शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

नागपुरात निर्बंधांमुळे कळमन्यात होणार फळांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 09:19 IST

Coronavirus Nagpur news कोरोनाकाळात फळांची वाढलेली विक्री पाहता किरकोळ फळे विक्रेत्यांवर वेळेची मर्यादा आणण्याने कळमन्यात फळांची विक्री कमी होऊन नासाडी जास्त होणार असल्याचे मत कळमन्यातील अडत्यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देकळमना बाजार ठरतोय कोरोना हॉटस्पॉट

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोना संसर्गाचा होणारा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मनपा आयुक्तांनी नागपुरात कठोर निर्बंध लावले आहेत. गर्दी होणार नाही याची खबरदारी घेताना अनेक व्यावसायिकांना वेळेच्या मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यातच कोरोनाकाळात फळांची वाढलेली विक्री पाहता किरकोळ फळे विक्रेत्यांवर वेळेची मर्यादा आणण्याने कळमन्यात फळांची विक्री कमी होऊन नासाडी जास्त होणार असल्याचे मत कळमन्यातील अडत्यांनी व्यक्त केले आहे.

फळांच्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे. विक्रेत्यांनी कमी माल खरेदी केल्यास ही चेन तुटणार आहे. त्यांचा आर्थिक फटका पुरवठादार, व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसणार आहे. अर्थात लॉकडाऊनमुळे शेतकरीही हवालदिल होणार आहे.

कळमना फळे अडत असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, सध्या कळमन्यातून अन्य जिल्ह्यांत पुरवठा कमी झाल्याने सर्वच फळांची विक्री कमी झाली आहे. त्यातच सर्वाधिक विक्री नागपुरात होते, पण मनपा आयुक्तांच्या वेळेच्या निर्बंधामुळे आता विक्रीही कमी होणार आहे. विक्री आणि पुरवठ्याचे प्रमाण पाहता नागपूरलगतचे जिल्हे आणि राज्याच्या अन्य भागातून आणि राज्यांमधून फळांची आवक जास्त आहे, पण विक्री कमी झाल्यास फळे बाजारात पडून राहतील. खुल्या फळांचे जास्त आयुष्य नसते. फळे शीतगृहात ठेवण्याची कळमन्यात व्यवस्थाच नाही. त्यामुळे फळे मोठ्या प्रमाणात विक्रीविना पडून राहिल्याच्या फटका पुरवठादार आणि शेतकऱ्यांना बसणार आहे. सध्या आंब्याचा सिझन आहे. हैदराबाद आणि नागपूरलगतच्या जिल्ह्यांतून आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी हैदराबादच्या वारंगल जिल्ह्यातून आंब्याच्या ८० गाड्या कळमन्यात आल्या. ६० टक्के मालाची विक्री झाली आणि उर्वरित ४० टक्के मालाच्या विक्रीची मंगळवारी अपेक्षा होती. शिवाय मंगळवारी पुन्हा आंब्याच्या ७० गाड्या आल्या, पण अर्ध्यापेक्षा जास्त माल पडून आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने वा हातठेले सुरू ठेवल्यानंतर ते पुन्हा ५.३० वाजता विक्रीसाठी दुकाने उघडणार नाहीत. त्यामुळे मंगळवारी आंब्याची विक्री कमी झाल्याचे डोंगरे यांनी सांगितले. पुढे फळे विक्रीविना पडून राहण्याचे प्रमाण वाढणार असल्याचे डोंगरे यांनी स्पष्ट केले.

कळमन्यात कधी होणार अ‍ॅन्टिजन चाचणी

कळमन्यात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका भाजी बाजार व फळे बाजारात आहे, पण प्रशासकाने या बाजारांमध्ये अ‍ॅन्टिजन चाचणी मोहीम राबविण्याचा निर्णय अजूनही घेतलेला नाही. भाजी बाजारात अ‍ॅन्टिजन चाचणी घेतल्यास शेकडो जण पॉझिटिव्ह निघण्याची शक्यता आहे. हीच स्थिती फळ बाजारात आहे. हा बाजार सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवारी भरतो. लिलावादरम्यान शेकडो व्यापारी, शेतकरी व ग्राहक गर्दी करतात. याकडे लक्ष देण्यास प्रशासनातर्फे कुणीही अधिकारी उपस्थित राहत नाही, असा आरोप अडत्यांनी केला.

सेस तुम्हीच जमा करा!

कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कळमन्यातील प्रशासकीय कार्यालय बंद आहे. त्यामुळे माल खरेदी करून कळमन्याबाहेर नेण्यासाठी सेस जमा करण्यासाठी अडचण होत आहे. त्यामुळे अडत्यांनी सेस जमा करून कार्यालयात जमा करावा, असे अतिरिक्त काम आमच्यामागे लावल्याचे अडत्यांनी सांगितले. प्रशासकाला जशी कर्मचाऱ्यांची काळजी आहे, तशीच ग्राहक, व्यापारी, विक्रेते आणि अडत्यांची घ्यावी, अशी मागणी अडत्यांनी केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस