शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दीक्षाभूमीवर अनुयायांची अभिवादनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 21:42 IST

दीक्षाभूमी आणि संविधान चौकात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच बौद्ध अनुयायांची गर्दी जमली होती. दिवसभर अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीवर पोहचत होते. सायंकाळी हा परिसर नागरिकांनी फुलला होता.

ठळक मुद्देलाखोंनी केले महामानवाला वंदन

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानसागर. महामानव, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रकांड पंडित, कायदेतज्ज्ञ, आधुनिक भारताचे निर्माते, थोर राजनीतिज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून असलेली त्यांची कीर्ती स्वकर्तृत्वाने त्यांनी सिद्धही केली. मात्र त्याहीपेक्षा दीन, दलित, शोषित, वंचित समाजावर अपार प्रेम करणारे ते महाकारुणिक होते. जातिव्यवस्थेचे विष पिण्यासह त्यांनी वैयक्तिक आयुष्यातही अनेक आघात सोसले. मात्र याची वैयक्तिक कटुता किंवा द्वेष कधी बाळगला नाही. त्याऐवजी हा कोट्यवधीचा समाज हालअपेष्टा सहन करतो, त्याला या अन्यायातून बाहेर काढण्याचा कळवळाच त्यांना अधिक होता. शोषितांना जातिव्यवस्थेच्या अन्यायातून बाहेर काढण्यासाठी ज्वालामुखीसारखा लढणारा, तरीही हळव्या मनाचा हा महामानव बुद्धाच्या कारु ण्यसागरात विसावला. म्हणूनच समाजावर ‘मायपित्याहून उदंड माया’ करणारे ते बाबासाहेब झाले. कवी वामनदादा कर्डकांनी ‘चांदण्याची छाया, कापराची काया...माऊलीची माया होता माझा भीमराया...’ असे त्यांचे बोलके वर्णन केले.अशी अपार करुणा, मानवता असलेल्या महामानवाला त्यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त लोखों अनुयायांनी अभिवादन केले. दीक्षाभूमी आणि संविधान चौकात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच बौद्ध अनुयायांची गर्दी जमली होती. दिवसभर अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीवर पोहचत होते. सायंकाळी हा परिसर नागरिकांनी फुलला होता. सायंकाळी पावसाने थोडी तारांबळ उडाली खरी, मात्र पाऊस थांबताच पुन्हा अभिवादनासाठी रांग लागली. रोषणाईने सजलेल्या दीक्षाभूमीचा परिसर बाबासाहेबांच्या जयंती सोहळ्याने अधिकच मनोरम झाला झाला होता. पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेले

आबालवृद्ध कुटुंबासह येथे पोहचले होते. तरुणांचा समावेश अधिकच होता आणि नेहमीप्रमाणे पुस्तकांची दुकानेही सजली होती. कुणी आकर्षक रोषणानाईने सजलेल्या दीक्षाभूमीसह मोबाईलवर सेल्फी काढून आठवण जपत होते तर निळे फेटे घातलेले तरुण अभिमानाने मिरवतही होते. मात्र बुद्धाला व बाबासाहेबांना नतमस्तक होताना डोळे मिटून ध्यानमग्न झालेले प्रत्येकाचे चेहरे त्या महामानवाच्या प्रेरणेची साक्ष देत होते. हे पाहताना पुन्हा पुन्हा वामनदादांच्या ओळी आठवत होत्या, ‘भीमराया घे तुला या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना...’

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी