सलाईनही नाहीकामगार रुग्णालयात आकस्मिक विभाग आहे. रोज साधारण १५० वर रुग्ण उपचारासाठी येतात, परंतु येथे जीवनावश्यक औषधे तर नाहीच सामान्य औषधे आणि सलाईनही नाहीत. परिणामी, रुग्णांना, मेडिकल किंवा खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. विशेष म्हणजे, उन्ह वाढल्याने उष्माघात, ताप व दूषित पाण्यामुळे होणाºया गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत, परंतु या रुग्णांनाही औषधांसाठी बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे.भरती रुग्णही अडचणीतरुग्णालयात बालरोग विभाग, स्त्रीरोग व प्रसूती रोग विभाग, अस्थिरोग विभाग आणि औषधवैद्यकशास्त्र विभागाचे चार वॉर्ड आहेत. सध्याच्या स्थितीत १५०वर रुग्ण उपचार घेत आहेत, परंतु येथेही औषधांना घेऊन कठीण स्थिती निर्माण झाली आहे. ऐनवेळी औषधांसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे.मार्चमध्येच संपला औषधांचा साठासूत्रानुसार, दर तीन महिन्यांचा औषधांचा साठा रुग्णालय प्रशासन उपलब्ध करून द्यायचे. मार्च महिन्यात हा साठा संपणार होता, यामुळे प्रशासनाने आयुक्तांना जानेवारी महिन्यातच प्रस्ताव पाठवून औषधांची मागणी केली, परंतु एकत्रित औषधे खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्याची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविण्यात आल्याने आता याच कंपनीकडून औषधांचा साठा उपलब्ध होणार असल्याचे उत्तर मिळाले. आज-उद्या औषधांचा साठा मिळेल या आशेवर मार्च महिना संपला, परंतु नवीन साठा मिळाला नाही. औषधे नसल्याने रुग्णांचा रोजचा गोंधळ वाढला असून अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.औषधांसाठी प्रस्ताव पाठविला आहेऔषधे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव वांरवार पाठविण्यात येत आहे. परंतु अद्याप औषधे उपलब्ध झालेली नाहीत. नियमानुसार स्थानिक स्तरावर औषधांची खरेदी केली जात आहे. परंतु ही औषधे सर्वांनाच पुरतील असे नाही.-डॉ. मीना देशमुखवैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय

 

टॅग्स :medicinesऔषधंnagpurनागपूर