शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

नागपुरात दीक्षाभूमीवर अनुयायांची अभिवादनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 21:42 IST

दीक्षाभूमी आणि संविधान चौकात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच बौद्ध अनुयायांची गर्दी जमली होती. दिवसभर अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीवर पोहचत होते. सायंकाळी हा परिसर नागरिकांनी फुलला होता.

ठळक मुद्देलाखोंनी केले महामानवाला वंदन

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानसागर. महामानव, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रकांड पंडित, कायदेतज्ज्ञ, आधुनिक भारताचे निर्माते, थोर राजनीतिज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून असलेली त्यांची कीर्ती स्वकर्तृत्वाने त्यांनी सिद्धही केली. मात्र त्याहीपेक्षा दीन, दलित, शोषित, वंचित समाजावर अपार प्रेम करणारे ते महाकारुणिक होते. जातिव्यवस्थेचे विष पिण्यासह त्यांनी वैयक्तिक आयुष्यातही अनेक आघात सोसले. मात्र याची वैयक्तिक कटुता किंवा द्वेष कधी बाळगला नाही. त्याऐवजी हा कोट्यवधीचा समाज हालअपेष्टा सहन करतो, त्याला या अन्यायातून बाहेर काढण्याचा कळवळाच त्यांना अधिक होता. शोषितांना जातिव्यवस्थेच्या अन्यायातून बाहेर काढण्यासाठी ज्वालामुखीसारखा लढणारा, तरीही हळव्या मनाचा हा महामानव बुद्धाच्या कारु ण्यसागरात विसावला. म्हणूनच समाजावर ‘मायपित्याहून उदंड माया’ करणारे ते बाबासाहेब झाले. कवी वामनदादा कर्डकांनी ‘चांदण्याची छाया, कापराची काया...माऊलीची माया होता माझा भीमराया...’ असे त्यांचे बोलके वर्णन केले.अशी अपार करुणा, मानवता असलेल्या महामानवाला त्यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त लोखों अनुयायांनी अभिवादन केले. दीक्षाभूमी आणि संविधान चौकात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच बौद्ध अनुयायांची गर्दी जमली होती. दिवसभर अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीवर पोहचत होते. सायंकाळी हा परिसर नागरिकांनी फुलला होता. सायंकाळी पावसाने थोडी तारांबळ उडाली खरी, मात्र पाऊस थांबताच पुन्हा अभिवादनासाठी रांग लागली. रोषणाईने सजलेल्या दीक्षाभूमीचा परिसर बाबासाहेबांच्या जयंती सोहळ्याने अधिकच मनोरम झाला झाला होता. पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेले

आबालवृद्ध कुटुंबासह येथे पोहचले होते. तरुणांचा समावेश अधिकच होता आणि नेहमीप्रमाणे पुस्तकांची दुकानेही सजली होती. कुणी आकर्षक रोषणानाईने सजलेल्या दीक्षाभूमीसह मोबाईलवर सेल्फी काढून आठवण जपत होते तर निळे फेटे घातलेले तरुण अभिमानाने मिरवतही होते. मात्र बुद्धाला व बाबासाहेबांना नतमस्तक होताना डोळे मिटून ध्यानमग्न झालेले प्रत्येकाचे चेहरे त्या महामानवाच्या प्रेरणेची साक्ष देत होते. हे पाहताना पुन्हा पुन्हा वामनदादांच्या ओळी आठवत होत्या, ‘भीमराया घे तुला या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना...’

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी